शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

शिक्षणमंत्र्यांकडून संघप्रणीत शाळांना विशेष वागणूक

By admin | Updated: February 9, 2016 02:55 IST

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे सोमवारी संघभूमीत दौऱ्यावर आले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित शाळांना त्यांच्याकडून विशेष वागणूक देण्यात आल्याचे दिसून आले.

संस्था प्रतिनिधींची घेतली वेगळी बैठक : प्रतिक्रिया देताना, ‘नरो वा कुंजरो वा’नागपूर : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे सोमवारी संघभूमीत दौऱ्यावर आले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित शाळांना त्यांच्याकडून विशेष वागणूक देण्यात आल्याचे दिसून आले. त्यांनी संघप्रणीत शाळांची विशेष बैठक घेतली. आणि विशेष म्हणजे या बैठकीबाबत विचारणा केली असता स्पष्टवक्तेपणा बाजूला सारून त्यांनी चक्क ‘नरो वा कुंजरो वा’ अशी भूमिका घेतली. तावडे यांनी केवळ संघाशी संबंधित शाळांची बैठक घेतल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.सोमवारी शिक्षणमंत्री तावडे विविध कार्यक्रमांसाठी नागपुरात आले होते. त्यांंच्या दौऱ्यात दुपारी १२ वाजता संघाशी संबंधित शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांशी संवादासाठी वेळ राखीव असल्याचे नमूद होते. त्यानुसार त्यांनी विविध शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यात शाळांच्या समस्या, पुढील दिशा, शासनाकडून अपेक्षा इत्यादी बाबी त्यांनी जाणून घेतल्या. परंतु यासंदर्भात ज्यावेळी तावडे यांना विचारणा करण्यात आली, तेव्हा चक्क अशी बैठकच झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. ज्यावेळी त्यांना शासकीय दौऱ्याच्या पत्रकाबाबत सांगण्यात आले, तेव्हा कुठे त्यांनी अशी बैठक झाल्याचे मान्य केले.केवळ संघपरिवारातील शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींसोबतच चर्चा करण्याचे प्रयोजन का, याबाबत त्यांना विचारणा केली असता ते कुठलेही ठोस उत्तर देऊ शकले नाही. यापूर्वी अशाच प्रकारे अल्पसंख्यक शाळांची बैठक बोलविली असल्याचे उत्तर देत त्यांनी मूळ प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. एरवी तावडे हे स्पष्टवक्ते म्हणून ओळखल्या जातात. अगदी विधिमंडळाच्या सभागृहातदेखील याचे अनेकदा दर्शन झाले आहे. अशास्थितीत संघभूमीत संघाशीच जुळलेल्या संस्थांची वेगळी बैठक घेण्याचे कारण का, याबाबत त्यांनी साधलेल्या मौनामुळे प्रश्नांमध्ये आणखी वाढच झाली आहे.(प्रतिनिधी)इतर शाळांचे काय?राज्याप्रमाणेच नागपूर विभागातील शाळांचेदेखील विविध प्रश्न व अडचणी आहेत. शासनासाठी सर्वच शाळा समान असणे अपेक्षित आहे. परंतु केवळ संघप्रणीत शाळांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून इतर शाळांकडे दुर्लक्ष करणे कितपत योग्य आहे; तसेच शिक्षण प्रणालीत बदलाचे वारे वाहत असताना पुरोगामी महाराष्ट्रात शाळांना विचारसरणीप्रमाणे महत्त्व मिळणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या माध्यमातून संघाच्या पदाधिकाऱ्यांना समाधानी करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, अशी चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू होती.