शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अजनी वनावरून महापाैरांनी ताेडले अकलेचे तारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:08 IST

नागपूर : अजनी वनातील हजाराे झाडे वाचविण्यासाठी मागील आठ-दहा महिन्यापासून सुरू असलेल्या आंदाेलनादरम्यान गप्प राहिलेल्या महापाैर दयाशंकर तिवारी यांच्या ...

नागपूर : अजनी वनातील हजाराे झाडे वाचविण्यासाठी मागील आठ-दहा महिन्यापासून सुरू असलेल्या आंदाेलनादरम्यान गप्प राहिलेल्या महापाैर दयाशंकर तिवारी यांच्या वक्तव्यावरून पर्यावरणवाद्यांमध्ये असंताेष पसरला आहे. महापाैरांनी ताेंड उघडून अकलेचे तारे ताेडल्याची संतप्त भावना पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली.

महापाैर तिवारी यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ‘अजनीवन‘या शब्दाचीच खिल्ली उडवली. अजनी हे वन कधीपासून झाले हेच कळत नसल्याचे सांगत, वनासोबतच प्राणी असले तरच वन संबाेधले जाते, असे मत मांडले. २०१७ मध्ये जेव्हा हा प्रकल्प मंजूर झाला तेव्हा कोविड कुठे होता, ऑक्सिजनचा प्रश्‍न कुठे होता, असे चमत्कारिक विधान त्यांनी केले. या वक्तव्यावरून पर्यावरण कार्यकर्त्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. शहराचे प्रथम नागरिक म्हणून मान असलेल्या महापाैरांवर शहराची जबाबदारी निश्चित असते. त्यात पर्यावरणही महत्त्वाचा विषय आहे. शहराचे हरित क्षेत्र वाढविण्यासाठी ठिकठिकाणी वृक्षाराेपण करणे, उद्यान, साेसायट्या व माेकळ्या जागेत वृक्षाराेपण कार्यक्रमाची घाेषणा त्यांनी केली. शहरात ७५ ऑक्सिजन झोन तयार करण्याचे निर्देश देत पोहरा नदी काठालगत पिंपळ, वड, चिंच, कडुलिंबाचे वृक्ष् लावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मग अजनीवनाबाबत दुटप्पीपणा का, असा सवाल अनसूया काळे-छाबरानी यांनी केला.

एनएचएआयच्या आयएमएस प्रकल्पाच्या ४४ एकराच्या पहिल्या टप्प्यात मनपाच्यानुसार ४९३० झाडे ताेडली जाणार आहेत. पर्यावरणवाद्यानुसार हा आकडा १० हजार आहे व चार टप्प्यात ४० हजारावर झाडांची कत्तल हाेणार आहे. याचे भान महापाैरांना आहे का, असा सवाल पर्यावरणवादी शरद पालिवाल यांनी केला. नासुप्रकडून घेतलेली उद्याने मनपाला सांभाळता आली नाही आणि महापाैर अजनी वनच्या माेबदल्यात पाचपट झाडे लावण्याचे वक्तव्य करून नागपूरकरांची दिशाभूल करीत असल्याचा आराेप त्यांनी केला. अजनीवनाला वन संबाेधण्यावरून खिल्ली उडविणाऱ्या महापाैरांना वृक्षसंवर्धन कायदा माहीत आहे का, अशी घणाघाती टीका पालिवाल यांनी केली.

अजनीवनात वटपाैर्णिमा ()

अजनीवनातील झाडाचे संवर्धन व्हावे यासाठी नागपूर शहरातील नागरिकांनी व महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी अजनीवन परिसरात वटसावित्री उत्सव साजरा केला. मनसेच्या शहर अध्यक्ष मनिषा पापडकर यांच्या पुढाकाराने येथील १०० वर्ष जुन्या झाडांचे वटवृक्षांचे पूजन करण्यात आले. काेराेना काळात प्रत्येकाला प्राणवायूचे महत्त्व कळले आहे. मात्र प्रशासनातर्फे विकासाच्या नावाने नि:शुल्क प्राणवायू देणारी हजाराे झाडे ताेडण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आराेप पापडकर यांनी केला. यावेळी अचला मेसन, शहर सचिव अर्चना कडू, शालूताई गजरे, सहसचिव स्वाती जैस्वाल, मंजुषा पानबुडे, पुनम चाडगे, शालू इंगळे असंख्य पदाधिकारी व अनेक तरुणी उपस्थित होत्या.