शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

कधी पैशांसाठी पाऊस, तर कधी पुत्रप्राप्तीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:09 IST

दरवर्षी २००-२५० तक्रारी : अनेक संसार उध्वस्त, अनेकांचे गेले बळी नागपूर : विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी अनेकांच्या ...

दरवर्षी २००-२५० तक्रारी : अनेक संसार उध्वस्त, अनेकांचे गेले बळी

नागपूर : विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी अनेकांच्या डोक्यात असलेले अंधक्षद्धेचे भूत उतरायला तयार नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील भानामतीच्या प्रकरणाने समाजातील हे चित्र स्पष्ट केले आहे. ग्रामीणच नाही तर शहरातही आणि निरीक्षरच नाही तर सुशिक्षित लाेकांमध्येही मानगुटीवर बसलेल्या अंधश्रद्धेच्या भानामतीने अनेक संसार उध्वस्त केले, अनेकांचे बळी घेतले आहेत. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या माहितीनुसार वर्षाला २०० ते २५० जादूटाेन्याच्या कारणाने छळ केला जात असल्याच्या तक्रारी समितीकडे प्राप्त हाेतात.

२०१३मध्ये झाला कायदा

‘महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम २०१३’ हा महाराष्ट्राततील गुन्हेगारी कायदा आहे. मुळात हा कायदा २००३ मध्ये जादूटोणाविरोधी कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती(अंनिस)चे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांनी तयार केलेला आहे. दाभोलकर यांच्या हत्येनंतर २६ ऑगस्ट २०१३ रोजी हे विधेयक मांडण्यात आले आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात डिसेंबर २०१३ मध्ये ते मंजूर करण्यात आले. लाेकांच्या अंधश्रद्धांचा फायदा घेऊन जादूटाेन्याच्या नावावर लाेकांची फसवणूक करणे, शाेषण करणे, अत्याचार करणाऱ्यांच्या विराेधात कठाेर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे. हा दखलपात्र गुन्हा ठरविण्यात आला असून अशा आराेपींविराेधात गुन्ह्याच्या स्वरूपावरून ६ महिने ते ७ वर्षाची शिक्षा तसेच ५० हजारापर्यंत दंड ठाेठावला जाताे.

आठ वर्षात १७६ वर गुन्हे

अ. भा. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षभरात जादूटाेन्याच्या प्रकरणाच्या २०० ते २५० तक्रारी प्राप्त हाेतात. मात्र यातील काहीच प्रकरणात गुन्हे दाखल केले जातात. गेल्या आठ वर्षात १७६ च्या आसपास गुन्हे दाखल झाले आहेत. यातील बहुतेक प्रकरणे गंभीर स्वरूपाची हाेती, ज्यामध्ये पीडितावर अत्याचार किंवा बळी जाण्याच्या घटना घडल्या.

भानामती नाही, हे विज्ञानाचे खेळ

जादूटाेन्याच्या बहुतेक घटनांमध्ये वैज्ञानिक गाेष्टींचा आधार घेऊन सामान्य लाेकांना मुर्ख बनविले जाते. माैदा तालुक्यातील सिंगाेरी या गावी एका सधन व्यक्तिच्या आईच्या अंगात देवी आली आणि गावाबाहेरील दलित कुटुंबातील लाेक जादूटाेना करीत असल्याने सुनेचा आजार बळावल्याचा आराेप केला. ही अंधश्रद्धा मनात ठेवून त्या व्यक्तिने दाेघांचा खुन केला तर इतर दाेघांना गंभीर जखमी केले. २०१८ मध्ये मांगली गावामध्ये असाच प्रकार घडला. एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून जादूटाेना करीत असल्याचा आराेप करीत हल्ला करण्यात आला व बापलेकाला बेदम मारहान करण्यात आली. तेव्हापासून वडील गावात गेले नाही व मुलावर यावर्षी जुलै महिन्यात पुन्हा हल्ला करण्यात आला. नागपूर तालुक्यातील पाचगावचे खटुली बाबाचे प्रकरण असेच गाजले.

म्हणे, पैशांचा पाऊस पाडतो..

कायदा आणि अंनिसचे प्रबाेधन कार्यामुळे अशा घटनांवर बऱ्यापैकी अंकुश लागला आहे पण खुप पल्ला गाठायचा आहे. एखादी घटना घडते, नंतर यंत्रणांना जाग येते आणि पुन्हा गप्प बसले जाते. यामध्ये पाेलिसांकडूनही कसूर हाेताे. कायद्याची माहिती नसल्याने पाेलीस अशा प्रकरणांना गांभीर्याने घेत नाही व माेठा गुन्हा घडल्यावरच धावपळ केली जाते. त्यांचे कठाेर प्रशिक्षण गरजेचे आहे. याशिवाय गावपातळीवर कायद्याविषयी प्रबाेधन करण्याची नितांत गरज आहे.

- हरीश देशमुख, महासचिव, अ.भा. अंधश्रद्धा निर्मुलन समिती