शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्मिक; सांभाळ ही तुझी लेकरे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 10:13 IST

गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला सांभाळ ही तुझी लेकरे, पुण्य समजती पापाला

प्रा. डॉ. संदीप ताटेवारलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: साधारण २५ वषार्नंतर गावाकडील मंदिरात जाण्याचा योग आला होता. मंदिर पूर्णपणे बदललेले होते. मंदिराच्या आवारात सभोवताल तारेचे कुंपण केले होते व मंदिरात प्रवेश करण्यासाठी कुंपणाला फक्त एकच मुख्य प्रवेशद्वार ठेवण्यात आले होते. प्रवेशद्वाराजवळ एक मोठा फलक लावला होता. त्यावर मोठ्या व ठळक अक्षरात लिहिले होते की, मंदिर परिसरात कोणीही मद्यपान करू नये, जुगार खेळू नये, धुम्रपान करू नये, गैरवर्तन करू नये, मंदिराचे पावित्र्य राखावे. अशा कितीतरी सूचना फलकावर लिहिल्या होत्या. मंदिराच्या व्यवस्थापन समितीला फलकावर या सूचना लिहाव्या लागणे व सुरक्षा रक्षक नेमावा लागणे या सारखे प्रयत्न मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी छोट्या गावात करावे लागते आहे याबाबत आश्चर्य वाटले. मंदिराचा पुजारी सांगत होता की, माणस मंदिराच्या परिसरात येऊन चोऱ्या करतात म्हणून मंदिरात दानपेट्या व मूर्तीचा गाभारा लोखंडी दाराने सुरक्षित केला आहे. पूर्वी असल्या सुरक्षा मंदिरात नव्हत्या. माणसं साधीभोळी होती. मंदिरात वाईट कर्म करायची कोणाची हिंमत होत नव्हती. माणस देवाला घाबरायची. मात्र आज देवालाच माणसापासून घाबरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काय चांगलं व काय वाईट हेच आपल्याला समजत नाही. आपण चांगल्याला वाईट व वाईटाला चांगलं समजतो. म्हणूनच संत गाडगे बाबा म्हणतात,गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपालासांभाळ ही तुझी लेकरे , पुण्य समजती पापालाआज माणस देवाच्या व धर्माच्या नावावर सप्तरंगात विभागली गेली आहे व त्यासाठी आपसातच भांडत आहे. जातीय द्वेष पसरवित आहे. स्वत:च्या स्वाथार्साठी समाजात दंगली घडवून आणण्यापर्यंत माणसाची मजल गेली आहे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे सुद्धा नुकसान करीत आहे. ईश्वराच्या मागे धावण्यापेक्षा माणूस नश्वराच्या मागे धावत आहे. बुवाबाजी करून भोळ्याभाबड्या या भक्तांना देवाच्या नावावर गंडवित आहे. खरंच आपण आपली नीतिमत्ता हरवलेली आहे काय? माणस सदगुणाला दुर्गुण व दुगुर्णाला सद्गुण समजत आहेत. सज्जन माणसाला कमजोर समजून त्याच्या मागे विनाकारण लागत आहे तर दुर्जनाला सलाम ठोकत घाबरून राहत आहे. म्हणूनच बहिणाबाई चौधरी म्हणतात,माणसा माणसा तुझी नियत बेकारतुज्यावून बरं गोठ्यातलं जनावरलोभासाठी झाला माणसाचा काणूसकधी होशील रे तू माणूस ! 

 

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक