शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

१५० हेक्टरमधील सोयाबीन, कपाशीच्या पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : तालुक्यातील बेला, सिर्सी आणि मकरधोकडा परिसरात गुरुवारी (दि. १७) सायंकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : तालुक्यातील बेला, सिर्सी आणि मकरधोकडा परिसरात गुरुवारी (दि. १७) सायंकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे या भागातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. पात्रातील पाणी लगतच्या शेतात शिरल्याने त्या किमान १५० हेक्टर शेतातील साेयाबीन व कपाशीचे पीक खरडून गेले आहे. याच शेतात पाणी साचून राहिल्याने उर्वरित पिके सडण्याची व त्या २५० शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढवण्याची शक्यता बळावली आहे.

याच काळात काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे उमरेड तालुक्यातील मसाळा, गोधनी, मेटमांगरूळ, तेलकवडसी, सुकळी, जुनोनी, दिघोरी आदी शिवारातील पिके उद्ध्वस्त झाल्याचे त्या गावांमधील अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात आपण तहसीलदार प्रमोद कदम यांना निवेदन दिले असून, या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून याेग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

या नुकसानग्रस्त पिकांपैकी काही भागाचे काही प्रमाणात सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती तलाठी रोशन बारमासे यांनी दिली. कृषी विभागातील कर्मचाऱ्यांसाेबत आणखी सर्वेक्षण करावे लागणार असल्याचेही राेशन बारमासे यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, शासन व प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जयदेव आंबुलकर, प्रकाश राठोड, नामदेव कंगाले, प्रणित जाधव, हरिभाऊ उरकुडे, अनिल माटे, इंदिरा नागदेवते, विलास उरकुडे, अरुण देवगडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.

...

११० मिमी पावसाची नाेंद

गुरुवारी (दि. १७) सिर्सी (ता. उमरेड) मंडळात (महसूल) तब्बल ११० मिमी पाऊस काेसळल्याची नोंद करण्यात आली. या मुसळधार पावसाने बेला शिवारालाही झोडपले. या परिसरात ३३.२ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. या पावसाचा परिसरातील सावंगी, चनोडा, हिवरा, बेला-सिर्सी व लगतच्या शिवारातील पिकांनाही फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवल्याची प्रतिक्रिया या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

...

आधीच बियाण्याचा तुटवडा...

मागील खरीप हंगामात सोयाबीन पिकावर झालेला किडी व येल्लो मोझॅकचा प्रादुर्भाव यामुळे साेयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यातच कापणीच्यावेळी आलेल्या परतीचा पावसामुळे साेयाबीनची प्रत आधीच खालावली हाेती. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात साेयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने दरही प्रचंड वाढले आहे. त्याच दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने आता पेरणीसाठी साेयाबीन बियाणे आणायचे कुठून असा प्रश्नही शेतकऱ्यांसमाेर निर्माण झाला आहे.

....

आधीच आर्थिक संकटं पाचवीला पुजली आहेत. मुसळधार पावसाने सर्व मेहनत व पेरणीसाठी केलेल्या खर्चावर पाणी फेरले. आमच्या भागातील शेतकरी आता हताश झाले आहेत. दुबार पेरणीसाठी शासनाने तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यायला हवी.

- जयदेव आंबुलकर, नुकसानग्रस्त शेतकरी,

गोधनी, ता. उमरेड.