शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
2
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
3
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
4
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
6
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
7
अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
8
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
9
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
10
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
11
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
12
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
13
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
14
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
16
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
17
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
18
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
19
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
20
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
Daily Top 2Weekly Top 5

१५० हेक्टरमधील सोयाबीन, कपाशीच्या पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : तालुक्यातील बेला, सिर्सी आणि मकरधोकडा परिसरात गुरुवारी (दि. १७) सायंकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : तालुक्यातील बेला, सिर्सी आणि मकरधोकडा परिसरात गुरुवारी (दि. १७) सायंकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे या भागातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. पात्रातील पाणी लगतच्या शेतात शिरल्याने त्या किमान १५० हेक्टर शेतातील साेयाबीन व कपाशीचे पीक खरडून गेले आहे. याच शेतात पाणी साचून राहिल्याने उर्वरित पिके सडण्याची व त्या २५० शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढवण्याची शक्यता बळावली आहे.

याच काळात काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे उमरेड तालुक्यातील मसाळा, गोधनी, मेटमांगरूळ, तेलकवडसी, सुकळी, जुनोनी, दिघोरी आदी शिवारातील पिके उद्ध्वस्त झाल्याचे त्या गावांमधील अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात आपण तहसीलदार प्रमोद कदम यांना निवेदन दिले असून, या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून याेग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

या नुकसानग्रस्त पिकांपैकी काही भागाचे काही प्रमाणात सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती तलाठी रोशन बारमासे यांनी दिली. कृषी विभागातील कर्मचाऱ्यांसाेबत आणखी सर्वेक्षण करावे लागणार असल्याचेही राेशन बारमासे यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, शासन व प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जयदेव आंबुलकर, प्रकाश राठोड, नामदेव कंगाले, प्रणित जाधव, हरिभाऊ उरकुडे, अनिल माटे, इंदिरा नागदेवते, विलास उरकुडे, अरुण देवगडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.

...

११० मिमी पावसाची नाेंद

गुरुवारी (दि. १७) सिर्सी (ता. उमरेड) मंडळात (महसूल) तब्बल ११० मिमी पाऊस काेसळल्याची नोंद करण्यात आली. या मुसळधार पावसाने बेला शिवारालाही झोडपले. या परिसरात ३३.२ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. या पावसाचा परिसरातील सावंगी, चनोडा, हिवरा, बेला-सिर्सी व लगतच्या शिवारातील पिकांनाही फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवल्याची प्रतिक्रिया या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

...

आधीच बियाण्याचा तुटवडा...

मागील खरीप हंगामात सोयाबीन पिकावर झालेला किडी व येल्लो मोझॅकचा प्रादुर्भाव यामुळे साेयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यातच कापणीच्यावेळी आलेल्या परतीचा पावसामुळे साेयाबीनची प्रत आधीच खालावली हाेती. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात साेयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने दरही प्रचंड वाढले आहे. त्याच दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने आता पेरणीसाठी साेयाबीन बियाणे आणायचे कुठून असा प्रश्नही शेतकऱ्यांसमाेर निर्माण झाला आहे.

....

आधीच आर्थिक संकटं पाचवीला पुजली आहेत. मुसळधार पावसाने सर्व मेहनत व पेरणीसाठी केलेल्या खर्चावर पाणी फेरले. आमच्या भागातील शेतकरी आता हताश झाले आहेत. दुबार पेरणीसाठी शासनाने तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यायला हवी.

- जयदेव आंबुलकर, नुकसानग्रस्त शेतकरी,

गोधनी, ता. उमरेड.