शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

लोकमतची सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:25 IST

१९८४ साली मराठवाड्यात झालेल्या अभूतपूर्व पुराने अनेक गावांचे नुकसान झाले. जनतेच्या सहकार्यातून पूरग्रस्त भागात शाळा बांधून देण्यात आल्या. १९८८ ...

१९८४ साली मराठवाड्यात झालेल्या अभूतपूर्व पुराने अनेक गावांचे नुकसान झाले. जनतेच्या सहकार्यातून पूरग्रस्त भागात शाळा बांधून देण्यात आल्या.

१९८८ साली बिहारमध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी लोकमतने रु. १८ लाख गोळा करून तो निधी मदतकार्यासाठी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्वाधीन केला.

१९९१ साली नागपूर जिल्ह्यातील पुरामुळे मोवाड व जलालखेडा येथे अपरिमित नुकसान झाले. तेव्हा लोकमतने पूरग्रस्त निधी उभारून मोवाड येथे इस्पितळ आणि जलालखेडा येथे शाळा बांधून दिली.

१९९३ साली अनंत चतुर्दशीच्या दिवशी मराठवाड्यात किल्लारी येथे भूकंपाने हाहाकार माजवला होता. तेव्हा लोकमतने भूकंपग्रस्तांसाठी निधी उभारून २० लाख रुपये गोळा केले होते. या निधीतून भूकंपग्रस्त भागात दोन शाळा व एक समाजमंदिर बांधण्यात आले.

१९९९ साली झालेल्या कारगील युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या मदतीसाठी कारगील सहायता निधी उभारण्यात आला. त्यातून महाराष्ट्रातील शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली, तसेच जवानांच्या मुलांसाठी नागपूर, औरंगाबाद व सोलापूर येथे वसतिगृहे बांधण्यात आली.

२६ जानेवारी २००१ साली, गुजरातमध्ये भूकंप झाला तेव्हा लोकमतने भूकंपग्रस्तांसाठी निधी उभारून भूकंपग्रस्त भागात २५० शाळा उभारल्या.

अशा तऱ्हेने लोकमतने केवळ वृत्तसंकलनाचे काम न करता समाजात बंधुभाव व एकात्मता रुजविण्यासाठी विविध उपक्रम घेऊन समाजाशी आपले आगळेवेगळे नाते प्रस्थापित केले आहे. लोकमत हे केवळ वृत्तपत्र नसून ती चळवळ आहे, याचा प्रत्यय आपल्या अनेक उपक्रमांद्वारे लोकमतने आणून दिला आहे.