शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अत्यंत साधेपणाने पर्युषणपर्वास प्रारंभ; मंदिरे बंदच, कार्यक्रमांचे आयोजन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 23:46 IST

पर्युषणपर्वाच्या आधीच हे प्रतिबंध संपेल अशी आशा होती. मात्र तसे झाले नाही. शासनाच्या आदेशाचे पालन केले जात असल्याने मंदिरांमध्ये भक्तांना प्रवेश देण्यात आले नाही.

नागपूर : चातुर्मासाच्या अनुषंगाने रविवारपासून दिगंबर जैन समाजाच्या पर्युषणपर्वास प्रारंभ झाला. शासन-प्रशासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे पालन करत नागरिकांनी घरूनच ईश्वर उपासना केली. टाळेबंदीच्या काळापासूनच मंदिरे बंद असल्याने श्रावक-श्राविकांना प्रवेशाची परवानगी देण्यात आली नाही.

पर्युषणपर्वाच्या आधीच हे प्रतिबंध संपेल अशी आशा होती. मात्र तसे झाले नाही. शासनाच्या आदेशाचे पालन केले जात असल्याने मंदिरांमध्ये भक्तांना प्रवेश देण्यात आले नाही. घरूनच अर्चना-उपासना करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे इतवारी लाडपुरा येथील श्री दिगंबर जैन सेनगण मंदिराचे अध्यक्ष सतीश जैन पेंढारी यांनी सांगितले. तसेच आवाहन इतवारी, शहीद चौक येथील श्री पार्श्वप्रभू दिगंबर सैतवाळ जैन मंदिरातूनही करण्यात आले. टाळेबंदीपासूनच मंदिराचे पाट उघडण्यात आले नसल्याचे अध्यक्ष दिलीप शिवणकर यांनी सांगितले. शासनाच्या आदेशाचे पालन केले जात आहे. साधूसंतांनीही पर्युषणपर्वात कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन न करण्याचे संदेश आधीच दिले होते. त्यांच्या आदेशांचे पालन करूनच सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याचे शिवणकर यांनी सांगितले. अनंत चतुर्दशीच्या दिवशीही मंदिरांमध्ये वंदन करण्यासाठी कुणीच घरून बाहेर न पडण्याचे आवाहन दिलीप शिवणकर यांनी केले आहे. प्रशासनाने पर्यूषण पर्वाच्या काळात दोन दिवस मंदिरे उघडण्याची परवानगी शिवणकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे मागितली आहे.जैन समाजात पर्युषणपर्वाचे विशेष महत्त्व आहे. जैन धर्मातील हा सर्वात मोठा सण असून, याला दशलक्षण पर्वही म्हटले जाते. त्यागाचे पर्व, आत्मशुद्धीचे हे पर्व आहे. जैन समाजात या काळात लहान, मोठे सर्वच जण पूजन, अभिषेक, व्रत, आराधनेत व्यस्त असतात. अनेक भक्त जिनेंद्र भगवानचे अभिषेक, पूजन केल्यानंतरच पाणी किंवा भोजन ग्रहण करत असतात. रविवारी पर्युषणपर्वास प्रारंभ झाल्याने अनेक भक्त मंदिरात आले होते. मात्र, मंदिरे बंद असल्याने त्यांच्या हाती निराशाच लागली.विजय दर्डा यांचे आवाहनअखिल भारतीय सकल जैन समाजातर्फे १३ ऑगस्टला आपात्कालीन ‘डिजिटल’ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांनी जैन समाजाला पर्युषणपर्व काळात मंदिरे बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. या काळात देवस्थानांना उघडण्याची परवानगी देण्यात आल्यास भक्तांना थांबवणे कठीण जाणार आहे. म्हणूनच या काळात कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन न करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांच्या आवाहनाचे गांभीर्य लक्षात घेता नागपुरात सर्व मंदिरे बंदच ठेवण्यात आली.