शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

समाजकारण करणारा लढवय्या माणूस

By admin | Updated: July 18, 2015 02:57 IST

नेताजी राजगडकर यांची आठवण झाली की त्यांचे साहित्यिक आणि सामाजिक काम डोळ्यासमोर येते. साहित्य क्षेत्रात यशस्वी होत असतानाच समाजकारण ...

नेताजी राजगडकर : प्रथम स्मृतिदिनानिमित्त आठवणींना उजाळा नागपूर : नेताजी राजगडकर यांची आठवण झाली की त्यांचे साहित्यिक आणि सामाजिक काम डोळ्यासमोर येते. साहित्य क्षेत्रात यशस्वी होत असतानाच समाजकारण आणि राजकारणातही यशस्वीपणे कार्य करून माणसे जोडून ठेवणारा हा अफलातून कार्यकर्ता आणि नेता माणूस होता. समाजासाठी सातत्याने लढा देणारा आणि साहित्यातून माणसांच्या वेदना मांडून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा हा लढवय्या माणूस आज आपल्यात नाही, याची खंत वाटते. आज त्यांचा प्रथम स्मृतिदिन. त्यामुळेच नेताजी राजगडकर यांची आठवण त्यांच्या चाहत्यांना अधिक व्याकूळ करणारी आहे. लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाचा भार आईवर पडला. गरिबीचे चटके सहन करीत बालपण गेले. त्यानंतर मोठे भाऊ राजाभाऊ यांना शिक्षकाची नोकरी लागली आणि त्यांनी नेताजींसह भावंडांना शिकविले. शिक्षणाचे महत्व ओळखून नेताजी यांनीही अभ्यासात परिश्रम घेतले. वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांना प्राचार्य राम शेवाळकर आणि मॉरिस कॉलेजमध्ये शरदचंद्र मुक्तिबोध यांचे मार्गदर्शन लाभले. यातूनच त्यांची साहित्य प्रतिभा बहरत गेली. शिक्षण सुरू होते पण गरिबीने पिच्छा पुरविला होता. त्यातच नोकरीसाठीही प्रयत्न सुरू होते पण कम्युनिस्ट म्हणून काही संधी नाकारल्या जात होत्या. यवतमाळमध्ये असताना नेताजींनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लहान-लहान आंदोलने सुरू केली. त्यामुळेच ‘चळवळ्या नेताजी’ अशी त्यांची ओळख झाली. त्यांचे मोठे बंधू राजाभाऊ यांनी वणीला आदिवासींचा भव्य मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात आदिवासींचे ज्येष्ठ नेते बाबुराव मडावी उपस्थित होते. त्या मेळाव्यात नेताजींनी केलेले भाषण, त्यांची भाषाशैली यामुळे त्यांनी उपस्थितांना जिंकून घेतले. एखादा मुद्दा मांडण्याची त्यांची पद्धत आकर्षक आणि प्रभावी होती. ज्येष्ठ नेते ए. बी. बर्धन यांच्या तालमीत तयार झालेले हे वक्तृत्व होते. येथून नेताजींवरचा विश्वास वाढत गेला आणि नेताजी लोकनेते झाले. पण पैशांची कायम चणचण असायची. अशातच महत्प्रयासाने नागपूर आकाशवाणीवर नोकरी लागली. पण राजकारणाकडे त्यांचा कल असल्याने कालांतराने त्यांनी ही नोकरी सोडली. लोकांचा विश्वास जिंकल्याने त्यानंतर निवडणुकीत आमदार म्हणूनही ते जिंकून आले. विधानसभेत आदिवासींच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, महागाई, शिक्षण अशा अनेक मुद्यांवर त्यांनी केलेले जळजळीत भाषण सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणारे होते. अतिशय पोटतिडकीने त्यांनी हे प्रश्न मांडले. अत्यंत परखडपणे मते मांडणारा आणि कुणाचाही मुलाहिजा न बाळगता न्यायासाठी लढणारा हा लढवय्या नेता जनतेसाठी दुर्मिळच होता. त्यांच्या निधनाने आदिवासी समाज पोरका झाला. (प्रतिनिधी)