शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केंव्हा?

By admin | Updated: October 16, 2015 03:13 IST

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी देशभरातून हजारो भाविक नागपुरात येतात.

सुरक्षा यंत्रणेने घेतला धसका : भाविकांचीही होणार गैरसोयनागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी देशभरातून हजारो भाविक नागपुरात येतात. सोहळा आटोपल्यानंतर त्यांच्या परतीच्या प्रवासाची तयारी सुरू होते. भाविकांचे लोंढेच्या लोंढे रेल्वेस्थानकाकडे परततात. भाविकांच्या गर्दीसाठी रेल्वे प्रशासन सोहळ्याच्या १० ते १२ दिवस आधी विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा करते. परंतु हा सोहळा सहा दिवसांवर आला असताना अद्याप एकाही रेल्वेगाडीची घोषणा न केल्यामुळे रेल्वे स्थानकावरील सुरक्षा यंत्रणेने धसका घेतला असून भाविकांची गर्दी कशी आटोक्यात आणावी, असा प्रश्न सुरक्षा यंत्रणेला पडला आहे.धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. रेल्वे प्रशासन सर्वाधिक गर्दी असलेल्या मुंबई-पुणे मार्गावर विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करते. या रेल्वेगाड्यांमुळे भाविकांची मोठी सोय होते. भाविकांनाही लवकर रेल्वेगाड्या मिळाल्यामुळे रेल्वे सुरक्षा दल तसेच लोहमार्ग पोलिसांवरील कामाचा ताण कमी होतो. परंतु यावर्षी हा सोहळा सहा दिवसांवर आलेला असताना अद्यापही रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या संदर्भात भूमिका घेतली नसल्यामुळे सुरक्षा यंत्रणेने त्याचा धसका घेतला आहे. रेल्वेस्थानकावर भाविकांची गर्दी झाल्यास त्याचा मनस्ताप सुरक्षा यंत्रणेलाच होणार आहे. दोन दिवसांपूर्वी लोहमार्ग पोलीस अप्पर महासंचालक डी. कनकरत्नम यांनी नागपूर आणि अजनी रेल्वेस्थानकाचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यातही त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. यावरून या विशेष रेल्वेगाड्या सुरक्षा यंत्रणेसाठी किती महत्त्वाच्या आहेत, याची कल्पना येते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने लवकरच याबाबत निर्णय घेण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)