शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

अध्यात्मिक; यम नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 10:04 IST

विज्ञानाची जशी प्रगती होत गेली तसा माणूस आधुनिक व गतिमान होत गेला. त्यामुळे त्याची ऐहिक सुखाची लालसा वाढत गेली. तो शारीरिक कष्टापासून व अध्यात्मापासून दूर होत गेला.

प्रा. डॉ. संदीप ताटेवारलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: विज्ञानाची जशी प्रगती होत गेली तसा माणूस आधुनिक व गतिमान होत गेला. त्यामुळे त्याची ऐहिक सुखाची लालसा वाढत गेली. तो शारीरिक कष्टापासून व अध्यात्मापासून दूर होत गेला. त्याचा परिणाम म्हणजे शारिरीक व मानसिक दृष्ट्या तो कमजोर होत गेला. महर्षी पतंजली यांनी प्राचीन काळी योगसूत्र हा ग्रंथ लिहून त्यामध्ये योग सूत्र विशद केले. माणसाचे चित्त एकाग्र, स्थिर व निर्मळ असेल तर तो मानसिकदृष्ट्या सक्षम असतो. चित्त स्थिर राहण्यासाठी माणसाची वृत्ती कारणीभूत असते. महर्षी पतंजलि म्हणतात,तदा द्रष्टे: स्वरूपे अवस्थानम !योग साधनेमुळे साधकाची वृत्ती शांत होऊन चित्त निर्मळ होते. त्यांनी सांगितलेले अष्टांग योग मानवाला शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी फार महत्वाचे आहे. ते म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी. यमाचे पाच प्रकार म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य व अपरिग्रह. जीवन जगत असतांना आपल्या बोलण्यात, वागण्यात, आचरणात अहिंसा असायला पाहिजे. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही असे आपले वर्तन असायला पाहिजे. आपण नेहमी सत्याचा अंगिकार करायला पाहिजे. जेव्हा आपण खोटं बोलत असतो त्यामुळे आपला तणाव वाढतो. अस्तेय म्हणजे आपण लोभ टाळला पाहिजे. दुसऱ्याचे हिसकावून घेण्याच्या वृत्तीमुळे तणाव वाढत जातो. ब्रम्हचर्य म्हणजे ब्रम्हासारखे सत्विक आहार, विचार व आचरण . यामुळे तणाव कमी होतो. अपरिग्रह म्हणजे संग्रह करण्याची वृत्ती. जेव्हा पिढ्यानपिढ्या आपण संग्रह करतो तेव्हा हे माझ्यापासून सुटून जाणार तर नाही या भावनेमुळे तणाव वाढतो. नियमाचे पाच प्रकार सांगितले आहे. पाहिले शोच म्हणजे आंतरिक व बाह्य शुद्धी. आपण शारीरिक व मानसिक स्वच्छता ठेवायला पाहिजे. दुसरे संतोष म्हणजे समाधानी, आनंदी, हसत खेळत जीवन जगणे. तिसरे तप म्हणजे कामात सातत्य असणे व परिस्थितीला धैर्याने तोंड देणे. चौथे स्वाध्याय म्हणजे चांगले ज्ञान प्राप्त करणे व पाचवे ईश्वर प्रणिधान म्हणजे कुठेतरी निसर्ग शक्ती किंवा ईश्वर आहे यावर विश्वास ठेवून त्याला शरण जावून आपल्या कर्माचा भार ठेवून आयुष्य जगणे. यम नियमाचे पालन केल्यास आपले जीवन सुखमय व आनंदीमय होते. 

 

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक