शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

कोणी मुलांच्या हितासाठी, तर कोणी प्रेमापोटी नव्याने थाटला संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:09 IST

नागपूर : पती-पत्नी एका रथाची दोन चाके असतात. ते एकमेकांसोबत ताळमेळ साधून चालल्यास संसार सुखाचा होतो, अन्यथा वादाची ठिणगी ...

नागपूर : पती-पत्नी एका रथाची दोन चाके असतात. ते एकमेकांसोबत ताळमेळ साधून चालल्यास संसार सुखाचा होतो, अन्यथा वादाची ठिणगी पडून क्षणात होत्याचे नव्हते होते. वादाची कारणे बरेचदा क्षुल्लक असतात; पण अहंकार तडजोड होऊ देत नाही. काही दाम्पत्यांनी मात्र वेळीच स्वत:ला सावरले आणि वाद संपवून नव्याने सुखाचा संसार करण्याचा निर्धार केला. त्यापैकी कोणी मुलांच्या हितासाठी तर कोणी एकमेकांवरील प्रेमापोटी एकत्र आलेे.

कुटुंब न्यायालयामध्ये शनिवारी लोकन्यायालय आयोजित करण्यात आले होते. विविध कारणांमुळे विभक्त झालेल्या २० दाम्पत्यांनी तडजोड करण्यासाठी या लोकन्यायालयात हजेरी लावली होती. कायदेतज्ज्ञ व समुपदेशकांच्या मार्गदर्शनानंतर त्यातील ११ दाम्पत्यांनी पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला. एका प्रकरणात पत्नीने पतीच्या छळाला कंटाळून माहेर गाठले होते. ती मुलाला सोबत घेऊन गेली होती. काही दिवसानंतर पतीला चुकीची जाणीव झाली. त्याने पत्नी व मुलाच्या भविष्यासाठी वागणूक सुधारण्याचे वचन दिली. त्यामुळे या दाम्पत्याचा तुटलेला संसार पुन्हा जुळला.

अन्य एका प्रकरणात पत्नीचे सोशल मीडिया व टीव्ही मालिकांचे वेड सुखी संसारात मिठाचा खडा टाकण्यासाठी कारणीभूत ठरले. तिचे पतीवर प्रेम असले तरी सततच्या टोकाटोकीमुळे वाद वाढला अन् ते वेगळे झाले. विभक्त होण्याचे कारण क्षुल्लक होतेे; पण अहंकार जवळ येऊ देत नव्हता. लोकन्यायालयात भविष्यातील परिणामांची जाणीव झाल्यानंतर त्यांनी नव्याने सहजीवन सुरू करण्याचा निर्णय घेतला. हे लोकन्यायालय प्रधान न्यायाधीश मंगला ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

-----------------

पीडित पक्षकारांना १४० कोटीवर भरपाई

इतर ठिकाणच्या लोकन्यायालयांमध्ये जिल्ह्यातील एकूण १८ हजार ४७६ प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली, तसेच पीडित पक्षकारांना एकूण १४० कोटी २९ लाख रुपये भरपाई मंजूर करण्यात आली. लोकन्यायालयात दिवाणी, फौजदारी, भूसंपादन वाद, वैवाहिक वाद, मोटार अपघात, धनादेश अनादर इत्यादी प्रकारची एकूण ९१ हजार ७८३ प्रकरणे निर्णयासाठी ठेवण्यात आली होती. ती प्रकरणे हाताळण्यासाठी ६० पॅनल तयार करण्यात आले होते. प्रत्येक पॅनलमध्ये एक न्यायाधीश, एक वकील व एक समाजसेवकाचा समावेश होता. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. मोरे यांच्या हस्ते या लोकन्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले.