शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
4
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
5
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
6
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
7
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
8
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
9
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
10
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
11
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
12
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
13
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
14
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
15
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
16
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
17
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
18
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
19
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
20
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...

अन्नधान्य पुरवठा व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे विशेष लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असताना संपूर्ण यंत्रणा रुग्णसेवेत लागली आहे. मात्र, यासोबतच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असताना संपूर्ण यंत्रणा रुग्णसेवेत लागली आहे. मात्र, यासोबतच लॉकडाऊनच्या काळामधील अन्नधान्य पुरवठा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, लसीकरण, गृह अलगीकरण, मायक्रो झोन निर्मिती, कॉल सेंटरची संपर्क व्यवस्था या बाबींची काळजी घेण्याचे निर्देश ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

नागपूर शहरातील कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

नागपूर जिल्ह्यामध्ये सध्या ७ लाख ६१४ शिधापत्रिकाधारक आहेत. जिल्ह्यात तेराशे स्वस्त धान्य दुकाने आहेत. अंत्योदयमध्ये ७७ हजार ७८ शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. प्राधान्य धारकांमध्ये ३ लाख १५ हजार ८२ शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. या सर्वांना प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मोफत वाटप केले जाणे आवश्यक आहे. मात्र, हे वाटप करताना शिधापत्रिकाधारकांपैकी अनेकजण पॉझिटिव्ह असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात स्वस्त धान्य दुकानदारांनी आक्षेप घेतला आहे. सरकारने रेशन दुकानदारांना पॉश मशीनद्वारे वाटपाची असणारी अट शिथील करावी तसेच त्यांना विम्याचे कवच द्यावे, अशी मागणी पुढे आली असून, या संदर्भात काय उपाययोजना करता येईल, याबाबत प्रशासनाने तोडगा काढावा. याविषयी प्रसंगी वरिष्ठांशी चर्चा करता येईल, असेही सांगितले.

एफसीआयमधून अद्याप धान्याची उचल व्हायची आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांमध्ये वितरण सुरू होण्यापूर्वी सर्व समस्या निकाली काढण्याचे निर्देशही दिले.

बॉक्स

प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णामागे किमान १० ते १५ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्हावे.

पूर्वीप्रमाणे प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णामागे किमान १० ते १५ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्हायला हवे, असे निर्देश पालकमंत्री राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले. गृह अलगीकरण, मायक्रो झोनमधील रुग्णांशी सातत्याचा संपर्क असणे आवश्यक आहे. मुंबई मनपाने रुग्णांशी संपर्क साधण्यासाठी विशेष व्यवस्था उभारली आहे. त्या मॉडेलचा नागपूरमध्ये उपयोग होतो का, याची चाचपणी करण्यासही त्यांनी सांगितले. महानगरपालिकेने कॉल सेंटर सुरू केले आहे, मात्र त्यातून नागरिकांचे समाधान होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.