शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

माैदा-धानला-रामटेक बससेवा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : काेराेना संक्रमण कमी करण्यासाठी शासनाने मार्च-२०२० पासून काही काळासाठी लाॅकडाऊन जाहीर केले. यात एसटी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : काेराेना संक्रमण कमी करण्यासाठी शासनाने मार्च-२०२० पासून काही काळासाठी लाॅकडाऊन जाहीर केले. यात एसटी बसेसही बंद करण्यात आल्या. राज्य शासनाने महिनाभरापूर्वी इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले आहेत; मात्र बससेवा सुरू करण्यात न असल्याने ग्रामीण भागातील शेकडाे विद्यार्थी व विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी व घरी परत येण्यासाठी विविध अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने माैदा-धानला-रामटेक ही बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी परशुराम मते यांच्यासह विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी केली आहे.

राज्यातील काेराेना संक्रमण कमी हाेताच राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. शाळांमध्ये काेराेना प्रतिबंधकयाेग्य उपाययाेजना करण्यात आल्याची खात्री पटताच शाळा सुरू करण्यात आल्या. माैदा-धानला-रामटेक मार्गावरील गावांमधील शेकडाे विद्यार्थी राेज बसने माैदा व रामटेक शहरातील शाळांमध्ये जातात. त्यासाठी ते बसेसने नियमित प्रवास करतात. पूर्वी रामटेक आगाराची रामटेक-अडेगाव ही बस अडेगाव येथे मुक्कामी असायची.

काही विद्यार्थी बसने नागपूर व भंडारा येथे शिकायला जायचे. बससेवा बंद असल्याने या विद्यार्थ्यांसह नागरिकांना त्यांनी माैदा, रामटेक, नागपूर व भंडारा येथील कार्यालयीन व इतर कामे करण्यास अडचणी येत आहेत. ही बस सकाळी ६ वाजता माैदा व रामटेकच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करायची. या बसने माैदा तालुक्यातील अडेगाव, काेदामेंढी, खंडाळा, धानला, चिचाेली, बाेरगाव, माराेडी येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी माैदा येथे अन्य गावांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी रामटेक येथील शाळा-महाविद्यालयांमध्ये जायचे आणि सायंकाळी घरी परत यायचे. काेराेना संक्रमणामुळे बंद करण्यात आलेली ही बससेवा अद्यापही सुरू करण्यात न आल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनींना शाळेत जाण्यास व घरी परत येण्यास अडचणी येत असल्याने ही बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी परशुराम मते यांच्यासह विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

...

खासगी वाहनांचा अभाव

या मार्गावर बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांना राेज खासगी वाहनांचा आधार घेत शाळेत जावे लागते. या मार्गावर खासगी प्रवासी वाहने फारसी नसल्याने माेठी गैरसाेय हाेत आहे. त्यामुळे काही विद्यार्थी सायकलने तर काही माेटरसायकलींनी शाळेत जातात. ज्यांच्याकडे वाहने नाहीत, त्यांना शाळेत जाण्यासाठी व शाळेत घरी परत येण्यासाठी नाना अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे. प्रसंगी विद्यार्थिनींना लिफ्ट मागावी लागत असून, ते धाेकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.