शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

सोनूबाई चढल्या टॉवरवर

By admin | Updated: December 10, 2015 03:00 IST

आपल्या मागणीकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील एका महिलेने तहसील कार्यालयाजवळच्या टॉवरवर चढून वीरूगिरी केली.

तहसील कार्यालयाजवळ वीरूगिरी : वृद्धाश्रमासाठी अनुदान देण्याची मागणी नागपूर : आपल्या मागणीकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील एका महिलेने तहसील कार्यालयाजवळच्या टॉवरवर चढून वीरूगिरी केली. विधानभवनापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्यामुळे प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली होती. यावेळी पोलिसांनी ‘भाईगिरी’चे प्रदर्शन करून पत्रकारांशी असभ्य वर्तन केले. त्यामुळे घटनास्थळ परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.अनुदानाची प्रतीक्षा कायम नागपूर : सोनू येवले (वय ४५) असे आंदोलक महिलेचे नाव आहे. त्या वृद्धाश्रमाची संचालिका आहे. वृद्धाश्रमाला शासनाकडून अनुदान मिळावे म्हणून येवले यांनी सरकारकडे अर्ज विनंत्या केल्या आहेत. तीन चार वर्षांपासून त्या दर वर्षी विधीमंडळाच्या अधिवेशनात येतात आणि आपल्या मागणीच्या संबंधाने शासनाकडे पाठपुरावाही करतात. मात्र, सरकारकडून लक्ष दिले जात नसल्याची भावना झाल्यामुळे संतप्त झालेल्या सोनू येवले यांनी बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या परिसरातील टॉवर गाठले. पन्नासेक फूट वर चढून येवले घोषणा देऊ लागल्या. त्यामुळे पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. पोलिसांनी टॉवरवर चढण्याचा प्रयत्न करताच त्यांनी ‘खबरदार... वर आलात तर खाली उडी घेईन’, अशी धमकी दिली. त्यामुळे पोलीस दडपणात आले. दरम्यान, प्रशासनाला ‘शोले आंदोलन’ कळल्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. अनेक अधिकाऱ्यांनी टॉवरकडे धाव घेतली. महिलेला खाली येण्याची सर्व जण विनंती करीत होते. याचवेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, छायाचित्रकारही तेथे पोहचले. परिणामी वीरूगिरी करणाऱ्या येवले मोठमोठ्यात घोषणाबाजी करू लागल्या. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मागण्यांची दखल घेऊन त्या पूर्ण कराव्या, अशी त्यांची मागणी होती. त्यांची कशी बशी समजूत काढत खाली उतरण्यासाठी राजी करण्यात आले. तब्बल दीड तासानंतर त्या खाली उतरल्या. दरम्यान, खाली गोंधळ वाढला असतानाच पोलिसांनी एका कॅमेरामनला मागे खेचले. त्याला प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. यावेळी पोलिसांनी भाईगिरी करीत पत्रकारांशी असभ्य वर्तन केले. त्यामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करून प्रकरण शांत केले. सोनू येवले यांना नंतर ताब्यात घेऊन त्यांची मुक्तता करण्यात आली.