शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

मनपात ‘स्टार वॉर’ पुन्हा भडकणार

By admin | Updated: June 14, 2014 02:57 IST

स्टार बसच्या कंत्राटावरून महापालिकेत पुन्हा एकदा ‘स्टार वॉर’ भडकण्याची चिन्हे आहेत.

नागपूर : स्टार बसच्या कंत्राटावरून महापालिकेत पुन्हा एकदा ‘स्टार वॉर’ भडकण्याची चिन्हे आहेत. महापौर अनिल सोले यांनी महासभेत स्टारबस संचालन करणारी कंपनी वंश निमय विरुद्ध फौजदारी कारवाई करून कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी शुक्रवारी आयुक्त श्याम वर्धने यांना दिले. यानंतरही तातडीने पावले उचलली गेली नाही तर परिणामाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशाराही ठाकरे यांनी दिला आहे. केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम अंतर्गत महापालिकेला स्टार बस मिळाल्या. या बसेस वंश निमय या कंपनीला महापालिकेने संचालनासाठी दिल्या. मात्र, कंपनीने सेवेचा दर्जा राखला नाही. प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या महापालिकेच्या सभेत या विषयावर वादळी चर्चा झाली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी शहर बस वाहतूक व्यवस्थेवर नाराजी व्यक्त करीत खाजगी आॅपरेटरशी झालेला करार बेकायदेशीर असल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी या सभेत आक्रमक भूमिका घेत स्टारचा करार रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. शेवटी महापौर सोले यांनी सहा निर्देश दिले होते. करार रद्द करण्याच्या दृष्टीने कायदेशीर पावले उचलण्यात यावी. दुसरा आॅपरेटर ठेवण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात यावी. तो पर्यंत सध्या अस्तित्वात असलेल्या आॅपरेटरकडून सेवेत सुधारणा करण्यात याव्यात. कुठल्याही परिस्थितीत जनता परिवहन सेवेला मुकणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. दोन्ही अ‍ॅग्रीमेंट व स्टार बसच्या कारभारासंदर्भात उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात यावी. दुसऱ्या अ‍ॅग्रीमेंट संदर्भात तत्कालीन मनपा आयुक्त, बस आॅपरेटर, प्रबंधन सल्लागार, विधी सल्लागार व ज्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून सभागृहासोबत ‘चिटींग’ करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.संबंधित निर्देश देऊन सहा महिने झाले आहेत. त्यानंतरही प्रशासनाने महापौरांच्या निर्देशाचे पालन केलेले नाही. ठाकरे यांनी आयुक्तांना पत्र पाठवून याचे स्मरण करून दिले आहे. महापौरांचे आदेश प्रशासनासाठी महत्त्वाचे नाहीत का, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)