शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बकरीच्या पिल्यावरून खुनी हल्ला करणाऱ्या  बापलेकास कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 20:32 IST

आॅनलाईन लोकमतनागपूर : बकरीचे पिलू घरी का आले, असे हटकल्याने झालेल्या भांडणातून खुनी हल्ला करून दोन भावंडांवर चाकूने हल्ला करून जखमी करणाऱ्या  आरोपी बापलेकास तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.जालंधर महादेव झिंगारे (२४) आणि ...

ठळक मुद्देतदर्थ न्यायालयाचा निकालमौदानजीकच्या तांडा येथील घटना

आॅनलाईन लोकमतनागपूर : बकरीचे पिलू घरी का आले, असे हटकल्याने झालेल्या भांडणातून खुनी हल्ला करून दोन भावंडांवर चाकूने हल्ला करून जखमी करणाऱ्या  आरोपी बापलेकास तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.जालंधर महादेव झिंगारे (२४) आणि महादेव लक्ष्मण झिंगारे (५६) दोन्ही रा. तांडा, अशी आरोपींची नावे आहेत. मुकेश मारोती फटिंग (२६) आणि सुरेश मारोती फटिंग (३०) दोन्ही रा. तांडा, अशी घटनेच्या वेळी जखमी झालेल्यांची नावे होती.खुनी हल्ल्याची ही घटना १८ जून २०१५ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली होती. जखमी फटिंग बंधू आणि झिंगारे पिता-पुत्र एकमेकांच्या शेजारी राहायचे. घटनेच्या दिवशी फटिंग बंधूंचे बकरीचे पिलू आरोपी झिंगारे यांच्या घरात शिरताच जालंधर आणि महादेव यांनी फटिंगच्या घरावर जाऊन त्यांच्याशी भांडण केले होते. मुकेशचा मोठा भाऊ सुरेश हा जन्मत:च मुका असूनही त्याने आरोपींना समजाविण्याचा प्रयत्न केला होता तरीही आरोपी जुमानत नव्हते. अखेर भांडण विकोपाला जाऊन जालंधरने मूक सुरेशच्या पोटावर, छातीवर चाकूने वार करून जखमी केले होते. महादेवनेही सुरेशवर चाकूने वार केले होते. मुकेशने आपल्या भावाला वाचविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्याच्यावरही वार केले होते. लागलीच गंभीर जखमी सुरेशला भंडाऱ्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मुकेश फटिंग याच्या तक्रारीवरून अरोली पोलीस ठाण्यात भादंविच्या ३०७, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. सुरेश हा मुका असल्याने त्याचे मौखिक मृत्यूपूर्व बयान नोंदवून न घेता, त्याने हे बयान स्वत: लिहून दिले होते. न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर ३०७ कलमांतर्गतचा गुन्हा ३२४ कलमांतर्गत परिवर्तित करून आरोपींना शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील मदन सेनाड, तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. एस. एल. कोतवाल यांनी काम पाहिले.

 

टॅग्स :Courtन्यायालय