शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जंगलातील पाणीटंचाईला सौरऊर्जेवरील बोअरवेलचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:07 IST

नागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील पाणी आटते. प्राणी पाण्यासाठी व्याकुळ होतात. प्रसंगी गावात आणि शिवारातही शिरतात. हरिणासारखे प्राणी कुत्र्यांच्या ...

नागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील पाणी आटते. प्राणी पाण्यासाठी व्याकुळ होतात. प्रसंगी गावात आणि शिवारातही शिरतात. हरिणासारखे प्राणी कुत्र्यांच्या तावडीत सापडतात. अनेकदा शिकारही होते. त्याला सौरऊर्जा बोअरवेल हा उपाय ठरला आहे. ठिकठिकाणी केलेल्या बोअरवेलचे पाणी सौरऊर्जेने खेचून प्राण्यांना पुरविण्यावर चार ते पाच वर्षांपासून वनविभागाने भर दिल्याने जंगलातील पाणीटंचाई बऱ्यापैकी दूर झाली आहे.

कडक तापणारा उन्हाळा, बाष्पीभवन यामुळे जंगलातील ७५ टक्के जलस्रोत दरवर्षीच कोरडे पडतात. यावर उपाय म्हणून वनविभागाने कृत्रिम टँक तयार करून त्यात बोअरवेलने पाणी सोडण्याची व्यवस्था केली होती. काही ठिकाणी जंगलात टँकरने पाणीपुरवठा करून प्राण्यांची तहान भागविली जाते. मात्र, सौरऊर्जेवर चालणारे बोअरवेल आता यावर प्रभावी उपाय ठरला आहे. ही पर्यायी नव्हे, संपूर्ण २४ तासांची व्यवस्था आहे. २४ तास वॉटर होलमधून पाणी झिरपत राहील व त्यावर प्राणी आपली तहान भागवू शकतील, अशी सुविधा असल्याने वनार्मचाऱ्यांवरील ताण बराच कमी झाला आहे.

काही ठिकाणच्या तयार केलेल्या वॉटर होलमध्ये बोअरवेलमधून पाणी पडते. ते हाताने हलवावे लागते. त्यामुळे पाणी पूर्णवेळ राहत नाही. भूगर्भातील जलस्रोत खोलवर असल्यास जंगलात तयार केलेल्या कृत्रिम वाॅटर होलमध्ये कर्मचारी हँडपंपच्या मदतीने पाणी भरतात. मात्र, हा पर्याय सुविधाजनक नसून, त्यात धोकाही तेवढाच आहे. बरेचदा मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे हे काम प्रभावित होण्याचा धोका आहे.

अलीकडेच यासंदर्भात पेंच प्रकल्पात बैठक झाली. त्यात मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर यांनी आढावा घेतला. नागपुरातील तिन्ही वन्यजीव क्षेत्रात यंदा पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे सांगण्यात आले. आवश्यक तिथे वाढीव सौरऊर्जा बोअरवेल उभारण्याच्या आणि बोअरवेल दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १५० नैसर्गिक जलस्रोत आहेत. यात ११० सोलर पंप असून, ४० हातपंप आहेत. नव्याने १० सोलर पंप उभारले जातील. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये १०० बोअरवेल असून, ते सर्वच सौरऊर्जेवर चालणारे असल्याची माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली आहे.

...

पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी मॉनिटरिंग केले जाईल. जंगलात अनेक ठिकाणी सोलर पंप आहेत. आवश्यक तिथे दुरुस्तीच्या तसेच वाढीव पंपासाठी सूचना दिल्या आहेत. शक्यतो नैसर्गिक स्रोतावर वनविभागाचा भर आहे.

- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

...