शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

१५० हेक्टरमधील सोयाबीन, कपाशीच्या पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : तालुक्यातील बेला, सिर्सी आणि मकरधोकडा परिसरात गुरुवारी (दि. १७) सायंकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : तालुक्यातील बेला, सिर्सी आणि मकरधोकडा परिसरात गुरुवारी (दि. १७) सायंकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे या भागातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. पात्रातील पाणी लगतच्या शेतात शिरल्याने त्या किमान १५० हेक्टर शेतातील साेयाबीन व कपाशीचे पीक खरडून गेले आहे. याच शेतात पाणी साचून राहिल्याने उर्वरित पिके सडण्याची व त्या २५० शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढवण्याची शक्यता बळावली आहे.

याच काळात काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे उमरेड तालुक्यातील मसाळा, गोधनी, मेटमांगरूळ, तेलकवडसी, सुकळी, जुनोनी, दिघोरी आदी शिवारातील पिके उद्ध्वस्त झाल्याचे त्या गावांमधील अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात आपण तहसीलदार प्रमोद कदम यांना निवेदन दिले असून, या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून याेग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

या नुकसानग्रस्त पिकांपैकी काही भागाचे काही प्रमाणात सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती तलाठी रोशन बारमासे यांनी दिली. कृषी विभागातील कर्मचाऱ्यांसाेबत आणखी सर्वेक्षण करावे लागणार असल्याचेही राेशन बारमासे यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, शासन व प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जयदेव आंबुलकर, प्रकाश राठोड, नामदेव कंगाले, प्रणित जाधव, हरिभाऊ उरकुडे, अनिल माटे, इंदिरा नागदेवते, विलास उरकुडे, अरुण देवगडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.

...

११० मिमी पावसाची नाेंद

गुरुवारी (दि. १७) सिर्सी (ता. उमरेड) मंडळात (महसूल) तब्बल ११० मिमी पाऊस काेसळल्याची नोंद करण्यात आली. या मुसळधार पावसाने बेला शिवारालाही झोडपले. या परिसरात ३३.२ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. या पावसाचा परिसरातील सावंगी, चनोडा, हिवरा, बेला-सिर्सी व लगतच्या शिवारातील पिकांनाही फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवल्याची प्रतिक्रिया या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

...

आधीच बियाण्याचा तुटवडा...

मागील खरीप हंगामात सोयाबीन पिकावर झालेला किडी व येल्लो मोझॅकचा प्रादुर्भाव यामुळे साेयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यातच कापणीच्यावेळी आलेल्या परतीचा पावसामुळे साेयाबीनची प्रत आधीच खालावली हाेती. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात साेयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने दरही प्रचंड वाढले आहे. त्याच दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने आता पेरणीसाठी साेयाबीन बियाणे आणायचे कुठून असा प्रश्नही शेतकऱ्यांसमाेर निर्माण झाला आहे.

....

आधीच आर्थिक संकटं पाचवीला पुजली आहेत. मुसळधार पावसाने सर्व मेहनत व पेरणीसाठी केलेल्या खर्चावर पाणी फेरले. आमच्या भागातील शेतकरी आता हताश झाले आहेत. दुबार पेरणीसाठी शासनाने तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यायला हवी.

- जयदेव आंबुलकर, नुकसानग्रस्त शेतकरी,

गोधनी, ता. उमरेड.