शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

सोय वऱ्हाडींची, गैरसोय विद्यार्थ्यांची

By admin | Updated: January 22, 2016 03:18 IST

राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या आयोजनाचा यंदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर

‘इंद्रधनुष्य’चे आज होणार उद्घाटन : खोल्यांसाठी कुडकुडत प्रतीक्षा, ब्लँकेट्ससाठी पायपीट नागपूर : राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या आयोजनाचा यंदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला मान मिळाला आहे. ‘नॅक’तर्फे ‘अ’ दर्जा मिळालेले विद्यापीठ असल्याने राज्यभरातील विविध विद्यापीठांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगली सोय होईल, असे अपेक्षित होते. परंतु विद्यार्थ्यांचा मात्र भ्रमनिरास झाला. अनेक विद्यार्थ्यांना बोचऱ्या थंडीत खोल्या मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली तर सायंकाळी उशिरा गादी व ब्लँकेट्ससाठी विद्यार्थ्यांची पायपीट सुरू असल्याचे दृश्य पहायला मिळाले. या असुविधेबाबत अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.‘इंद्रधनुष्य’चे शुक्रवार २२ जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवासाठी राज्यभरातील विद्यापीठांतील विद्यार्थी येथे विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. बाहेरील विद्यापीठांतील विद्यार्थी येण्यास गुरुवार दुपारपासूनच सुरुवात झाली. या विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था आमदार निवासात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची असुविधा होऊ नये यासाठी रेल्वेस्थानकावरून ‘पिक अप’ची सोयदेखील करण्यात आली होती. काही कनिष्ठ कर्मचारी आमदार निवासात नोंदणीसाठी उपस्थितदेखील होते. परंतु आमदार निवास प्रशासनासोबत विद्यापीठातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा समन्वय नसल्याचे दिसून आले. गुरुवारी आमदार निवासातील प्रांगणात लग्नाच्या ‘रिसेप्शन’चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी काही खोल्या लग्नातील वऱ्हाड्यांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे दुपारी आलेल्या अकोला विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांची सोय तात्पुरती दुसऱ्या खोल्यांमध्ये करण्यात आली. रात्री खोल्या बदलून मिळतील, असे त्यांना सांगण्यात आले. मुंबई येथील ‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या विद्यार्थिनी गुरुवारी सायंकाळी पोहोचल्या. परंतु खोल्यांची सोय व्हायची असल्यामुळे या मुलींना सामानासह सुमारे पाऊण तास बोचऱ्या थंडीत बाहेरच बसावे लागले. दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची चमू दुपारच्या सुमारास आमदार निवासात पोहोचली. परंतु सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याची सोय झालेली नव्हती. काही विद्यार्थ्यांनी खिशातील पैसे खर्च करून पोटपूजा केली. सायंकाळी विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था झाली. थंडीत विद्यार्थ्यांचे भागम्भाग !४नागपुरात या आठवड्यात थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पांघरुणाच्या सोयीची विचारणा केली. परंतु अनेक विद्यापीठातील विद्यार्थी दुपारपासून येऊनदेखील त्यांना गाद्या, ब्लँकेट्स पुरविण्यात आले नव्हते. प्रवासामुळे थकलेले अनेक विद्यार्थी तसेच झोपी गेले. सायंकाळी अखेर विद्यापीठातील अधिकाऱ्यांना ही बाब कळल्यानंतर संबंधित सोय करण्यात आली. परंतु या गाद्या, ब्लँकेट्सदेखील विद्यार्थ्यांनाच उचलून न्यावे लागले. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ तसेच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली.विद्यापीठाचा दावा, ‘आॅल इज वेल’विद्यापीठाचे माध्यम समन्वयक डॉ.श्याम धोंड यांना विचारणा केली असता विद्यापीठाने सर्व व्यवस्था चोख ठेवली असल्याचा त्यांनी दावा केला. गुरुवारी सायंकाळपर्यंत ११ विद्यापीठांच्या चमू पोहोचल्या होत्या. लग्नसमारंभासाठी खोल्यांचे ‘बुकिंग’ अगोदरपासून झाल्यामुळे काही खोल्या लगेच मिळाल्या नाहीत. परंतु यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली नाही अशी माहिती त्यांनी दिली. लग्नाच्या ‘बुकिंग’ची अगोदरपासून प्रशासनाला माहिती नव्हती का असा प्रश्न उपस्थित होत आहे.