शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेसाठी विशेष मोहीम!

By admin | Updated: July 30, 2014 01:18 IST

राष्ट्रीय पीक विमा योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूर व रामटेक उपविभागीय कार्यालयाच्यातर्फे विशेष मोहीम राबविली जात आहे.

शेवटचे दोन दिवस : ३१ जुलै रोजी मुदत संपणार नागपूर : राष्ट्रीय पीक विमा योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूर व रामटेक उपविभागीय कार्यालयाच्यातर्फे विशेष मोहीम राबविली जात आहे. यात कृषी विभागाचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून, त्यांना योजनेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. तसेच गावागावातील ग्रामपंचायत कार्यालयात योजनेचे पोस्टर लावून, योजनेचा युद्धपातळीवर प्रचार-प्रसार केला जात आहे. यामुळे या योजनेला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, गत आठवडाभरात शेकडो शेतकऱ्यांनी पीक विमा काढून, योजनेचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे, या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत असून, त्याला आता केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत नागपूर व रामटेक उपविभागातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा काढून योजनेचा लाभ घ्यावा, असे उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. दुष्काळ, पूर, भूस्खलन, चक्रीवादळ व गारपिट अशा नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण कवच प्रदान करून, त्यांना नुकसानभरपाई मिळावी, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार अशा दोन्ही शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. यात शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस, भात, ज्वारी, उडीद, मुग, तूर व भूईमुग अशा कोणत्याही पिकांचा विमा काढता येतो. यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या (सरासरी) उत्पादनांच्या १५० टक्क्यांपर्यंत विमा काढता येणार आहे.(प्रतिनिधी) नुकसानाची ४८ तासात माहिती कळवा विशेष म्हणजे, या योजनेत शेतकऱ्यांना फारच कमी विमा हप्ता भरायचा असून, एकूण विमा हप्त्यापैकी अर्धी रक्कम राज्य व केंद्र सरकारतर्फे जमा केली जाणार आहे. मात्र योजनेत सहभागी झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांच्या पिकांचे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास, त्याची संबंधित बँक किंवा भारतीय कृषी विमा कंपनीला ४८ तासात माहिती देणे अनिवार्य आहे. त्यामुळे भविष्यात कोणत्याही विमाधारक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास, शेतकऱ्यांनी त्याची तत्काळ संबंधित बँकेला माहिती द्यावी, असेही उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे यांनी आवाहन केले आहे.