शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

एस.टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By admin | Updated: June 25, 2016 03:02 IST

चालकाने बसच्या मागे असलेल्या कारला साईड दिली नाही म्हणून कारमधील चौघांनी बसचालकास शिवीगाळ करीत मारहाण केली. एवढेच नव्हे तर बसची तोडफोड केली.

बसचालकास मारहाण प्रकरण : चौघांपैकी दोन आरोपी अटकेत, बसच्या काचा फोडल्याकाटोल : चालकाने बसच्या मागे असलेल्या कारला साईड दिली नाही म्हणून कारमधील चौघांनी बसचालकास शिवीगाळ करीत मारहाण केली. एवढेच नव्हे तर बसची तोडफोड केली. मारहाण करणाऱ्या चौघांपैकी दोघांना अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ काटोल आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ५ वाजता ‘काम बंद’ आंदोलन पुकारले. त्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत काटोल आगारातून एकही बस बाहेर पडली नव्हती. यात वरुड, मोर्शी, परतवाडा येथून काटोलमार्गे नागपूरला जाणाऱ्या बसेसचाही समावेश होता. या आंदोलनाचा प्रवाशांना चांगलाच फटका बसला. सूरज तिवारी (२३) व अशोक मरकाम दोघेही रा. फेटरी, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. काटोल आगाराची एमएच-४०/वाय-५३७९ क्रमांकाची भंडारा-काटोल ही बस गुरुवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास नागपूर बसस्थानकाहून काटोलला येण्यासाठी निघाली. ही बस काटोल-नागपूर मार्गावरील नागपूर शहरालगतच्या टोल नाक्याजवळ पोहोचताच तिच्या मागे एक कार होती. रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास ही बस काटोल-नागपूर मार्गावरील कळमेश्वरनजीकचे रेल्वे फाटक बंद असल्याने फाटकाजवळ थांबली. त्यातच बसच्या मागे असलेल्या कारमधील चौघांनी बसचालक सतीश गावंडे यांना साईड का दिली नाही, अशी विचारणा करीत शिवीगाळ करायला सुरुवात केली. हा प्रकारच एवढ्यावर न थांबता, चौघांनी गावंडे यांना लोखंडी रॉडने मारहाण करून बसची तोडफोड केली. त्यात बसच्या काचा फोडल्या.हा प्रकार सुरू असताना वाहन व काही प्रवासी गावंडे यांच्या मदतीला धावले. त्यांनाही या चौघांनी धमकावले. दरम्यान, गावंडे यांनी जखमी अवस्थेत सदर बस कळमेश्वर बसस्थानकावर आणली. त्यांच्यावर कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना लगेच नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी भादंवि ३५३, ३४१, ३३३, १८६ अन्वये गुन्हा नोंदवून शुक्रवारी सकाळी सूरज व अशोकला अटक केली. उर्वरित दोन आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेच्या निषेधार्थ काटोल आगारातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ५ वाजतापासून ‘काम बंद’ आंदोलन पुकारले. आरोपींवर कारवाई करून आंदोलनातील कर्मचारी व कामगारांवर कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी रेटून धरली. त्यातच अधिकाऱ्यांनी कामगार नेत्यांची समजूत काढत आधी बसेस सुरू करण्याची सूचना केली. कारवाई करणार नसल्याचे आश्वासन देताच कामगारांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर सकाळी ११ वाजतापासून काटोल आगारातील सर्व बसेस बाहेर पडायला सुरुवात झाली. बसस्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने ठाणेदार दिगंबर चव्हाण यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक राठोड यांनी बंदोबस्त ठेवला होता. (तालुका प्रतिनिधी)प्रवाशांचे हालया आंदोलनामुळे काटोल आगारातील सर्व बसेस तसेच वरुड, मोर्शी, परतवाडा, अमरावती, जळगाव (जामोद) आगाराच्या काटोलमार्गे नागपूरला जाणाऱ्या बसेस काटोल बसथानकात अडकून पडल्या होत्या. त्यामुळे बसस्थानकात सकाळी ११ वाजेपर्यंत एकूण ७२ बसेस उभ्या होत्या. यात चंद्रपूर, राजुरा, माहूर, भंडारा, तुमसर, वर्धा, नागपूर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेसचा सावेश होता. परिणामी, शेकडो प्रवासी अडकून पडल्याने त्यांचे हाल झाले. शिवाय, काटोल आगाराची एकही बस ग्रामीण भागात न गेल्याने गावांमधील प्रवाशांची गैरसोय झाली होती. या आंदोलनामुळे आगाराचे अंदाजे ४ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आगार प्रमुख शीतल शिरसाठ यांनी दिली. अधिकाऱ्यांशी चर्चा काटोलचे आगार प्रमुख शीतल शिरसाठ यांनी या आंदोलाची तसेच घटनेची माहिती प्रादेशिक नियंत्रकांना दिली. त्यामुळे एसटीचे नागपूर येथील तांत्रिक यंत्र अधिकारी अमोल गाडबैल, वरिष्ठ आगार व्यवस्थापक एस. एस. हेडाऊ, विभागीय कामगार अधिकारी वाकोडीकर काटोल येथे पोहोचले. त्यांनी इंटक एस. टी. वर्कर्स संघटनेचे अरुण भागवत, शेषराव पावडे, आर. एस. भांगे, के. व्ही. सांगण, सतीश पुरी, श्रीकांत घाटोळे, अब्दुल नहीम, गणेश वानखेडे, गुड्डू पठाण यांच्यासह अन्य पदाधिकारी व कामगारांशी चर्चा केली.