शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

पीक विमा योजनेसाठी विशेष मोहीम!

By admin | Updated: July 30, 2014 01:18 IST

राष्ट्रीय पीक विमा योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूर व रामटेक उपविभागीय कार्यालयाच्यातर्फे विशेष मोहीम राबविली जात आहे.

शेवटचे दोन दिवस : ३१ जुलै रोजी मुदत संपणार नागपूर : राष्ट्रीय पीक विमा योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूर व रामटेक उपविभागीय कार्यालयाच्यातर्फे विशेष मोहीम राबविली जात आहे. यात कृषी विभागाचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून, त्यांना योजनेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. तसेच गावागावातील ग्रामपंचायत कार्यालयात योजनेचे पोस्टर लावून, योजनेचा युद्धपातळीवर प्रचार-प्रसार केला जात आहे. यामुळे या योजनेला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, गत आठवडाभरात शेकडो शेतकऱ्यांनी पीक विमा काढून, योजनेचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे, या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत असून, त्याला आता केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत नागपूर व रामटेक उपविभागातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा काढून योजनेचा लाभ घ्यावा, असे उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. दुष्काळ, पूर, भूस्खलन, चक्रीवादळ व गारपिट अशा नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण कवच प्रदान करून, त्यांना नुकसानभरपाई मिळावी, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार अशा दोन्ही शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. यात शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस, भात, ज्वारी, उडीद, मुग, तूर व भूईमुग अशा कोणत्याही पिकांचा विमा काढता येतो. यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या (सरासरी) उत्पादनांच्या १५० टक्क्यांपर्यंत विमा काढता येणार आहे.(प्रतिनिधी) नुकसानाची ४८ तासात माहिती कळवा विशेष म्हणजे, या योजनेत शेतकऱ्यांना फारच कमी विमा हप्ता भरायचा असून, एकूण विमा हप्त्यापैकी अर्धी रक्कम राज्य व केंद्र सरकारतर्फे जमा केली जाणार आहे. मात्र योजनेत सहभागी झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांच्या पिकांचे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास, त्याची संबंधित बँक किंवा भारतीय कृषी विमा कंपनीला ४८ तासात माहिती देणे अनिवार्य आहे. त्यामुळे भविष्यात कोणत्याही विमाधारक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास, शेतकऱ्यांनी त्याची तत्काळ संबंधित बँकेला माहिती द्यावी, असेही उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे यांनी आवाहन केले आहे.