शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

समाजकारण करणारा लढवय्या माणूस

By admin | Updated: July 18, 2015 02:57 IST

नेताजी राजगडकर यांची आठवण झाली की त्यांचे साहित्यिक आणि सामाजिक काम डोळ्यासमोर येते. साहित्य क्षेत्रात यशस्वी होत असतानाच समाजकारण ...

नेताजी राजगडकर : प्रथम स्मृतिदिनानिमित्त आठवणींना उजाळा नागपूर : नेताजी राजगडकर यांची आठवण झाली की त्यांचे साहित्यिक आणि सामाजिक काम डोळ्यासमोर येते. साहित्य क्षेत्रात यशस्वी होत असतानाच समाजकारण आणि राजकारणातही यशस्वीपणे कार्य करून माणसे जोडून ठेवणारा हा अफलातून कार्यकर्ता आणि नेता माणूस होता. समाजासाठी सातत्याने लढा देणारा आणि साहित्यातून माणसांच्या वेदना मांडून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा हा लढवय्या माणूस आज आपल्यात नाही, याची खंत वाटते. आज त्यांचा प्रथम स्मृतिदिन. त्यामुळेच नेताजी राजगडकर यांची आठवण त्यांच्या चाहत्यांना अधिक व्याकूळ करणारी आहे. लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाचा भार आईवर पडला. गरिबीचे चटके सहन करीत बालपण गेले. त्यानंतर मोठे भाऊ राजाभाऊ यांना शिक्षकाची नोकरी लागली आणि त्यांनी नेताजींसह भावंडांना शिकविले. शिक्षणाचे महत्व ओळखून नेताजी यांनीही अभ्यासात परिश्रम घेतले. वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांना प्राचार्य राम शेवाळकर आणि मॉरिस कॉलेजमध्ये शरदचंद्र मुक्तिबोध यांचे मार्गदर्शन लाभले. यातूनच त्यांची साहित्य प्रतिभा बहरत गेली. शिक्षण सुरू होते पण गरिबीने पिच्छा पुरविला होता. त्यातच नोकरीसाठीही प्रयत्न सुरू होते पण कम्युनिस्ट म्हणून काही संधी नाकारल्या जात होत्या. यवतमाळमध्ये असताना नेताजींनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लहान-लहान आंदोलने सुरू केली. त्यामुळेच ‘चळवळ्या नेताजी’ अशी त्यांची ओळख झाली. त्यांचे मोठे बंधू राजाभाऊ यांनी वणीला आदिवासींचा भव्य मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात आदिवासींचे ज्येष्ठ नेते बाबुराव मडावी उपस्थित होते. त्या मेळाव्यात नेताजींनी केलेले भाषण, त्यांची भाषाशैली यामुळे त्यांनी उपस्थितांना जिंकून घेतले. एखादा मुद्दा मांडण्याची त्यांची पद्धत आकर्षक आणि प्रभावी होती. ज्येष्ठ नेते ए. बी. बर्धन यांच्या तालमीत तयार झालेले हे वक्तृत्व होते. येथून नेताजींवरचा विश्वास वाढत गेला आणि नेताजी लोकनेते झाले. पण पैशांची कायम चणचण असायची. अशातच महत्प्रयासाने नागपूर आकाशवाणीवर नोकरी लागली. पण राजकारणाकडे त्यांचा कल असल्याने कालांतराने त्यांनी ही नोकरी सोडली. लोकांचा विश्वास जिंकल्याने त्यानंतर निवडणुकीत आमदार म्हणूनही ते जिंकून आले. विधानसभेत आदिवासींच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, महागाई, शिक्षण अशा अनेक मुद्यांवर त्यांनी केलेले जळजळीत भाषण सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणारे होते. अतिशय पोटतिडकीने त्यांनी हे प्रश्न मांडले. अत्यंत परखडपणे मते मांडणारा आणि कुणाचाही मुलाहिजा न बाळगता न्यायासाठी लढणारा हा लढवय्या नेता जनतेसाठी दुर्मिळच होता. त्यांच्या निधनाने आदिवासी समाज पोरका झाला. (प्रतिनिधी)