शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क माेहपा : राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतची शाळा सुरू केली आहे. ग्रामीण भागात अद्यापही एसटी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

माेहपा : राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतची शाळा सुरू केली आहे. ग्रामीण भागात अद्यापही एसटी बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाणे शक्य हाेत नसल्याने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बससेवा सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष माधव चर्जन व पालकांनी केली असून, माेहपा (ता. कळमेश्वर) येथील न्यू इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश आदमने यांनी नागपूर आगारप्रमुखांना निवेदन दिले आहे.

माेहपा येथे तीन हायस्कूल व एक कनिष्ठ महाविद्यालय तर परिसरातील घोराड, लोहगड, डोरली, कोहळी, पिपळा, परसोडी, मांडवी, तेलगाव येथे प्रत्येकी एक हायस्कूल आहे. डोरली, राऊलगाव, पारडी, रामगिरी, कोहळी, बुधला, लोहगड, मांडवी, नांदिखेडा, तेलगाव, तिडंगी, पिपळा, मडासावंगी, कन्याढोल, परसोडी, उबाळी, वाढोणा, घोराड व कळमेश्वर येथील शेकडाे विद्यार्थी माेहपा येथे शिक्षणासाठी बसने नियमित ये-जा करतात. काेराेना संक्रमणामुळे राज्यातील शाळा बंद करण्यात आल्याने माेहपा येथील शाळादेखील बंद हाेत्या.

शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतची शाळा सुरू केल्याने माेहपा येथील शाळा सुरू करण्यात आल्या. काेराेना संक्रमण टाळण्यासाठी या शाळांमध्ये शासनाच्या आदेशानुसार सर्व उपाययाेजना करण्यात आल्या. परंतु, ग्रामीण भागातील बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना माेहपा येथे शाळेत येण्यासाठी काेणतेही साधन नाही. बहुतांश विद्यार्थी गरीब व सामान्य घरांमधील असल्याने त्यांच्याकडे स्वतंत्र वाहनांची साेय नाही. शिवाय, ग्रामीण भागात खासगी प्रवासी वाहतूकदेखील सुरू झालेली नाही.

काही पालक त्यांच्या पाल्यांना दुचाकींनी शाळेत साेडून देतात. मात्र, शाळा सुटल्यानंतर त्यांना घरी परत जाण्यासाठी अडचणी येतात. त्यांना राेज शाळेत ने-आण करणे आर्थिकदृष्ट्या परवडण्याजाेगे नाही, असेही पालकांनी सांगितले. त्यामुळे ही समस्या साेडविण्यासाठी ग्रामीण भागातील बससेवा सुरू करण्याची मागणी माधव चर्जन व पालकांनी केली असून, मुख्याध्यापक प्रकाश आदमने यांनी आगारप्रमुखांना निवेदन दिले आहे.

...

पास देण्याचे आदेश नाहीत

ग्रामीण भागातील बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. राज्य शासनाने एसटी महामंडळाला विद्यार्थी बस सवलत पास वितरित करण्याचे आदेश दिले नाहीत. हे आदेश प्राप्त हाेताच पासेसच्या वितरणासह ग्रामीण भागात बससेवा सुरू केली जाणार असून, काेराेना संक्रमण टाळण्यासाठी बसमध्ये याेग्य उपाययाेजना केल्या जातील, अशी माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.