शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

समाजकारण करणारा लढवय्या माणूस

By admin | Updated: July 18, 2015 02:57 IST

नेताजी राजगडकर यांची आठवण झाली की त्यांचे साहित्यिक आणि सामाजिक काम डोळ्यासमोर येते. साहित्य क्षेत्रात यशस्वी होत असतानाच समाजकारण ...

नेताजी राजगडकर : प्रथम स्मृतिदिनानिमित्त आठवणींना उजाळा नागपूर : नेताजी राजगडकर यांची आठवण झाली की त्यांचे साहित्यिक आणि सामाजिक काम डोळ्यासमोर येते. साहित्य क्षेत्रात यशस्वी होत असतानाच समाजकारण आणि राजकारणातही यशस्वीपणे कार्य करून माणसे जोडून ठेवणारा हा अफलातून कार्यकर्ता आणि नेता माणूस होता. समाजासाठी सातत्याने लढा देणारा आणि साहित्यातून माणसांच्या वेदना मांडून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा हा लढवय्या माणूस आज आपल्यात नाही, याची खंत वाटते. आज त्यांचा प्रथम स्मृतिदिन. त्यामुळेच नेताजी राजगडकर यांची आठवण त्यांच्या चाहत्यांना अधिक व्याकूळ करणारी आहे. लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाचा भार आईवर पडला. गरिबीचे चटके सहन करीत बालपण गेले. त्यानंतर मोठे भाऊ राजाभाऊ यांना शिक्षकाची नोकरी लागली आणि त्यांनी नेताजींसह भावंडांना शिकविले. शिक्षणाचे महत्व ओळखून नेताजी यांनीही अभ्यासात परिश्रम घेतले. वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांना प्राचार्य राम शेवाळकर आणि मॉरिस कॉलेजमध्ये शरदचंद्र मुक्तिबोध यांचे मार्गदर्शन लाभले. यातूनच त्यांची साहित्य प्रतिभा बहरत गेली. शिक्षण सुरू होते पण गरिबीने पिच्छा पुरविला होता. त्यातच नोकरीसाठीही प्रयत्न सुरू होते पण कम्युनिस्ट म्हणून काही संधी नाकारल्या जात होत्या. यवतमाळमध्ये असताना नेताजींनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लहान-लहान आंदोलने सुरू केली. त्यामुळेच ‘चळवळ्या नेताजी’ अशी त्यांची ओळख झाली. त्यांचे मोठे बंधू राजाभाऊ यांनी वणीला आदिवासींचा भव्य मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात आदिवासींचे ज्येष्ठ नेते बाबुराव मडावी उपस्थित होते. त्या मेळाव्यात नेताजींनी केलेले भाषण, त्यांची भाषाशैली यामुळे त्यांनी उपस्थितांना जिंकून घेतले. एखादा मुद्दा मांडण्याची त्यांची पद्धत आकर्षक आणि प्रभावी होती. ज्येष्ठ नेते ए. बी. बर्धन यांच्या तालमीत तयार झालेले हे वक्तृत्व होते. येथून नेताजींवरचा विश्वास वाढत गेला आणि नेताजी लोकनेते झाले. पण पैशांची कायम चणचण असायची. अशातच महत्प्रयासाने नागपूर आकाशवाणीवर नोकरी लागली. पण राजकारणाकडे त्यांचा कल असल्याने कालांतराने त्यांनी ही नोकरी सोडली. लोकांचा विश्वास जिंकल्याने त्यानंतर निवडणुकीत आमदार म्हणूनही ते जिंकून आले. विधानसभेत आदिवासींच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, महागाई, शिक्षण अशा अनेक मुद्यांवर त्यांनी केलेले जळजळीत भाषण सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणारे होते. अतिशय पोटतिडकीने त्यांनी हे प्रश्न मांडले. अत्यंत परखडपणे मते मांडणारा आणि कुणाचाही मुलाहिजा न बाळगता न्यायासाठी लढणारा हा लढवय्या नेता जनतेसाठी दुर्मिळच होता. त्यांच्या निधनाने आदिवासी समाज पोरका झाला. (प्रतिनिधी)