शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

माैदा-धानला-रामटेक बससेवा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : काेराेना संक्रमण कमी करण्यासाठी शासनाने मार्च-२०२० पासून काही काळासाठी लाॅकडाऊन जाहीर केले. यात एसटी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : काेराेना संक्रमण कमी करण्यासाठी शासनाने मार्च-२०२० पासून काही काळासाठी लाॅकडाऊन जाहीर केले. यात एसटी बसेसही बंद करण्यात आल्या. राज्य शासनाने महिनाभरापूर्वी इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले आहेत; मात्र बससेवा सुरू करण्यात न असल्याने ग्रामीण भागातील शेकडाे विद्यार्थी व विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी व घरी परत येण्यासाठी विविध अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने माैदा-धानला-रामटेक ही बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी परशुराम मते यांच्यासह विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी केली आहे.

राज्यातील काेराेना संक्रमण कमी हाेताच राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. शाळांमध्ये काेराेना प्रतिबंधकयाेग्य उपाययाेजना करण्यात आल्याची खात्री पटताच शाळा सुरू करण्यात आल्या. माैदा-धानला-रामटेक मार्गावरील गावांमधील शेकडाे विद्यार्थी राेज बसने माैदा व रामटेक शहरातील शाळांमध्ये जातात. त्यासाठी ते बसेसने नियमित प्रवास करतात. पूर्वी रामटेक आगाराची रामटेक-अडेगाव ही बस अडेगाव येथे मुक्कामी असायची.

काही विद्यार्थी बसने नागपूर व भंडारा येथे शिकायला जायचे. बससेवा बंद असल्याने या विद्यार्थ्यांसह नागरिकांना त्यांनी माैदा, रामटेक, नागपूर व भंडारा येथील कार्यालयीन व इतर कामे करण्यास अडचणी येत आहेत. ही बस सकाळी ६ वाजता माैदा व रामटेकच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करायची. या बसने माैदा तालुक्यातील अडेगाव, काेदामेंढी, खंडाळा, धानला, चिचाेली, बाेरगाव, माराेडी येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी माैदा येथे अन्य गावांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी रामटेक येथील शाळा-महाविद्यालयांमध्ये जायचे आणि सायंकाळी घरी परत यायचे. काेराेना संक्रमणामुळे बंद करण्यात आलेली ही बससेवा अद्यापही सुरू करण्यात न आल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनींना शाळेत जाण्यास व घरी परत येण्यास अडचणी येत असल्याने ही बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी परशुराम मते यांच्यासह विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

...

खासगी वाहनांचा अभाव

या मार्गावर बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांना राेज खासगी वाहनांचा आधार घेत शाळेत जावे लागते. या मार्गावर खासगी प्रवासी वाहने फारसी नसल्याने माेठी गैरसाेय हाेत आहे. त्यामुळे काही विद्यार्थी सायकलने तर काही माेटरसायकलींनी शाळेत जातात. ज्यांच्याकडे वाहने नाहीत, त्यांना शाळेत जाण्यासाठी व शाळेत घरी परत येण्यासाठी नाना अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे. प्रसंगी विद्यार्थिनींना लिफ्ट मागावी लागत असून, ते धाेकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.