शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

अजनी वनावरून महापाैरांनी ताेडले अकलेचे तारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:08 IST

नागपूर : अजनी वनातील हजाराे झाडे वाचविण्यासाठी मागील आठ-दहा महिन्यापासून सुरू असलेल्या आंदाेलनादरम्यान गप्प राहिलेल्या महापाैर दयाशंकर तिवारी यांच्या ...

नागपूर : अजनी वनातील हजाराे झाडे वाचविण्यासाठी मागील आठ-दहा महिन्यापासून सुरू असलेल्या आंदाेलनादरम्यान गप्प राहिलेल्या महापाैर दयाशंकर तिवारी यांच्या वक्तव्यावरून पर्यावरणवाद्यांमध्ये असंताेष पसरला आहे. महापाैरांनी ताेंड उघडून अकलेचे तारे ताेडल्याची संतप्त भावना पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली.

महापाैर तिवारी यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ‘अजनीवन‘या शब्दाचीच खिल्ली उडवली. अजनी हे वन कधीपासून झाले हेच कळत नसल्याचे सांगत, वनासोबतच प्राणी असले तरच वन संबाेधले जाते, असे मत मांडले. २०१७ मध्ये जेव्हा हा प्रकल्प मंजूर झाला तेव्हा कोविड कुठे होता, ऑक्सिजनचा प्रश्‍न कुठे होता, असे चमत्कारिक विधान त्यांनी केले. या वक्तव्यावरून पर्यावरण कार्यकर्त्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. शहराचे प्रथम नागरिक म्हणून मान असलेल्या महापाैरांवर शहराची जबाबदारी निश्चित असते. त्यात पर्यावरणही महत्त्वाचा विषय आहे. शहराचे हरित क्षेत्र वाढविण्यासाठी ठिकठिकाणी वृक्षाराेपण करणे, उद्यान, साेसायट्या व माेकळ्या जागेत वृक्षाराेपण कार्यक्रमाची घाेषणा त्यांनी केली. शहरात ७५ ऑक्सिजन झोन तयार करण्याचे निर्देश देत पोहरा नदी काठालगत पिंपळ, वड, चिंच, कडुलिंबाचे वृक्ष् लावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मग अजनीवनाबाबत दुटप्पीपणा का, असा सवाल अनसूया काळे-छाबरानी यांनी केला.

एनएचएआयच्या आयएमएस प्रकल्पाच्या ४४ एकराच्या पहिल्या टप्प्यात मनपाच्यानुसार ४९३० झाडे ताेडली जाणार आहेत. पर्यावरणवाद्यानुसार हा आकडा १० हजार आहे व चार टप्प्यात ४० हजारावर झाडांची कत्तल हाेणार आहे. याचे भान महापाैरांना आहे का, असा सवाल पर्यावरणवादी शरद पालिवाल यांनी केला. नासुप्रकडून घेतलेली उद्याने मनपाला सांभाळता आली नाही आणि महापाैर अजनी वनच्या माेबदल्यात पाचपट झाडे लावण्याचे वक्तव्य करून नागपूरकरांची दिशाभूल करीत असल्याचा आराेप त्यांनी केला. अजनीवनाला वन संबाेधण्यावरून खिल्ली उडविणाऱ्या महापाैरांना वृक्षसंवर्धन कायदा माहीत आहे का, अशी घणाघाती टीका पालिवाल यांनी केली.

अजनीवनात वटपाैर्णिमा ()

अजनीवनातील झाडाचे संवर्धन व्हावे यासाठी नागपूर शहरातील नागरिकांनी व महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी अजनीवन परिसरात वटसावित्री उत्सव साजरा केला. मनसेच्या शहर अध्यक्ष मनिषा पापडकर यांच्या पुढाकाराने येथील १०० वर्ष जुन्या झाडांचे वटवृक्षांचे पूजन करण्यात आले. काेराेना काळात प्रत्येकाला प्राणवायूचे महत्त्व कळले आहे. मात्र प्रशासनातर्फे विकासाच्या नावाने नि:शुल्क प्राणवायू देणारी हजाराे झाडे ताेडण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आराेप पापडकर यांनी केला. यावेळी अचला मेसन, शहर सचिव अर्चना कडू, शालूताई गजरे, सहसचिव स्वाती जैस्वाल, मंजुषा पानबुडे, पुनम चाडगे, शालू इंगळे असंख्य पदाधिकारी व अनेक तरुणी उपस्थित होत्या.