शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

समाजकारण करणारा लढवय्या माणूस

By admin | Updated: July 18, 2015 02:57 IST

नेताजी राजगडकर यांची आठवण झाली की त्यांचे साहित्यिक आणि सामाजिक काम डोळ्यासमोर येते. साहित्य क्षेत्रात यशस्वी होत असतानाच समाजकारण ...

नेताजी राजगडकर : प्रथम स्मृतिदिनानिमित्त आठवणींना उजाळा नागपूर : नेताजी राजगडकर यांची आठवण झाली की त्यांचे साहित्यिक आणि सामाजिक काम डोळ्यासमोर येते. साहित्य क्षेत्रात यशस्वी होत असतानाच समाजकारण आणि राजकारणातही यशस्वीपणे कार्य करून माणसे जोडून ठेवणारा हा अफलातून कार्यकर्ता आणि नेता माणूस होता. समाजासाठी सातत्याने लढा देणारा आणि साहित्यातून माणसांच्या वेदना मांडून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा हा लढवय्या माणूस आज आपल्यात नाही, याची खंत वाटते. आज त्यांचा प्रथम स्मृतिदिन. त्यामुळेच नेताजी राजगडकर यांची आठवण त्यांच्या चाहत्यांना अधिक व्याकूळ करणारी आहे. लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाचा भार आईवर पडला. गरिबीचे चटके सहन करीत बालपण गेले. त्यानंतर मोठे भाऊ राजाभाऊ यांना शिक्षकाची नोकरी लागली आणि त्यांनी नेताजींसह भावंडांना शिकविले. शिक्षणाचे महत्व ओळखून नेताजी यांनीही अभ्यासात परिश्रम घेतले. वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांना प्राचार्य राम शेवाळकर आणि मॉरिस कॉलेजमध्ये शरदचंद्र मुक्तिबोध यांचे मार्गदर्शन लाभले. यातूनच त्यांची साहित्य प्रतिभा बहरत गेली. शिक्षण सुरू होते पण गरिबीने पिच्छा पुरविला होता. त्यातच नोकरीसाठीही प्रयत्न सुरू होते पण कम्युनिस्ट म्हणून काही संधी नाकारल्या जात होत्या. यवतमाळमध्ये असताना नेताजींनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लहान-लहान आंदोलने सुरू केली. त्यामुळेच ‘चळवळ्या नेताजी’ अशी त्यांची ओळख झाली. त्यांचे मोठे बंधू राजाभाऊ यांनी वणीला आदिवासींचा भव्य मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात आदिवासींचे ज्येष्ठ नेते बाबुराव मडावी उपस्थित होते. त्या मेळाव्यात नेताजींनी केलेले भाषण, त्यांची भाषाशैली यामुळे त्यांनी उपस्थितांना जिंकून घेतले. एखादा मुद्दा मांडण्याची त्यांची पद्धत आकर्षक आणि प्रभावी होती. ज्येष्ठ नेते ए. बी. बर्धन यांच्या तालमीत तयार झालेले हे वक्तृत्व होते. येथून नेताजींवरचा विश्वास वाढत गेला आणि नेताजी लोकनेते झाले. पण पैशांची कायम चणचण असायची. अशातच महत्प्रयासाने नागपूर आकाशवाणीवर नोकरी लागली. पण राजकारणाकडे त्यांचा कल असल्याने कालांतराने त्यांनी ही नोकरी सोडली. लोकांचा विश्वास जिंकल्याने त्यानंतर निवडणुकीत आमदार म्हणूनही ते जिंकून आले. विधानसभेत आदिवासींच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, महागाई, शिक्षण अशा अनेक मुद्यांवर त्यांनी केलेले जळजळीत भाषण सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणारे होते. अतिशय पोटतिडकीने त्यांनी हे प्रश्न मांडले. अत्यंत परखडपणे मते मांडणारा आणि कुणाचाही मुलाहिजा न बाळगता न्यायासाठी लढणारा हा लढवय्या नेता जनतेसाठी दुर्मिळच होता. त्यांच्या निधनाने आदिवासी समाज पोरका झाला. (प्रतिनिधी)