शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

एलबीटीचे काऊंटडाऊन सुरू

By admin | Updated: July 7, 2015 02:11 IST

१ आॅगस्टपासून एलबीटी रद्द होण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

२४ दिवसांचा अवधी : मनपा कर्मचारी व व्यावसायिकांमध्ये संभ्रमनागपूर : १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द होण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानुसार एलबीटीएवढी अन्य पर्याय वा अनुदानाची घोषणा राज्य सरकारने अद्यापही केलेली नाही. याशिवाय मनपाचे उत्पन्नाचे स्रोत कोणते असेल, ही स्थितीही अस्पष्ट असल्यामुळे मनपा कर्मचारी आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रम पसरला आहे. ठोस निर्णय नसल्याने चिंताएलबीटी वसुली बंद होण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे. ‘डेडलाईनला’ २४ दिवस उरले आहेत. जीएसटी लागू होईपर्यंत राज्य सरकार एलबीटी सुरू ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते, अशी व्यापाऱ्यांना शंका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह अनेक मंत्र्यांनी एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते.राज्य सरकारची आर्थिक स्थिती सक्षम नाहीअनेक विभागातील कर्मचाऱ्यांना वेतन देण्यास विलंब होत आहे. एलबीटी रद्द होण्याच्या घोषणेनंतर मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन थांबण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रत्येक महिन्यात ६० कोटी रुपये अनुदान देण्याची मागणी महापौर प्रवीण दटके यांच्यासह सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. एलबीटी रद्दच्या सूचना नाहीतमनपाला ५ जुलैपर्यंत एलबीटीच्या माध्यमातून ९१ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे. गेल्यावर्षी ३० जूनपर्यंत ७८ कोटी रुपये एलबीटीद्वारे मिळाले होते. गेल्या वित्तीय वर्षात एलबीटीच्या माध्यमातून ३३८ कोटी रुपयांचे उत्पन्न मनपाला मिळाले. एलबीटी संदर्भात राज्य सरकारने अद्याप काहीही सूचना वा माहिती दिलेली नाही, असे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे. पर्यायी व्यवस्था लागू कराजकातऐवजी एलबीटी लागू करण्याची घोषणा राज्य सरकारने आठ महिन्यांपूर्वीच केली होती. तशी सूचना मनपाला देण्यात आली होती. शिवाय डिसेंबरमध्ये एलबीटी लागू करण्यात येणार असल्याचे परिपत्रक मनपाने जारी केले होते. तीन महिन्यांनंतर १ एप्रिलपासून एलबीटी लागू करण्यात आला होता.