शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
6
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
7
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
8
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
10
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
11
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
12
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
13
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
14
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
15
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
16
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
17
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
18
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
19
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
20
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत

संकल्पातून सिद्धी येते, पण परिश्रमाचीही गरज :अशोक उईके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 01:14 IST

कोणत्याही कार्याची सिद्धता संकल्पातूनच येत असते. मात्र त्यासाठी परिश्रमाचीही गरज असते. ध्येय ठरवा आणि आयुष्याच्या उद्दिष्टाकडे चालत राहा, असा सल्ला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी एकलव्य एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी शिबिरार्थ्यांना दिला.

ठळक मुद्देएकलव्य एकल विद्यालयाच्या प्रशिक्षण वर्गात आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोणत्याही कार्याची सिद्धता संकल्पातूनच येत असते. मात्र त्यासाठी परिश्रमाचीही गरज असते. ध्येय ठरवा आणि आयुष्याच्या उद्दिष्टाकडे चालत राहा, असा सल्ला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी एकलव्य एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी शिबिरार्थ्यांना दिला. कै. लक्ष्मणशास्त्री मानकर स्मृती संस्थेच्या वतीने रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात गुरुवारी सायंकाळी चार दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुण लाखाणी होते. वनवासी कल्याण आश्रम नागपूरच्या अध्यक्ष राजेश्वरी देवी शहा यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने उद्घाटन झाले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त धनंजय बापट, पश्चिम विदर्भ क्षेत्र प्रचारक अतुल लिमये, संस्थेचे सचिव राजीव हडप, उपाध्यक्ष केशव मानकर, कोषाध्यक्ष अतुल मोहरीर व्यासपीठावर उपस्थित होते.डॉ. अशोक उईके यांनी आदिवासी विभागाच्या कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले,आदिवासी आणि समाजकल्याण विभागाचे बजेट सारखेच आहे, तरीही आदिवासी विभागाची कामे मागे आहेत. या विभागाची दुरवस्था पाहिल्यावर या विभागासाठी आजवर कुणी मंत्री होते की नाही, असा प्रश्न पडतो. दृष्टिहीन नेत्यांची संख्या अधिक असल्याने योग्य नियोजन झाले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.फक्त पगारासाठी काम करणारी यंत्रणा आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेत असल्याने शिक्षणाची दुरवस्था आहे. हे चित्र बदलायचे असेल तर स्पर्धा परीक्षांकडे वळा, स्वत:ला घडवा, असे आवाहन यांनी केले.महाराष्ट्रात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणावर कुठे आहे, हे सर्वांना माहीत आहे, तरीही आदिवासींना प्रशिक्षण देणारे बार्शी टाकळीचे प्रशिक्षण केंद्र मात्र पुण्यात आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.अतुल लिमये म्हणाले, आदिवासी समाज विविध समस्यांनी घेरलेला आहे. या समस्या नव्या पिढीने समजून घ्याव्यात. नाशिक हा प्रगत जिल्हा आहे, तरीही या प्रगत जिल्ह्यातही अविकसित पाच तालुके आहेतच. त्यात वास्तव्यास असणारे आदिवासी आहेत. हे असे का घडते, आदिवासींचा विकास का घडत नाही, हे समजून घ्या. विकासाबद्दल असलेली जनजागृती नव्या पिढीने वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले.११ ऑगस्टपर्यंत हे शिबिर चालणार असून, यात दररोज पाच संवाद सत्र होणार आहेत. विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून ३०० शिबिरार्थी यात सहभागी आहेत.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अरुण लखाणी यांनी केले. संचालन भारत भुजाडे यांनी तर आभार रवींद्र भोयर यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

टॅग्स :Ashok Uikeअशोक उइकेSchoolशाळा