शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

समाजाने शेतकऱ्यांना आधार द्यावा

By admin | Updated: January 28, 2016 03:10 IST

ऊन, पाऊस, वारा यांची अजिबात पर्वा न करता समाजाचे पोट भरण्यासाठी शेतीत झटणारा बळीराजाच आज अडचणीत सापडला आहे.

मोहन भागवत : ‘ऋणाधार’तर्फे १०० शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदतनागपूर : ऊन, पाऊस, वारा यांची अजिबात पर्वा न करता समाजाचे पोट भरण्यासाठी शेतीत झटणारा बळीराजाच आज अडचणीत सापडला आहे. कृषिप्रधान देशातील शेतकरीच समस्येत असेल तर हे दुर्दैवच आहे. शेतकऱ्यांना केवळ सरकारच मदत करेल या आशेवर न थांबता समाजाने पुढाकार घेऊन त्यांना आधार देण्याची आवश्यकता आहे. हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्यच आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ‘ऋणाधार चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने १०० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याच्या उपक्रमाला मंगळवारी सुरुवात झाली. दक्षिण अंबाझरी मार्गावरील बी. आर. मुंडले सभागृहात आयोजित या कार्यक्रमादरम्यान सरसंघचालकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.आपल्या १२१ कोटीच्या देशात शेतकरी अनाथ असेल तर ते दुर्दैवच म्हणावे लागेल. समाजाने त्यांना आत्मविश्वास देण्याची गरज आहे. शहरातील परिवारांनी गावातील एक शेतकरी परिवार निवडावा आणि त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या सुखदु:खात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ.भागवत यांनी यावेळी केले. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची ओढाताण पाहून त्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी शहरातील संवेदनशील व्यक्ती एकत्र आल्या व त्यातूनच ‘ऋणाधार ट्रस्ट’ची स्थापना झाली. या ‘ट्रस्ट’च्या माध्यमातून नागपूर व वर्धा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. या कुटुंबांना एकरकमी मदत देण्याऐवजी या संस्थेने १०० कुटुंबांना दरमहा चार हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा संकल्प केला. दर महिन्याला या कुटुंबाच्या जनधन योजनेंतर्गत काढलेल्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. २६ जानेवारी रोजी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते शेतकरी कुटुंबांना मदतीच्या ‘अंकुर’ या प्रकल्पाला प्रारंभ झाला व त्यांच्या हस्ते शेतकरी कुटुंबीयांना धनादेशांचे वितरण करण्यात आले.यावेळी नगरसेवक संदीप जोशी, उद्योजक अरुण लखानी, पराग सराफ, डॉ.प्रमोद गिरी, वृषाली देशपांडे, डॉ.मनोज सिंगरखिया, दयाल मुलचंदानी, दीपा काळे, प्रशांत दाणी प्रामुख्याने उपस्थित होते.(प्रतिनिधी)शेतकरीपुत्रांना देणार कौशल्यपूर्ण शिक्षण‘ट्रस्ट’तर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ‘अंकुश’ प्र्रकल्प उभारण्यात येतोय. या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यात येईल. नागपुरात मुलांसाठी वसतिगृहे बांधण्यात येतील. तर शेतकऱ्यांच्या मुलीसांठी त्यांना पूरक असा व्यवसाय, रोजगार उपलब्ध करून देणार येईल. अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कुटुंब सावरण्याचा प्रयत्न ‘ऋणाधार’ करणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष संदीप जोशी यांनी दिली.