शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

अजनी वनावरून महापाैरांनी ताेडले अकलेचे तारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:08 IST

नागपूर : अजनी वनातील हजाराे झाडे वाचविण्यासाठी मागील आठ-दहा महिन्यापासून सुरू असलेल्या आंदाेलनादरम्यान गप्प राहिलेल्या महापाैर दयाशंकर तिवारी यांच्या ...

नागपूर : अजनी वनातील हजाराे झाडे वाचविण्यासाठी मागील आठ-दहा महिन्यापासून सुरू असलेल्या आंदाेलनादरम्यान गप्प राहिलेल्या महापाैर दयाशंकर तिवारी यांच्या वक्तव्यावरून पर्यावरणवाद्यांमध्ये असंताेष पसरला आहे. महापाैरांनी ताेंड उघडून अकलेचे तारे ताेडल्याची संतप्त भावना पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली.

महापाैर तिवारी यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ‘अजनीवन‘या शब्दाचीच खिल्ली उडवली. अजनी हे वन कधीपासून झाले हेच कळत नसल्याचे सांगत, वनासोबतच प्राणी असले तरच वन संबाेधले जाते, असे मत मांडले. २०१७ मध्ये जेव्हा हा प्रकल्प मंजूर झाला तेव्हा कोविड कुठे होता, ऑक्सिजनचा प्रश्‍न कुठे होता, असे चमत्कारिक विधान त्यांनी केले. या वक्तव्यावरून पर्यावरण कार्यकर्त्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. शहराचे प्रथम नागरिक म्हणून मान असलेल्या महापाैरांवर शहराची जबाबदारी निश्चित असते. त्यात पर्यावरणही महत्त्वाचा विषय आहे. शहराचे हरित क्षेत्र वाढविण्यासाठी ठिकठिकाणी वृक्षाराेपण करणे, उद्यान, साेसायट्या व माेकळ्या जागेत वृक्षाराेपण कार्यक्रमाची घाेषणा त्यांनी केली. शहरात ७५ ऑक्सिजन झोन तयार करण्याचे निर्देश देत पोहरा नदी काठालगत पिंपळ, वड, चिंच, कडुलिंबाचे वृक्ष् लावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मग अजनीवनाबाबत दुटप्पीपणा का, असा सवाल अनसूया काळे-छाबरानी यांनी केला.

एनएचएआयच्या आयएमएस प्रकल्पाच्या ४४ एकराच्या पहिल्या टप्प्यात मनपाच्यानुसार ४९३० झाडे ताेडली जाणार आहेत. पर्यावरणवाद्यानुसार हा आकडा १० हजार आहे व चार टप्प्यात ४० हजारावर झाडांची कत्तल हाेणार आहे. याचे भान महापाैरांना आहे का, असा सवाल पर्यावरणवादी शरद पालिवाल यांनी केला. नासुप्रकडून घेतलेली उद्याने मनपाला सांभाळता आली नाही आणि महापाैर अजनी वनच्या माेबदल्यात पाचपट झाडे लावण्याचे वक्तव्य करून नागपूरकरांची दिशाभूल करीत असल्याचा आराेप त्यांनी केला. अजनीवनाला वन संबाेधण्यावरून खिल्ली उडविणाऱ्या महापाैरांना वृक्षसंवर्धन कायदा माहीत आहे का, अशी घणाघाती टीका पालिवाल यांनी केली.

अजनीवनात वटपाैर्णिमा ()

अजनीवनातील झाडाचे संवर्धन व्हावे यासाठी नागपूर शहरातील नागरिकांनी व महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी अजनीवन परिसरात वटसावित्री उत्सव साजरा केला. मनसेच्या शहर अध्यक्ष मनिषा पापडकर यांच्या पुढाकाराने येथील १०० वर्ष जुन्या झाडांचे वटवृक्षांचे पूजन करण्यात आले. काेराेना काळात प्रत्येकाला प्राणवायूचे महत्त्व कळले आहे. मात्र प्रशासनातर्फे विकासाच्या नावाने नि:शुल्क प्राणवायू देणारी हजाराे झाडे ताेडण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आराेप पापडकर यांनी केला. यावेळी अचला मेसन, शहर सचिव अर्चना कडू, शालूताई गजरे, सहसचिव स्वाती जैस्वाल, मंजुषा पानबुडे, पुनम चाडगे, शालू इंगळे असंख्य पदाधिकारी व अनेक तरुणी उपस्थित होत्या.