शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

अत्यंत साधेपणाने पर्युषणपर्वास प्रारंभ; मंदिरे बंदच, कार्यक्रमांचे आयोजन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 23:46 IST

पर्युषणपर्वाच्या आधीच हे प्रतिबंध संपेल अशी आशा होती. मात्र तसे झाले नाही. शासनाच्या आदेशाचे पालन केले जात असल्याने मंदिरांमध्ये भक्तांना प्रवेश देण्यात आले नाही.

नागपूर : चातुर्मासाच्या अनुषंगाने रविवारपासून दिगंबर जैन समाजाच्या पर्युषणपर्वास प्रारंभ झाला. शासन-प्रशासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे पालन करत नागरिकांनी घरूनच ईश्वर उपासना केली. टाळेबंदीच्या काळापासूनच मंदिरे बंद असल्याने श्रावक-श्राविकांना प्रवेशाची परवानगी देण्यात आली नाही.

पर्युषणपर्वाच्या आधीच हे प्रतिबंध संपेल अशी आशा होती. मात्र तसे झाले नाही. शासनाच्या आदेशाचे पालन केले जात असल्याने मंदिरांमध्ये भक्तांना प्रवेश देण्यात आले नाही. घरूनच अर्चना-उपासना करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे इतवारी लाडपुरा येथील श्री दिगंबर जैन सेनगण मंदिराचे अध्यक्ष सतीश जैन पेंढारी यांनी सांगितले. तसेच आवाहन इतवारी, शहीद चौक येथील श्री पार्श्वप्रभू दिगंबर सैतवाळ जैन मंदिरातूनही करण्यात आले. टाळेबंदीपासूनच मंदिराचे पाट उघडण्यात आले नसल्याचे अध्यक्ष दिलीप शिवणकर यांनी सांगितले. शासनाच्या आदेशाचे पालन केले जात आहे. साधूसंतांनीही पर्युषणपर्वात कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन न करण्याचे संदेश आधीच दिले होते. त्यांच्या आदेशांचे पालन करूनच सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याचे शिवणकर यांनी सांगितले. अनंत चतुर्दशीच्या दिवशीही मंदिरांमध्ये वंदन करण्यासाठी कुणीच घरून बाहेर न पडण्याचे आवाहन दिलीप शिवणकर यांनी केले आहे. प्रशासनाने पर्यूषण पर्वाच्या काळात दोन दिवस मंदिरे उघडण्याची परवानगी शिवणकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे मागितली आहे.जैन समाजात पर्युषणपर्वाचे विशेष महत्त्व आहे. जैन धर्मातील हा सर्वात मोठा सण असून, याला दशलक्षण पर्वही म्हटले जाते. त्यागाचे पर्व, आत्मशुद्धीचे हे पर्व आहे. जैन समाजात या काळात लहान, मोठे सर्वच जण पूजन, अभिषेक, व्रत, आराधनेत व्यस्त असतात. अनेक भक्त जिनेंद्र भगवानचे अभिषेक, पूजन केल्यानंतरच पाणी किंवा भोजन ग्रहण करत असतात. रविवारी पर्युषणपर्वास प्रारंभ झाल्याने अनेक भक्त मंदिरात आले होते. मात्र, मंदिरे बंद असल्याने त्यांच्या हाती निराशाच लागली.विजय दर्डा यांचे आवाहनअखिल भारतीय सकल जैन समाजातर्फे १३ ऑगस्टला आपात्कालीन ‘डिजिटल’ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांनी जैन समाजाला पर्युषणपर्व काळात मंदिरे बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. या काळात देवस्थानांना उघडण्याची परवानगी देण्यात आल्यास भक्तांना थांबवणे कठीण जाणार आहे. म्हणूनच या काळात कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन न करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांच्या आवाहनाचे गांभीर्य लक्षात घेता नागपुरात सर्व मंदिरे बंदच ठेवण्यात आली.