शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

-तर काही हॉटेल्स व रेस्टॉरंट कायमच बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:07 IST

नागपूर : लॉकडाऊनमुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट संचालकांच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. हॉटेल व्यवसाय आधीपासूनच मंदीत आहे, तर पार्सल सुविधा ...

नागपूर : लॉकडाऊनमुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट संचालकांच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. हॉटेल व्यवसाय आधीपासूनच मंदीत आहे, तर पार्सल सुविधा सुरू न करता अनेकांनी रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही व्यवसाय पूर्वीपासूनच शासनाच्या रडारवर आहेत. शासनाने मदत न केल्यास अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट कायमच बंद होणार असल्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली.

गेल्यावर्षी केंद्र सरकारच्या लॉकडाऊननंतर दोन्ही व्यवसाय सात महिने बंद होते. राज्याने अनलॉक सुरू केले तेव्हाही या व्यवसायाकडे दुर्लक्ष करण्यात आले. व्यवसाय सुरू करण्याच्या शासनाच्या आदेशानंतरही अनेकांनी हॉटेल्स बंद ठेवण्यात धन्यता मानली. ते अजूनही सुरू झालेले नाहीत. व्यवसाय मंदावल्याने काही संचालकांनी रेस्टॉरंटला कुलूप ठोकले. संचालक म्हणाले, खर्च पूर्वीसारखाच आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. तर भोजनालय आणि नाश्त्याची दुकानातून गरीब व मध्यमवर्गीयांना रोजगार मिळतो. आता या सर्वांवर बेरोजगारीचे संकट आले आहे.

आताच्या लॉकडाऊनमध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट, भोजनालय, रस्त्याच्या कडेला लागणारी हॉटेल्स, नाश्ताची दुकाने आदींचा समावेश आहे. पण पूर्वी हा व्यवसाय काही अर्टीनुसार सुरू करण्याची परवानगी मिळाली होती. त्यानंतर वेळेचे बंधन लादल्या गेले. कधी रात्री ८ तर कधी रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली. नंतर लॉकडाऊनमध्ये रेस्टॉरंट सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्याच्या परवानगीसह शनिवार व रविवारी बंद ठेवण्यात आले. रेस्टॉरंटचा व्यवसाय रात्री ८ नंतर सुरू होतो, शिवाय शनिवार व रविवारी जास्त व्यवसाय होतो. अनावश्यक खर्चापेक्षा रेस्टॉरंट बंद ठेवणे परवडणारे आहे. पार्सल सेवेतून व्यवसाय होत नसल्याचे मत रेस्टॉरंट संचालकांनी व्यक्त केले.

हिरावला अनेकांचा रोजगार

रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू म्हणाले, लॉकडाऊनमुळे हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये कार्यरत अनेकांचा रोजगार हिरावला आहे. अनेकांचे कमी कर्मचाऱ्यांवर काम सुरू आहे. काही हॉटेल्सने कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. जानेवारी महिन्यात स्थिती सुधारल्यानंतर त्यांना कामावर परत बोलविले होते. पण आता पुन्हा घरी बसविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना वेतनही मिळत नाही.

रेस्टॉरंट बंद ठेवणेच चांगले

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेकांनी कुटुंबीयांसह घराबाहेर निघणे बंद केले आहे. शिवाय पार्सल सेवेला प्रतिसाद नसल्यामुळे अनेकांनी रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा पर्याय निवडल्याचे मत धंतोली चौकातील रेस्टॉरंट संचालक यादव यांनी सांगितले. आधी कोरोनावर नियंत्रण मिळविणे महत्त्वाचे आहे. परिस्थिती सुधारल्यास पुन्हा रेस्टॉरंट सुरू करू, असे काही संचालक म्हणाले.