शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

हेल्मेटशिवाय दुचाकीजवळ उभे राहणेही ‘गुन्हा’

By admin | Updated: April 24, 2017 02:01 IST

शहरात सुरू असलेल्या ‘ई चालान’ प्रणालीमुळे बहुसंख्य दुचाकीचालक हेल्मेट घालायला लागले असून काही प्रमाणात वाहतुकीचे नियमही पाळले जात आहे,

अजब नियम : दंडाच्या नावावर जबरन वसुलीनागपूर : शहरात सुरू असलेल्या ‘ई चालान’ प्रणालीमुळे बहुसंख्य दुचाकीचालक हेल्मेट घालायला लागले असून काही प्रमाणात वाहतुकीचे नियमही पाळले जात आहे, मात्र दुसरीकडे चुकीचे चालान पाठविले जात असल्याने डोकेदुखी वाढली आहे. एका वाहनचालकाने दुसऱ्याला वाहन विकताना नियमानुसार हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली, परंतु तरीही हेल्मेट न घालता वाहन चालविल्याचे ई चालान जुन्या वाहन मालकाच्या नावाने आले तर एक तरुणी रस्त्याच्या कडेला दुचाकीवर बसली असताना केवळ मोबाईल पाहिला म्हणून तिच्या फोटोसह चालान पाठविले. यासारखे अनेक प्रकार सामोर येत असून त्याचे खंडन करण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे. चिखली चौक येथील वाहन पार्किंगच्या ठिकाणी एक युवती एमएच ३१ सीयू ८८७९ या दुचाकीवर बसली होती. याच दरम्यान तिचा मोबाईल फोन वाजला. कुणाचा फोन आहे असे म्हणून पाहताच चौकातील वाहतूक पोलिसांनी फोटो काढून घेतला. तिला ई-चालान पाठविले. यात मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १२९/७७ मोबाका अन्वये चालान कारवाई करण्यात आल्याचे नमूद करून ५०० रुपये दंड भरण्याची अथवा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोटार वाहन न्यायालयात खटला दाखल करण्याची सूचना केली आहे. त्या युवतीने ‘लोकमत’ला सांगितले, चौकात पार्किंगच्या ठिकाणी इतर वाहने उभी असताना तिथे केवळ दुचाकीवर बसून मोबाईल पाहिला म्हणून जर चालान दिले जात असेल तर हा जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार आहे. हे थांबायला हवे, असेही ती म्हणाली. दुसऱ्या एका प्रकरणात, सतीश मोहोड यांनी चार वर्षांपूर्वी आपली दुचाकी विकली, नियमानुसार दुचाकी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वाहन प्रणालीवर दुचाकी विकत घेणाऱ्याच्या नावाची नोंदही झाली आहे. असे असताना ‘एमएच ३१ बीएन ७००१’ हे वाहन ओमकार नगर चौकात विना हेल्मेट दुचाकी चालवित असल्याचे कारण दाखवित ई चालान जुन्याच वाहन मालकाला पाठविले. चालान नाकारण्यासाठी वाहतूक पोलीस कार्यालयाच्या चकरा मारण्यासाठी आपला वेळ का घालवावा, असा प्रश्न मोहोड यांना पडला आहे. वाहतूक विभागाची ई-चालान प्रणाली चांगली असलीतरी दोषी व्यक्तीलाच त्याचे चालान पाठविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मोहोड यांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)