शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

माैदा-धानला-रामटेक बससेवा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : काेराेना संक्रमण कमी करण्यासाठी शासनाने मार्च-२०२० पासून काही काळासाठी लाॅकडाऊन जाहीर केले. यात एसटी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : काेराेना संक्रमण कमी करण्यासाठी शासनाने मार्च-२०२० पासून काही काळासाठी लाॅकडाऊन जाहीर केले. यात एसटी बसेसही बंद करण्यात आल्या. राज्य शासनाने महिनाभरापूर्वी इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले आहेत; मात्र बससेवा सुरू करण्यात न असल्याने ग्रामीण भागातील शेकडाे विद्यार्थी व विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी व घरी परत येण्यासाठी विविध अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने माैदा-धानला-रामटेक ही बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी परशुराम मते यांच्यासह विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी केली आहे.

राज्यातील काेराेना संक्रमण कमी हाेताच राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. शाळांमध्ये काेराेना प्रतिबंधकयाेग्य उपाययाेजना करण्यात आल्याची खात्री पटताच शाळा सुरू करण्यात आल्या. माैदा-धानला-रामटेक मार्गावरील गावांमधील शेकडाे विद्यार्थी राेज बसने माैदा व रामटेक शहरातील शाळांमध्ये जातात. त्यासाठी ते बसेसने नियमित प्रवास करतात. पूर्वी रामटेक आगाराची रामटेक-अडेगाव ही बस अडेगाव येथे मुक्कामी असायची.

काही विद्यार्थी बसने नागपूर व भंडारा येथे शिकायला जायचे. बससेवा बंद असल्याने या विद्यार्थ्यांसह नागरिकांना त्यांनी माैदा, रामटेक, नागपूर व भंडारा येथील कार्यालयीन व इतर कामे करण्यास अडचणी येत आहेत. ही बस सकाळी ६ वाजता माैदा व रामटेकच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करायची. या बसने माैदा तालुक्यातील अडेगाव, काेदामेंढी, खंडाळा, धानला, चिचाेली, बाेरगाव, माराेडी येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी माैदा येथे अन्य गावांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी रामटेक येथील शाळा-महाविद्यालयांमध्ये जायचे आणि सायंकाळी घरी परत यायचे. काेराेना संक्रमणामुळे बंद करण्यात आलेली ही बससेवा अद्यापही सुरू करण्यात न आल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनींना शाळेत जाण्यास व घरी परत येण्यास अडचणी येत असल्याने ही बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी परशुराम मते यांच्यासह विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

...

खासगी वाहनांचा अभाव

या मार्गावर बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांना राेज खासगी वाहनांचा आधार घेत शाळेत जावे लागते. या मार्गावर खासगी प्रवासी वाहने फारसी नसल्याने माेठी गैरसाेय हाेत आहे. त्यामुळे काही विद्यार्थी सायकलने तर काही माेटरसायकलींनी शाळेत जातात. ज्यांच्याकडे वाहने नाहीत, त्यांना शाळेत जाण्यासाठी व शाळेत घरी परत येण्यासाठी नाना अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे. प्रसंगी विद्यार्थिनींना लिफ्ट मागावी लागत असून, ते धाेकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.