शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

समाजाने शेतकऱ्यांना आधार द्यावा

By admin | Updated: January 28, 2016 03:10 IST

ऊन, पाऊस, वारा यांची अजिबात पर्वा न करता समाजाचे पोट भरण्यासाठी शेतीत झटणारा बळीराजाच आज अडचणीत सापडला आहे.

मोहन भागवत : ‘ऋणाधार’तर्फे १०० शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदतनागपूर : ऊन, पाऊस, वारा यांची अजिबात पर्वा न करता समाजाचे पोट भरण्यासाठी शेतीत झटणारा बळीराजाच आज अडचणीत सापडला आहे. कृषिप्रधान देशातील शेतकरीच समस्येत असेल तर हे दुर्दैवच आहे. शेतकऱ्यांना केवळ सरकारच मदत करेल या आशेवर न थांबता समाजाने पुढाकार घेऊन त्यांना आधार देण्याची आवश्यकता आहे. हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्यच आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ‘ऋणाधार चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने १०० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याच्या उपक्रमाला मंगळवारी सुरुवात झाली. दक्षिण अंबाझरी मार्गावरील बी. आर. मुंडले सभागृहात आयोजित या कार्यक्रमादरम्यान सरसंघचालकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.आपल्या १२१ कोटीच्या देशात शेतकरी अनाथ असेल तर ते दुर्दैवच म्हणावे लागेल. समाजाने त्यांना आत्मविश्वास देण्याची गरज आहे. शहरातील परिवारांनी गावातील एक शेतकरी परिवार निवडावा आणि त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या सुखदु:खात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ.भागवत यांनी यावेळी केले. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची ओढाताण पाहून त्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी शहरातील संवेदनशील व्यक्ती एकत्र आल्या व त्यातूनच ‘ऋणाधार ट्रस्ट’ची स्थापना झाली. या ‘ट्रस्ट’च्या माध्यमातून नागपूर व वर्धा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. या कुटुंबांना एकरकमी मदत देण्याऐवजी या संस्थेने १०० कुटुंबांना दरमहा चार हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा संकल्प केला. दर महिन्याला या कुटुंबाच्या जनधन योजनेंतर्गत काढलेल्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. २६ जानेवारी रोजी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते शेतकरी कुटुंबांना मदतीच्या ‘अंकुर’ या प्रकल्पाला प्रारंभ झाला व त्यांच्या हस्ते शेतकरी कुटुंबीयांना धनादेशांचे वितरण करण्यात आले.यावेळी नगरसेवक संदीप जोशी, उद्योजक अरुण लखानी, पराग सराफ, डॉ.प्रमोद गिरी, वृषाली देशपांडे, डॉ.मनोज सिंगरखिया, दयाल मुलचंदानी, दीपा काळे, प्रशांत दाणी प्रामुख्याने उपस्थित होते.(प्रतिनिधी)शेतकरीपुत्रांना देणार कौशल्यपूर्ण शिक्षण‘ट्रस्ट’तर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ‘अंकुश’ प्र्रकल्प उभारण्यात येतोय. या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यात येईल. नागपुरात मुलांसाठी वसतिगृहे बांधण्यात येतील. तर शेतकऱ्यांच्या मुलीसांठी त्यांना पूरक असा व्यवसाय, रोजगार उपलब्ध करून देणार येईल. अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कुटुंब सावरण्याचा प्रयत्न ‘ऋणाधार’ करणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष संदीप जोशी यांनी दिली.