शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
7
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
8
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
9
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
10
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
11
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
12
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
13
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
14
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
15
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
19
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
20
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण

अन्नधान्य पुरवठा व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे विशेष लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असताना संपूर्ण यंत्रणा रुग्णसेवेत लागली आहे. मात्र, यासोबतच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असताना संपूर्ण यंत्रणा रुग्णसेवेत लागली आहे. मात्र, यासोबतच लॉकडाऊनच्या काळामधील अन्नधान्य पुरवठा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, लसीकरण, गृह अलगीकरण, मायक्रो झोन निर्मिती, कॉल सेंटरची संपर्क व्यवस्था या बाबींची काळजी घेण्याचे निर्देश ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

नागपूर शहरातील कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

नागपूर जिल्ह्यामध्ये सध्या ७ लाख ६१४ शिधापत्रिकाधारक आहेत. जिल्ह्यात तेराशे स्वस्त धान्य दुकाने आहेत. अंत्योदयमध्ये ७७ हजार ७८ शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. प्राधान्य धारकांमध्ये ३ लाख १५ हजार ८२ शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. या सर्वांना प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मोफत वाटप केले जाणे आवश्यक आहे. मात्र, हे वाटप करताना शिधापत्रिकाधारकांपैकी अनेकजण पॉझिटिव्ह असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात स्वस्त धान्य दुकानदारांनी आक्षेप घेतला आहे. सरकारने रेशन दुकानदारांना पॉश मशीनद्वारे वाटपाची असणारी अट शिथील करावी तसेच त्यांना विम्याचे कवच द्यावे, अशी मागणी पुढे आली असून, या संदर्भात काय उपाययोजना करता येईल, याबाबत प्रशासनाने तोडगा काढावा. याविषयी प्रसंगी वरिष्ठांशी चर्चा करता येईल, असेही सांगितले.

एफसीआयमधून अद्याप धान्याची उचल व्हायची आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांमध्ये वितरण सुरू होण्यापूर्वी सर्व समस्या निकाली काढण्याचे निर्देशही दिले.

बॉक्स

प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णामागे किमान १० ते १५ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्हावे.

पूर्वीप्रमाणे प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णामागे किमान १० ते १५ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्हायला हवे, असे निर्देश पालकमंत्री राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले. गृह अलगीकरण, मायक्रो झोनमधील रुग्णांशी सातत्याचा संपर्क असणे आवश्यक आहे. मुंबई मनपाने रुग्णांशी संपर्क साधण्यासाठी विशेष व्यवस्था उभारली आहे. त्या मॉडेलचा नागपूरमध्ये उपयोग होतो का, याची चाचपणी करण्यासही त्यांनी सांगितले. महानगरपालिकेने कॉल सेंटर सुरू केले आहे, मात्र त्यातून नागरिकांचे समाधान होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.