शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

‘समाजस्वास्थ्य’ म्हणजे नैतिक मूल्यांचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:18 IST

‘जुनाट रूढी, चालीरीती, परंपरांचं दुकान भावनांच्या आधारे चालते. तिथं बुद्धीचा वापर करणाºयांना प्रवेश नाही. अशाच लोकांची सत्ता असेल तर ज्याची सत्ता त्याचा न्याय हा नियम असतो’, रघुनाथ धोंडो कर्वे ....

ठळक मुद्देजुनाट विचारांवर प्रहार : नाटकघर पुणे यांचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘जुनाट रूढी, चालीरीती, परंपरांचं दुकान भावनांच्या आधारे चालते. तिथं बुद्धीचा वापर करणाºयांना प्रवेश नाही. अशाच लोकांची सत्ता असेल तर ज्याची सत्ता त्याचा न्याय हा नियम असतो’, रघुनाथ धोंडो कर्वे यांची भूमिका करणाºया अतुल पेठे यांच्या या संवादाने आज जोरदार टाळ्या घेतल्या. निमित्त होते अतुल पेठे दिग्दर्शित व ज्येष्ठ नाटककार प्रा. अजित दळवी लिखित ‘समाजस्वास्थ्य’च्या प्रयोगाचे. शनिवारी संध्याकाळी शंकरनगरातील साई सभागृहात सादर झालेल्या या दोन अंकी नाटकाने प्रेक्षकांना नैतिक मूल्यांचा विचार करायला अंतर्मुख केले.नाटकाचा विचार संवेदनशील पण सडेतोड होता. स्त्री-पुरुष संबंध, व्यभिचार या विषयावर लिहिणारे, संततीनियमनाचा प्रचार आणि प्रसार करणारे रघुनाथ धोंडो कर्वे या द्रष्ट्या माणसावर अश्लीलतेचा आरोप ठेवून चालविण्यात येणारे तीन खटले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे मातब्बर वकील दिमतीला असूनही हरलेला त्यातील एक खटला, तिसºया खटल्यात तांत्रिक मुद्यांवर ते सुटत असले तरी चौथा खटल्याला त्यांना सामोरे जावे लागते. पण त्यांचा संघर्ष थांबलेला असतो. परंपरागत बुरसटलेले विचार मात्र कायम जिवंतच असतात.पुराणातील आणि आख्यायिका ठरलेल्या व्यक्तींबद्दल बोलायचे नाही, असा निर्बंध असलेल्या अशा काळात अत्यंत निर्भय विचारांचा रघुनाथ धोंडो कर्वे किल्ला लढवितात. रसिकांशी थेट संवाद साधणाºया आणि काळजाला भिडणाºया नाटकाचा पडदा पडल्यानंतरही मनात एक ठिणगी पेटवून जातात.अतुल पेठे यांच्या दिग्दर्शनाची शैली व भूमिका एकदम भिन्न असल्यामुळे नाटक लक्षवेधी ठरते. त्यांना राजश्री सावंत-वाड यांची मालतीबार्इंच्या भूमिकेत तितकीच तोलामोलाची साथ मिळाली.‘समाजस्वास्थ’ या नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये, संगीत नरेंद्र भिडे, प्रकाशयोजना प्रदीप वैद्य, वेशभूषा माधुरी पुरंदरे, रंगभूषा आशिष देशपांडे, ध्वनिआरेखन अमर देवगावकर यांचे होते. कलाकार अजित साबळे, अभय जबडे, रणजित मोहिते, करण कांबळे, धनंजय सरदेशपांडे, संतोष माळी, आशिष वझे, नीरज पांचाळ, अनिकेत दलाल, ओंकार शिंदे, राजस कोठावळ, अनुप सातपुते, प्रशांत कांबळे, कृतार्थ शेवगावकर, रेखा ठाकूर या सर्वांनी आपल्या भूमिका उत्तम केल्या आहेत.