शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

हेल्मेटशिवाय दुचाकीजवळ उभे राहणेही ‘गुन्हा’

By admin | Updated: April 24, 2017 02:01 IST

शहरात सुरू असलेल्या ‘ई चालान’ प्रणालीमुळे बहुसंख्य दुचाकीचालक हेल्मेट घालायला लागले असून काही प्रमाणात वाहतुकीचे नियमही पाळले जात आहे,

अजब नियम : दंडाच्या नावावर जबरन वसुलीनागपूर : शहरात सुरू असलेल्या ‘ई चालान’ प्रणालीमुळे बहुसंख्य दुचाकीचालक हेल्मेट घालायला लागले असून काही प्रमाणात वाहतुकीचे नियमही पाळले जात आहे, मात्र दुसरीकडे चुकीचे चालान पाठविले जात असल्याने डोकेदुखी वाढली आहे. एका वाहनचालकाने दुसऱ्याला वाहन विकताना नियमानुसार हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली, परंतु तरीही हेल्मेट न घालता वाहन चालविल्याचे ई चालान जुन्या वाहन मालकाच्या नावाने आले तर एक तरुणी रस्त्याच्या कडेला दुचाकीवर बसली असताना केवळ मोबाईल पाहिला म्हणून तिच्या फोटोसह चालान पाठविले. यासारखे अनेक प्रकार सामोर येत असून त्याचे खंडन करण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे. चिखली चौक येथील वाहन पार्किंगच्या ठिकाणी एक युवती एमएच ३१ सीयू ८८७९ या दुचाकीवर बसली होती. याच दरम्यान तिचा मोबाईल फोन वाजला. कुणाचा फोन आहे असे म्हणून पाहताच चौकातील वाहतूक पोलिसांनी फोटो काढून घेतला. तिला ई-चालान पाठविले. यात मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १२९/७७ मोबाका अन्वये चालान कारवाई करण्यात आल्याचे नमूद करून ५०० रुपये दंड भरण्याची अथवा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोटार वाहन न्यायालयात खटला दाखल करण्याची सूचना केली आहे. त्या युवतीने ‘लोकमत’ला सांगितले, चौकात पार्किंगच्या ठिकाणी इतर वाहने उभी असताना तिथे केवळ दुचाकीवर बसून मोबाईल पाहिला म्हणून जर चालान दिले जात असेल तर हा जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार आहे. हे थांबायला हवे, असेही ती म्हणाली. दुसऱ्या एका प्रकरणात, सतीश मोहोड यांनी चार वर्षांपूर्वी आपली दुचाकी विकली, नियमानुसार दुचाकी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वाहन प्रणालीवर दुचाकी विकत घेणाऱ्याच्या नावाची नोंदही झाली आहे. असे असताना ‘एमएच ३१ बीएन ७००१’ हे वाहन ओमकार नगर चौकात विना हेल्मेट दुचाकी चालवित असल्याचे कारण दाखवित ई चालान जुन्याच वाहन मालकाला पाठविले. चालान नाकारण्यासाठी वाहतूक पोलीस कार्यालयाच्या चकरा मारण्यासाठी आपला वेळ का घालवावा, असा प्रश्न मोहोड यांना पडला आहे. वाहतूक विभागाची ई-चालान प्रणाली चांगली असलीतरी दोषी व्यक्तीलाच त्याचे चालान पाठविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मोहोड यांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)