शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

२५ मेपासून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष मोहीम

By admin | Updated: May 21, 2017 18:44 IST

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकारच्या विविध कृषी योजनांचे विशेष अभियान ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहीम’ २५ मेपासून संपूर्ण राज्यात सुरू करण्यात येत आहे.

मिलिंद कीर्तीचंद्रपूर : शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकारच्या विविध कृषी योजनांचे विशेष अभियान ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहीम’ २५ मेपासून संपूर्ण राज्यात सुरू करण्यात येत आहे. त्यामध्ये तालुका घटक ठरवून पीक प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. यात शास्त्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी सोयाबीन, धान, कापूस आणि तूर आदी पिकांचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, राष्ट्रीय गळीत धान्य आणि तेलताड अभियानाअंतर्गत प्रात्यक्षिक घेतले जाईल.या मोहिमेत प्रत्येक तालुक्यात एका कृषी सहायकाच्या अधिनस्त १० हेक्टर क्षेत्राची निवड करण्यात येणार आहे. गावात स्वेच्छेने पीक प्रात्यक्षिक घेण्याची इच्छा असलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांकडे कृषी विभागाने माती व हवामान पाहून पीक प्रात्यक्षिक घ्यायचे ठरविले आहे. त्याकरिता या शेतकऱ्यांनी शास्त्रीय पद्धतीने पीक लागवडीसाठी बियाणे दिले जाईल.या मोहीमे सहभागी शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या शिफारशींप्रमाणे लागवड तंत्रज्ञान उपयोगात आणावे लागेल. कृषी विभागाचे कृषी सहायक किंवा कृषी विज्ञान केंद्रांचे तज्ज्ञ वेळोवेळी मार्गदर्शन करतील. खताची मात्रा व पीक संरक्षण औषधीच्या मात्रा मार्गदर्शक सूचनेप्रमाणे पिकांना द्याव्या लागतील. शेतकरी कृषी विद्यापीठाच्या शिफारसींप्रमाणे खताचा वापर करीत नाही. उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहिमेत सेंद्रीय खताच्या वापरावर भर देण्यात आला आहे. ज्यांना ‘नीम’ कोटेड खत वापरणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही, त्यांना गांडूळ खत, बायोेडायनॉमिक डेपो आदीचा उपयोग करण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. या मोहिमेतून पीक कर्जापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.