शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

विकेंड लॉकडाऊनमुळे एसटी पुन्हा अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST

प्रवासी घटणार : उत्पन्नावर मर्यादा येण्याची भीती नागपूर : अनलॉकनंतर एसटी बसेस मोठ्या संख्येने रस्त्यावर धावू लागल्या होत्या. परंतु ...

प्रवासी घटणार : उत्पन्नावर मर्यादा येण्याची भीती

नागपूर : अनलॉकनंतर एसटी बसेस मोठ्या संख्येने रस्त्यावर धावू लागल्या होत्या. परंतु पुन्हा प्रशासनाने विकेंड लॉकडाऊन आणि दुपारी ४ पर्यंत सर्व व्यवहार सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा एसटी अडचणीत सापडली असून प्रवाशांची संख्या घटून उत्पन्नावर मर्यादा येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून एसटीचे उत्पन्न ठप्प झाले आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासही एसटीकडे पैसे नसल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर विविध सवलतींचे महाराष्ट्र शासनाकडे असलेले पैसे मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला होता. अनलॉकनंतर एसटी पुन्हा रस्त्यावर धावू लागली होती. नागपूर विभागात दिवसाकाठी ९५ हजार किलोमीटरच्या फेऱ्या चालविण्यात येत असल्यामुळे एसटीच्या उत्पन्नात भर पडली होती. १०० टक्के क्षमतेने एसटी बसेस चालविण्यात येत होत्या. म्हणजे एका बसमध्ये ४४ प्रवासी आणि स्टँडींग प्रवाशांना मनाई करण्यात येत आहे. सोमवारपासून मध्य प्रदेशातील वाहतूक सुरू करून १ लाख २४ हजार किलोमीटरचा टप्पा गाठण्याचे ध्येय एसटीने ठेवले होते. परंतु कोरोनामुळे पुन्हा विकेंड लॉकडाऊनची घोषणा प्रशासनाने केली. दुपारी ४ पर्यंत सर्व व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुन्हा एसटीची प्रवासी संख्या कमी होणार आहे. यात उत्पन्नावर मर्यादा येणार असल्यामुळे एसटीची आर्थिक स्थिती पुन्हा बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास पुन्हा कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

............