शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

अध्यात्मिक; सांभाळ ही तुझी लेकरे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 10:13 IST

गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला सांभाळ ही तुझी लेकरे, पुण्य समजती पापाला

प्रा. डॉ. संदीप ताटेवारलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: साधारण २५ वषार्नंतर गावाकडील मंदिरात जाण्याचा योग आला होता. मंदिर पूर्णपणे बदललेले होते. मंदिराच्या आवारात सभोवताल तारेचे कुंपण केले होते व मंदिरात प्रवेश करण्यासाठी कुंपणाला फक्त एकच मुख्य प्रवेशद्वार ठेवण्यात आले होते. प्रवेशद्वाराजवळ एक मोठा फलक लावला होता. त्यावर मोठ्या व ठळक अक्षरात लिहिले होते की, मंदिर परिसरात कोणीही मद्यपान करू नये, जुगार खेळू नये, धुम्रपान करू नये, गैरवर्तन करू नये, मंदिराचे पावित्र्य राखावे. अशा कितीतरी सूचना फलकावर लिहिल्या होत्या. मंदिराच्या व्यवस्थापन समितीला फलकावर या सूचना लिहाव्या लागणे व सुरक्षा रक्षक नेमावा लागणे या सारखे प्रयत्न मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी छोट्या गावात करावे लागते आहे याबाबत आश्चर्य वाटले. मंदिराचा पुजारी सांगत होता की, माणस मंदिराच्या परिसरात येऊन चोऱ्या करतात म्हणून मंदिरात दानपेट्या व मूर्तीचा गाभारा लोखंडी दाराने सुरक्षित केला आहे. पूर्वी असल्या सुरक्षा मंदिरात नव्हत्या. माणसं साधीभोळी होती. मंदिरात वाईट कर्म करायची कोणाची हिंमत होत नव्हती. माणस देवाला घाबरायची. मात्र आज देवालाच माणसापासून घाबरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काय चांगलं व काय वाईट हेच आपल्याला समजत नाही. आपण चांगल्याला वाईट व वाईटाला चांगलं समजतो. म्हणूनच संत गाडगे बाबा म्हणतात,गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपालासांभाळ ही तुझी लेकरे , पुण्य समजती पापालाआज माणस देवाच्या व धर्माच्या नावावर सप्तरंगात विभागली गेली आहे व त्यासाठी आपसातच भांडत आहे. जातीय द्वेष पसरवित आहे. स्वत:च्या स्वाथार्साठी समाजात दंगली घडवून आणण्यापर्यंत माणसाची मजल गेली आहे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे सुद्धा नुकसान करीत आहे. ईश्वराच्या मागे धावण्यापेक्षा माणूस नश्वराच्या मागे धावत आहे. बुवाबाजी करून भोळ्याभाबड्या या भक्तांना देवाच्या नावावर गंडवित आहे. खरंच आपण आपली नीतिमत्ता हरवलेली आहे काय? माणस सदगुणाला दुर्गुण व दुगुर्णाला सद्गुण समजत आहेत. सज्जन माणसाला कमजोर समजून त्याच्या मागे विनाकारण लागत आहे तर दुर्जनाला सलाम ठोकत घाबरून राहत आहे. म्हणूनच बहिणाबाई चौधरी म्हणतात,माणसा माणसा तुझी नियत बेकारतुज्यावून बरं गोठ्यातलं जनावरलोभासाठी झाला माणसाचा काणूसकधी होशील रे तू माणूस ! 

 

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक