शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लोकमतची सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:25 IST

१९८४ साली मराठवाड्यात झालेल्या अभूतपूर्व पुराने अनेक गावांचे नुकसान झाले. जनतेच्या सहकार्यातून पूरग्रस्त भागात शाळा बांधून देण्यात आल्या. १९८८ ...

१९८४ साली मराठवाड्यात झालेल्या अभूतपूर्व पुराने अनेक गावांचे नुकसान झाले. जनतेच्या सहकार्यातून पूरग्रस्त भागात शाळा बांधून देण्यात आल्या.

१९८८ साली बिहारमध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी लोकमतने रु. १८ लाख गोळा करून तो निधी मदतकार्यासाठी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्वाधीन केला.

१९९१ साली नागपूर जिल्ह्यातील पुरामुळे मोवाड व जलालखेडा येथे अपरिमित नुकसान झाले. तेव्हा लोकमतने पूरग्रस्त निधी उभारून मोवाड येथे इस्पितळ आणि जलालखेडा येथे शाळा बांधून दिली.

१९९३ साली अनंत चतुर्दशीच्या दिवशी मराठवाड्यात किल्लारी येथे भूकंपाने हाहाकार माजवला होता. तेव्हा लोकमतने भूकंपग्रस्तांसाठी निधी उभारून २० लाख रुपये गोळा केले होते. या निधीतून भूकंपग्रस्त भागात दोन शाळा व एक समाजमंदिर बांधण्यात आले.

१९९९ साली झालेल्या कारगील युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या मदतीसाठी कारगील सहायता निधी उभारण्यात आला. त्यातून महाराष्ट्रातील शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली, तसेच जवानांच्या मुलांसाठी नागपूर, औरंगाबाद व सोलापूर येथे वसतिगृहे बांधण्यात आली.

२६ जानेवारी २००१ साली, गुजरातमध्ये भूकंप झाला तेव्हा लोकमतने भूकंपग्रस्तांसाठी निधी उभारून भूकंपग्रस्त भागात २५० शाळा उभारल्या.

अशा तऱ्हेने लोकमतने केवळ वृत्तसंकलनाचे काम न करता समाजात बंधुभाव व एकात्मता रुजविण्यासाठी विविध उपक्रम घेऊन समाजाशी आपले आगळेवेगळे नाते प्रस्थापित केले आहे. लोकमत हे केवळ वृत्तपत्र नसून ती चळवळ आहे, याचा प्रत्यय आपल्या अनेक उपक्रमांद्वारे लोकमतने आणून दिला आहे.