शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

आवाज विदर्भाचा

By admin | Updated: May 2, 2015 02:18 IST

महाराष्ट्र दिनी उपराजधानीत पालकमंत्र्यांनी ‘मेक इन नागपूर’चा संकल्प केला असताना विदर्भवाद्यांनी मात्र स्वतंत्र विदर्भाचा लोक जागर केला. ...

नागपूर : महाराष्ट्र दिनी उपराजधानीत पालकमंत्र्यांनी ‘मेक इन नागपूर’चा संकल्प केला असताना विदर्भवाद्यांनी मात्र स्वतंत्र विदर्भाचा लोक जागर केला. शहरात शुक्रवारी विविध ठिकाणी धरणे, निदर्शने, मोर्चा काढून विदर्भ राज्याच्या मागणीकडे पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधण्यात आले. ‘विदर्भ कनेक्ट’ या संघटनेने स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करीत ध्वजारोहण केले. इकडे व्हेरायटी चौकात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेत्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाण्याचा प्रयत्न करीत अटक करवून घेतली. भारिप बहुजन महासंघाने मोर्चा काढला. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तृतीयपंथीयसुद्धा मैदानात उतरले होते. त्यांनीही व्हेरायटी चौकात रास्ता रोको केला.काळा दिवस पाळला विदर्भ राज्य संघर्ष समितीने इतवारी शहीद चौक येथील विदर्भ चंडिका मंदिरात महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून साजरा केला. याप्रसंगी समितीचे केंद्रीय अध्यक्ष अण्णाजी राजेधर यांच्यासह उमेश चौबे, गणेश शर्मा, हरिभाऊ केदार, दिलीप बारापात्रे, घनशाम पुरोहित, उमेश निनावे, दीपक निलावार, जयवंत येवले, विजय कुमार शाहू, विनोदकुमार शहू, तेजिंदर सिंग रेणू, तुषार मंडलेकर, अनंत आष्टीकर आदी उपस्थित होते. शपथपत्राची होळी नाग विदर्भ आंदोलन समितीच्यावतीने सदर गांधी चौक येथे सकाळी १० वाजता स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी धरणे देण्यात आले. याप्रसंगी लोकसभा निवडणुकीच्यादरम्यान भाजपचे उमेदवार म्हणून नितीन गडकरी यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या स्थापनेसंबंधात भरून दिलेल्या शपथपत्राची होळी करण्यात आली. समितीचे पदाधिकारी अहमद कादर, प्रभाकर कोंडबत्तुनवार, अक्षय भारती, तन्हा नागपुरी, राहुल थोरात, बबलू पठाण, आश पाटील, संगीता शर्मा आदी उपस्थित होते. सरकारविरोधात निदर्शनेनागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी व्हेरायटी चौकात धरणे आंदोलन करीत स्वतंत्र विदर्भ राज्याचा नारा दिला. तब्बल तासभर नारे निदर्शने करण्यात याली. यावेळी शासनाच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या. भाजपच्या नेत्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आपले आश्वासन न पाळल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुतळ्यांचे प्रतिकात्मक दहन करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुतळ्याचे दहन होऊ शकले नाही. पोलिसांनी पुतळा आपल्या ताब्यात घेतला आणि आंदोलकांना अटक केली. राम नेवले, अरुण केदार, अ‍ॅड. नंदा पराते, दिलीप नरवडिया, राजेश श्रीवास्तव, धर्मराज रेवतकर, प्रबीरकुमार चक्रवर्ती, विष्णू आष्टीकर, कृ.द. दाभोळकर, शाम वाघ, सुनील खंडेलवाल, अरविंद भोसले, दिलीप कोहळे, रामचंद्र देशमुख,अश्वजित पाटील आदींसह शेकडो कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग होता.(प्रतिनिधी)