शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

सदर उड्डाण पुलाची गती संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:26 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचए) नासुप्र ते पागलखाना चौक व छावणी पर्यंत उभारण्यात येणाºया उड्डाण पुलाचे काम संथगतीने सुरू आहे.

ठळक मुद्देवाहतुकीची होतेय कोंडी

बांधकामामुळे रस्ता अरुंदकमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचए) नासुप्र ते पागलखाना चौक व छावणी पर्यंत उभारण्यात येणाºया उड्डाण पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. शिवाय पुलाचे काम करीत असताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाय योजण्यात आलेले नाही. बांधकामासाठी रस्त्याच्या मधोमध टीन शेड लावून दोन्ही बाजूने जागा राखीव करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचे रस्ते अरुंद झालेले आहेत. बांधकामामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे दुचाकीस्वारांचे तोल जाऊन अपघात होत आहे. असे असतानाही ‘एनएचए’ ने संबंधित खड्डे भरण्याचे सौजन्य दाखविलेले नाही. नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून या दुर्लक्षामुळे प्रसंगी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नासुप्रच्या समोरून हा उड्डाणपूल सुरू होईल. सदर मुख्य रस्ता मार्गे राजभवनच्या समोरील चौकापर्यंत एकच पूल असेल. या पॉर्इंटपासून पुढे ‘वाय शेप’मध्ये दोन दिशेने दोन पूल जातील. एक पूल छिदवाडा रोडवर पागलखाना चौकाच्या पुढे उतरेल तर दुसरा पूल काटोल रोडवर छावणी माता मंदिराच्या समोर उतरेल. सहा महिन्यापूर्वी या पुलाच्या बांधकामासाठी मातीपरीक्षण करण्यात आले. चार महिन्यांपासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. पागलखाना चौकापासून पुढे असलेल्या भागात काही पिलर उभारले गेले आहेत. मात्र, पागलखाना चौक ते छावणी चौकापर्यंत सुरू असलेल्या बांधकामामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. बांधकामामुळे दोन्ही बाजूला अरुंद रस्ता उरला आहे. शिवाय या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर पाणी साचलेले असते. यामुळे दुचाकी घसरण्याचा धोका आहे. यामुळे येथून सुलभतेने वाहने चालविण्यात अडचणी येत आहे. यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होत आहे.शहरात मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. पिलर उभारले जात आहे. त्यासाठी रस्त्याच्या मधील जागा दोन्ही बाजूंनी टीन शेड लावून सुरक्षित करण्यात आली आहे. वाहने जाण्यासाठी उरलेल्या रस्त्यावर खड्डे पडले असतील तर आवश्यक तेथे डांबरीकरण करण्यात आले आहे. काही ठिकाणी तर रस्त्याच्या बाजूचीही जागा समतल करण्यात आली आहे. रस्ता अरुंद झाल्यामुळे कुठेही वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये याची विशेष काळजी घेतली जात आहे. वाहनांचा अपघात होऊ नये म्हणून चौकाचौकात सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे उभारण्यात येत असलेल्या नासुप्र व ते पागलखाना चौकापर्यंतच्या उड्डाणपुलाच्या बांधकामात अशी कुठलीच खबरदारी घेण्यात आलेली नाही.