शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

बालक व दारूची तस्करी रोखण्यासाठी पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:04 IST

आरपीएफचे पाऊल : रेल्वेगाड्यांची होतेय कसून तपासणी नागपूर : रेल्वे मार्गाने अनेकदा लहान मुलांचे अपहरण होते. तसेच चंद्रपूर आणि ...

आरपीएफचे पाऊल : रेल्वेगाड्यांची होतेय कसून तपासणी

नागपूर : रेल्वे मार्गाने अनेकदा लहान मुलांचे अपहरण होते. तसेच चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात दारूची तस्करी करण्यात येते. याला आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने पथक तयार केले असून हे पथक रेल्वेगाड्यात होणाऱ्या अवैध बाबींना आळा घालण्याचे काम करीत आहे.

रेल्वेत लॉकडाऊन केल्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली. विशेष रेल्वेगाड्यांची संख्या वाढत असून सध्या नागपूर रेल्वेस्थानकावरून ४५ जोडी रेल्वेगाड्या धावत आहेत. रेल्वेगाड्यांची संख्या वाढत असताना गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. त्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने एका पथकाची नेमणुक केली आहे. हे पथक अपहरण केलेल्या बालकांवर लक्ष ठेवण्याचे काम करीत आहे. रेल्वे मार्गाने दारूची तस्करी करण्यात येते. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात या दोन्ही जिल्ह्यात दारूची तस्करी करण्यात येते. त्यावरही रेल्वे सुरक्षा दलाने नेमणुक केलेले पथक लक्ष ठेवून आहे. रेल्वेगाड्यात अनेकदा आरोपी दारूच्या बॉटल्स पोती किंवा बॅगमध्ये ठेवून बाजूला बसतात. अखेरचा थांबा येईपर्यंत ते या दारूच्या बॅगवर आपला हक्क सांगत नाहीत. अशा वेळी आरपीएफचे जवान या बेवारस बॅग ताब्यात घेतात. प्रवासात पकडल्या गेल्यास हे आरोपी या बॅगवर आपला हक्क सांगत नाहीत. पकडल्या न गेल्यास अखेरच्या थांब्यावर ते ही बॅग खाली उतरवून घेतात. आरपीएफने गठित केलेल्या पथकात एक अधिकारी आणि सहा जवानांचा समावेश आहे. आरपीएफच्या पथकामुळे रेल्वेस्थानकावर बालकांचे अपहरण आणि दारूच्या तस्करीवर आळा बसणार असल्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

..................

आरपीएफचे पथक सज्ज

‘रेल्वे मार्गाने अनेकदा बालकांचे अपहरण करण्यात येते. तसेच दारूच्या तस्करीसाठीही रेल्वेचा वापर करण्यात येतो. यावर आळा घालण्यासाठी आरपीएफतर्फे पथकाची नेमणूक करण्यात आली असून यानंतर अशा घटनांवर अंकुश लागणार आहे.’

-आशुतोष पांडे, विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल

...............