शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळ शाळकरी विद्यार्थ्यांसाठी सोडणार बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:06 IST

नागपूर : आठवी ते बारावीचे वर्ग सुरु झाले आहेत. ग्रामीण भागातून विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात शिकण्यासाठी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नागपुरात ...

नागपूर : आठवी ते बारावीचे वर्ग सुरु झाले आहेत. ग्रामीण भागातून विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात शिकण्यासाठी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नागपुरात येतात. अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात येण्यासाठी एसटीच्या बसेस सोडण्याची तयारी एसटी महामंडळाने केली आहे.

ग्रामीण भागातून असंख्य विद्यार्थी नागपुरात शिकण्यासाठी येतात. परंतु अनेक मार्गावर एसटीच्या बसेस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. एसटीचा पास काढून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येतो. परंतु त्यांच्या मार्गावर बस नसल्यामुळे त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. परंतु एखाद्या मार्गावर २० विद्यार्थी मिळाल्यास आणि संबंधित शाळा किंवा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी मागणी केल्यास एसटीच्या बसेस सोडण्याची तयारी एसटी महामंडळाने केली आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नातही भर पडणार असून विद्यार्थ्यांनाही सुविधा मिळणार आहे. मागणी केल्यानंतर त्वरित या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लॉकडाऊनमुळे सध्या एसटीची ७० टक्के वाहतूक सुरू आहे. एसटीच्या ३० टक्के बसेस आगारातच उभ्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी मिळाल्यास या बसेसही त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाचे विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिली.

.............