शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
2
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
3
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
4
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
5
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
6
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
7
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
8
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
9
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
10
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
11
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
12
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
13
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
14
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
15
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
16
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
17
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
18
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
19
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

२५ मेपासून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष मोहीम

By admin | Updated: May 21, 2017 18:44 IST

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकारच्या विविध कृषी योजनांचे विशेष अभियान ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहीम’ २५ मेपासून संपूर्ण राज्यात सुरू करण्यात येत आहे.

मिलिंद कीर्तीचंद्रपूर : शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकारच्या विविध कृषी योजनांचे विशेष अभियान ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहीम’ २५ मेपासून संपूर्ण राज्यात सुरू करण्यात येत आहे. त्यामध्ये तालुका घटक ठरवून पीक प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. यात शास्त्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी सोयाबीन, धान, कापूस आणि तूर आदी पिकांचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, राष्ट्रीय गळीत धान्य आणि तेलताड अभियानाअंतर्गत प्रात्यक्षिक घेतले जाईल.या मोहिमेत प्रत्येक तालुक्यात एका कृषी सहायकाच्या अधिनस्त १० हेक्टर क्षेत्राची निवड करण्यात येणार आहे. गावात स्वेच्छेने पीक प्रात्यक्षिक घेण्याची इच्छा असलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांकडे कृषी विभागाने माती व हवामान पाहून पीक प्रात्यक्षिक घ्यायचे ठरविले आहे. त्याकरिता या शेतकऱ्यांनी शास्त्रीय पद्धतीने पीक लागवडीसाठी बियाणे दिले जाईल.या मोहीमे सहभागी शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या शिफारशींप्रमाणे लागवड तंत्रज्ञान उपयोगात आणावे लागेल. कृषी विभागाचे कृषी सहायक किंवा कृषी विज्ञान केंद्रांचे तज्ज्ञ वेळोवेळी मार्गदर्शन करतील. खताची मात्रा व पीक संरक्षण औषधीच्या मात्रा मार्गदर्शक सूचनेप्रमाणे पिकांना द्याव्या लागतील. शेतकरी कृषी विद्यापीठाच्या शिफारसींप्रमाणे खताचा वापर करीत नाही. उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहिमेत सेंद्रीय खताच्या वापरावर भर देण्यात आला आहे. ज्यांना ‘नीम’ कोटेड खत वापरणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही, त्यांना गांडूळ खत, बायोेडायनॉमिक डेपो आदीचा उपयोग करण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. या मोहिमेतून पीक कर्जापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.