शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

एस.टी. कर्मचाऱ्यांचे ‘स्टाफ’ सांगणे बंद

By admin | Updated: April 9, 2016 03:22 IST

एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानापासून ५० कि.मी.पर्यंतचा प्रवास मोफत करण्यास मुभा देण्यात आली होती.

कर्मचाऱ्यांना लागणार प्रवास भाडे : प्रवाशांना मोजावा लागणार अतिरिक्त एक रुपयाकैलास निघोट देवलापारएस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानापासून ५० कि.मी.पर्यंतचा प्रवास मोफत करण्यास मुभा देण्यात आली होती. त्यामुळे सदर कर्मचारी वाहकाला कुठे जावयाचे आहे, हे सांगण्याऐवजी केवळ ‘स्टाफ’ म्हणायचे. महामंडळाने ही सवलत मोडित काढण्याचा निर्णय घेतल्याने एस.टी. कर्मचाऱ्यांना या प्रवासासाठी प्रवासभाडे द्यावे लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे ‘स्टाफ’ सांगणे बंद होणार आहे. शिवाय, प्रत्येक प्रवाशाला त्याच्या प्रवासभाड्याव्यतिरिक्त एक रुपया जास्तीचा मोजावा लागणार आहे. या एक रुपयाचे त्यांना वेगळे तिकीटही दिले जाणार आहे. या निर्णयाचा महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी नुकताच आदेश जारी केला असून, हा निर्णय राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागाला लागू राहणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. विना तिकीट प्रवास करणे, प्रवासाची विहीत मोफत पास, कार्यालयीन कामानिमित्त देण्यात येणाऱ्या अधिकृत पासेस, कर्मचाऱ्यांचे प्रवाशांसोबत असौजन्यपूर्ण वर्तन यासह अन्य बाबींमुळे महामंडळाला उत्पन्नापासून वंचित राहावे लागत आहे. त्यातच कर्मचाऱ्याचा प्रवाशांशी होणाऱ्या वादामुळे महामंडळाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे ६ ते १२ एप्रिल या काळात विशेष मार्ग तपासणी केली जाणार असून, त्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. दुसरीकडे, राज्य परिवहन महामंडळात अनेक कर्मचारी कमी वेतनावर कित्येक वर्षांपासून काम करीत आहेत. त्यासाठी आंदोलने करण्यात आली. प्रत्येक वेळी आश्वासने देऊनही त्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली नाही, अशा प्रतिक्रिया काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. सोबत प्रत्येक प्रवाशाकडून प्रवासभाड्याव्यतिरिक्त एक रुपया अधिक घेतला जाणार आहे. या एक रुपयाचे त्यांना वेगळे तिकीट दिले जाणार आहे. आधीच प्रवासभाडे वाढविण्यात आले. यासाठी प्रसंगी डिझेल दरवाढीचे कारण पुढे करण्यात आले. डिझेलचे दर कमी होऊनही तिकिटांचा दर कायम ठेवण्यात आला. ग्रामीण भागात बसफेऱ्यांची अनियमितता वाढली आहे. त्यातच प्रवाशांना एक रुपया अतिरिक्त मोजावा लागणार असल्याने प्रवाशांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. प्रवाशांसाठी हा निर्णय नवीन असल्याने बहुतांश प्रवासी वाहकांसोबत वाद घालत असल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहकांची डोकेदुखी वाढली आहे. महिन्याकाठी २० कोटी रुपये जमाएस.टी. महामंडळाच्या बसेसनी रोज राज्यभर किमान ६५ लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांकडून एक रुपया वसूल केल्यास महामंडळाकडे रोज ६५ लाख रुपये गोळा होणार आहेत. महिन्याकाठी ही रक्कम २० कोटी रुपयांच्या घरात जाते. ही रक्कम महामंडळाला मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या एक रुपयातून प्रवाशांना विम्याचा कोणता लाभ मिळणार आहे, हेदेखील स्पष्ट करण्यात आले नाही. हा विमा अपघाती आहे की अन्य आहे, त्या विम्याचा लाभ मिळविण्यासाठी त्या प्रवाशाला एक रुपयाचे तिकीट जपून ठेवावे लागगणार की नाही, यासह अन्य महत्त्वाच्या बाबी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्या नाहीत.एक प्रवासी; दोन तिकिटेराज्य परिवहन महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्थापकांच्या नवीन आदेशान्वये प्रत्येक प्रवाशाला आता दोन तिकिटे मिळणार आहेत. यातील एक तिकीट त्याच्या प्रवासभाड्याचे तर दुसरे तिकीट त्याच्याकडून घेतलेल्या एक रुपयाचे असणार आहे. ज्येष्ठ नागरिक किंवा इतर सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्यांनाही एक रुपया द्यावा लागणार आहे. हा एक रुपया फक्त एका वेळच्या प्रवासाचा असणार आहे. हा एक रुपया त्या प्रवाशाच्या विम्यापोटी घेतला जात असल्याची माहिती वाहकांकडून प्रवाशांना दिली जात आहे. या एक रुपयात त्या प्रवाशाचा १० लाख रुपयांचा विमा असणार आहे, असेही वाहकांनी सांगितले.