शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

एसटीचे दररोज होतेय ४७ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:07 IST

प्रवासी घटले : जिल्ह्यात फक्त २५ फेऱ्यांची वाहतूक दयानंद पाईकराव नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक कारणासाठीच ...

प्रवासी घटले : जिल्ह्यात फक्त २५ फेऱ्यांची वाहतूक

दयानंद पाईकराव

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक कारणासाठीच प्रवास करण्याची अट घालून दिली. त्यामुळे एसटीचे दररोज ४७ लाखांचे नुकसान होत असून, नागपूर जिल्ह्यात केवळ २५ फेऱ्यांची वाहतूक होत आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने २२ मार्च २०२० पासून १५ सप्टेंबर २०२० पर्यंत एसटीची चाके ठप्प झाली होती. त्यानंतर एसटीची वाहतूक सुरू झाली. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२० तसेच जानेवारी आणि १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत एसटीची वाहतूक सुरळीत सुरू होती; परंतु त्यानंतर एका सीटवर एकच प्रवासी बसविण्याचा निर्णय घेतल्यामुळे एसटीचे उत्पन्न कमी झाले होते. एका बसमध्ये केवळ २२ प्रवासीच बसविण्यात येत होते. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा १५ एप्रिल २०२१ पासून १ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले. हे लॉकडाऊन १५ मे २०२१ पर्यंत वाढविण्यात आले. कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे केवळ अत्यावश्यक कारणासाठीच प्रवास करण्याचे बंधन महाराष्ट्र शासनाने घालून दिले आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत कमालीची घट झाली. कोरोनाच्या पूर्वी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात ७२० फेऱ्यांची वाहतूक होत होती. ४१० बसेस १ लाख ६० हजार किलोमीटरचा प्रवास करीत होत्या; एकूण २० हजार प्रवाशांच्या वाहतुकीद्वारे नागपूर विभागाला दररोज ४८ लाखांचे उत्पन्न मिळत होते; परंतु अत्यावश्यक कारणासाठीच प्रवासाची अट घालण्यात आल्यामुळे एसटीचे उत्पन्न घटले आहे. सध्या विभागात १० बसेसच्या माध्यमातून २५ फेऱ्या चालविण्यात येत आहेत. केवळ ३ हजार किलोमीटर बसेस धावत असून, विभागाला दररोज फक्त ६० हजारांचे उत्पन्न मिळत आहे. यात प्रवाशांची संख्या ६०० वर आली आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या एसटी महामंडळाला लॉकडाऊनमुळे चांगलाच फटका बसला आहे. लॉकडाऊन आणखी वाढल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

.............

शासनाच्या निर्देशानुसार वाहतूक सुरू

‘सध्या ५० टक्के आसन क्षमतेने बसेस चालविण्यात येत आहेत. आवश्यक कारणासाठी प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्यात येत आहे. शासनाच्या निर्देशाचे पालन करून विभागात एसटीची वाहतूक सुरू आहे.’

-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग.

...............