शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कलह पसरविणाऱ्यांना समाजच सरळ करेल : सरसंघचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 23:54 IST

कलह पसरविणाऱ्या तत्त्वांना जग व समाज ओळखेल आणि त्यांना दूर करेल. त्यांच्यातील कटुता व वाकडेपणा समाजाला बदलू शकत नाही. परंतु समाज एकत्रित येऊन अशा तत्त्वांना सरळ करु शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले.

ठळक मुद्देराजकारणाच्या माध्यमातून लोकांना चिथवले जाते

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आपल्या देशातील काही तत्त्वांमुळे अस्वस्थ वाटत असल्याचे लोक म्हणतात. परंतु त्याला घाबरण्याची आवश्यकता नाही. विद्येमुळे समाजात सकारात्मक वाढते. जर विद्येचा योग्य उपयोग झाला कलह पसरविणाऱ्या तत्त्वांना जग व समाज ओळखेल आणि त्यांना दूर करेल. त्यांच्यातील कटुता व वाकडेपणा समाजाला बदलू शकत नाही. परंतु समाज एकत्रित येऊन अशा तत्त्वांना सरळ करु शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. श्री नागपूर गुजराती मंडळद्वारा संचालित व्हीएमव्ही कॉमर्स, जेएमटी आर्ट्स अ‍ॅण्ड जेजेपी सायन्स कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या समारोपीय सोहळ्याप्रसंगी ते गुरुवारी बोलत होते.महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाला श्री नागपूर गुजराती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. चंद्रकांत ठाकर, श्री नागपूर गुजराती मंडळाचे अध्यक्ष योगेश पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य के. पी. कारिया, संघाचे महानगर संघचालक राजेश लोया प्रामुख्याने उपस्थित होते.ब्रिटिशांच्या काळापासून देशाने अनुभव घेतला आहे की राजकारणाच्या माध्यमातून लोकांना कायम चिथावणी दिली जाते. प्रत्यक्षात वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची स्वत:ची काहीच शक्ती नसते. परंतु समाजात कर्तृत्व, सक्रियता व सकारात्मकतेच्या प्रकाशाचा अभाव असतो व त्यामुळे लोकांना देशात अंधकारमय वातावरण असल्याचे वाटते. आपल्या देशात विविधतेत एकता नव्हे तर एकतेची विविधता आहे. सर्व वैविध्यांचा स्वीकार केला तर आपलेपणाच्या भावनेतून हा अंधकारदेखील दूर होतो, असे डॉ.मोहन भागवत म्हणाले. आपली संस्कृती ही स्वार्थाची नसून आपुलकीची आहे. स्वार्थ आणि दरी निर्माण करणाऱ्या तत्त्वांना जवळ करण्याऐवजी प्रेमाचा स्वीकार करायला हवा, असेदेखील ते म्हणाले. चंद्रकांत ठाकर यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन व देशभावना डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याचे आवाहन केले. के.पी.कारिया यांनी प्रास्ताविक केले तर डॉ.सोनू जेसवानी यांनी संचालन केले. 

राजकारण म्हणजे धोक्याची घंटाचराजकारणात धोक्याची घंटा वाजते. कारण राजकारण म्हटले की स्वार्थ येतो. अनेकदा प्रेम व आपुलकी दूर करणारा स्वार्थ निर्माण होतो. स्वार्थ आला की प्रेम काम करत नाही, असे सरसंघचालक म्हणाले.शैक्षणिक संस्थांत आपलेपणा टिकावाकुठलीही विद्या घेत असताना त्याचा उद्देश काय याचा विचार व्हायला हवा. जगासाठी विद्याचे उद्देश सुख आहे. परंतु आत्मिक समाधान जास्त महत्त्वाचे असते. जर आपलेपणाच टिकला नाही तर ज्ञानाचा योग्य उपयोग होत नाही. मग विद्या असणारे लोक विवादांमध्ये जास्त रस घेतात. विद्येचा उपदेश वाद नव्हे तर सर्वांना आपले करणे हा असला पाहिजे. विशेष म्हणजे शैक्षणिक संस्थांत आपलेपणाचा व्यवहार झाला पाहिजे असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे ‘जेएनयू’तील वादांवर अप्रत्यक्षपणे भाष्य केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ