शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
2
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
3
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
4
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
5
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
6
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
7
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
8
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
9
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
10
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
11
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
12
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
13
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
14
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
15
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
16
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
17
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
18
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
19
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
20
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी

सोय वऱ्हाडींची, गैरसोय विद्यार्थ्यांची

By admin | Updated: January 22, 2016 03:18 IST

राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या आयोजनाचा यंदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर

‘इंद्रधनुष्य’चे आज होणार उद्घाटन : खोल्यांसाठी कुडकुडत प्रतीक्षा, ब्लँकेट्ससाठी पायपीट नागपूर : राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या आयोजनाचा यंदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला मान मिळाला आहे. ‘नॅक’तर्फे ‘अ’ दर्जा मिळालेले विद्यापीठ असल्याने राज्यभरातील विविध विद्यापीठांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगली सोय होईल, असे अपेक्षित होते. परंतु विद्यार्थ्यांचा मात्र भ्रमनिरास झाला. अनेक विद्यार्थ्यांना बोचऱ्या थंडीत खोल्या मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली तर सायंकाळी उशिरा गादी व ब्लँकेट्ससाठी विद्यार्थ्यांची पायपीट सुरू असल्याचे दृश्य पहायला मिळाले. या असुविधेबाबत अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.‘इंद्रधनुष्य’चे शुक्रवार २२ जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवासाठी राज्यभरातील विद्यापीठांतील विद्यार्थी येथे विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. बाहेरील विद्यापीठांतील विद्यार्थी येण्यास गुरुवार दुपारपासूनच सुरुवात झाली. या विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था आमदार निवासात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची असुविधा होऊ नये यासाठी रेल्वेस्थानकावरून ‘पिक अप’ची सोयदेखील करण्यात आली होती. काही कनिष्ठ कर्मचारी आमदार निवासात नोंदणीसाठी उपस्थितदेखील होते. परंतु आमदार निवास प्रशासनासोबत विद्यापीठातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा समन्वय नसल्याचे दिसून आले. गुरुवारी आमदार निवासातील प्रांगणात लग्नाच्या ‘रिसेप्शन’चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी काही खोल्या लग्नातील वऱ्हाड्यांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे दुपारी आलेल्या अकोला विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांची सोय तात्पुरती दुसऱ्या खोल्यांमध्ये करण्यात आली. रात्री खोल्या बदलून मिळतील, असे त्यांना सांगण्यात आले. मुंबई येथील ‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या विद्यार्थिनी गुरुवारी सायंकाळी पोहोचल्या. परंतु खोल्यांची सोय व्हायची असल्यामुळे या मुलींना सामानासह सुमारे पाऊण तास बोचऱ्या थंडीत बाहेरच बसावे लागले. दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची चमू दुपारच्या सुमारास आमदार निवासात पोहोचली. परंतु सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याची सोय झालेली नव्हती. काही विद्यार्थ्यांनी खिशातील पैसे खर्च करून पोटपूजा केली. सायंकाळी विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था झाली. थंडीत विद्यार्थ्यांचे भागम्भाग !४नागपुरात या आठवड्यात थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पांघरुणाच्या सोयीची विचारणा केली. परंतु अनेक विद्यापीठातील विद्यार्थी दुपारपासून येऊनदेखील त्यांना गाद्या, ब्लँकेट्स पुरविण्यात आले नव्हते. प्रवासामुळे थकलेले अनेक विद्यार्थी तसेच झोपी गेले. सायंकाळी अखेर विद्यापीठातील अधिकाऱ्यांना ही बाब कळल्यानंतर संबंधित सोय करण्यात आली. परंतु या गाद्या, ब्लँकेट्सदेखील विद्यार्थ्यांनाच उचलून न्यावे लागले. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ तसेच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली.विद्यापीठाचा दावा, ‘आॅल इज वेल’विद्यापीठाचे माध्यम समन्वयक डॉ.श्याम धोंड यांना विचारणा केली असता विद्यापीठाने सर्व व्यवस्था चोख ठेवली असल्याचा त्यांनी दावा केला. गुरुवारी सायंकाळपर्यंत ११ विद्यापीठांच्या चमू पोहोचल्या होत्या. लग्नसमारंभासाठी खोल्यांचे ‘बुकिंग’ अगोदरपासून झाल्यामुळे काही खोल्या लगेच मिळाल्या नाहीत. परंतु यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली नाही अशी माहिती त्यांनी दिली. लग्नाच्या ‘बुकिंग’ची अगोदरपासून प्रशासनाला माहिती नव्हती का असा प्रश्न उपस्थित होत आहे.