शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
5
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
6
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
7
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
8
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
9
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
10
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
11
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
13
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
14
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
15
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
16
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
17
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
18
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
19
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
20
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

शिक्षणमंत्र्यांकडून संघप्रणीत शाळांना विशेष वागणूक

By admin | Updated: February 9, 2016 02:55 IST

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे सोमवारी संघभूमीत दौऱ्यावर आले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित शाळांना त्यांच्याकडून विशेष वागणूक देण्यात आल्याचे दिसून आले.

संस्था प्रतिनिधींची घेतली वेगळी बैठक : प्रतिक्रिया देताना, ‘नरो वा कुंजरो वा’नागपूर : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे सोमवारी संघभूमीत दौऱ्यावर आले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित शाळांना त्यांच्याकडून विशेष वागणूक देण्यात आल्याचे दिसून आले. त्यांनी संघप्रणीत शाळांची विशेष बैठक घेतली. आणि विशेष म्हणजे या बैठकीबाबत विचारणा केली असता स्पष्टवक्तेपणा बाजूला सारून त्यांनी चक्क ‘नरो वा कुंजरो वा’ अशी भूमिका घेतली. तावडे यांनी केवळ संघाशी संबंधित शाळांची बैठक घेतल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.सोमवारी शिक्षणमंत्री तावडे विविध कार्यक्रमांसाठी नागपुरात आले होते. त्यांंच्या दौऱ्यात दुपारी १२ वाजता संघाशी संबंधित शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांशी संवादासाठी वेळ राखीव असल्याचे नमूद होते. त्यानुसार त्यांनी विविध शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यात शाळांच्या समस्या, पुढील दिशा, शासनाकडून अपेक्षा इत्यादी बाबी त्यांनी जाणून घेतल्या. परंतु यासंदर्भात ज्यावेळी तावडे यांना विचारणा करण्यात आली, तेव्हा चक्क अशी बैठकच झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. ज्यावेळी त्यांना शासकीय दौऱ्याच्या पत्रकाबाबत सांगण्यात आले, तेव्हा कुठे त्यांनी अशी बैठक झाल्याचे मान्य केले.केवळ संघपरिवारातील शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींसोबतच चर्चा करण्याचे प्रयोजन का, याबाबत त्यांना विचारणा केली असता ते कुठलेही ठोस उत्तर देऊ शकले नाही. यापूर्वी अशाच प्रकारे अल्पसंख्यक शाळांची बैठक बोलविली असल्याचे उत्तर देत त्यांनी मूळ प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. एरवी तावडे हे स्पष्टवक्ते म्हणून ओळखल्या जातात. अगदी विधिमंडळाच्या सभागृहातदेखील याचे अनेकदा दर्शन झाले आहे. अशास्थितीत संघभूमीत संघाशीच जुळलेल्या संस्थांची वेगळी बैठक घेण्याचे कारण का, याबाबत त्यांनी साधलेल्या मौनामुळे प्रश्नांमध्ये आणखी वाढच झाली आहे.(प्रतिनिधी)इतर शाळांचे काय?राज्याप्रमाणेच नागपूर विभागातील शाळांचेदेखील विविध प्रश्न व अडचणी आहेत. शासनासाठी सर्वच शाळा समान असणे अपेक्षित आहे. परंतु केवळ संघप्रणीत शाळांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून इतर शाळांकडे दुर्लक्ष करणे कितपत योग्य आहे; तसेच शिक्षण प्रणालीत बदलाचे वारे वाहत असताना पुरोगामी महाराष्ट्रात शाळांना विचारसरणीप्रमाणे महत्त्व मिळणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या माध्यमातून संघाच्या पदाधिकाऱ्यांना समाधानी करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, अशी चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू होती.