शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

-तर अजनी वनाला डीम्ड फाॅरेस्टचा दर्जा का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:06 IST

नागपूर : एखाद्या भागात मुबलक प्रमाणात आणि विविध प्रजातींची झाडे असतील, प्राणी, पक्ष्यांची समृद्ध जैवविविधता असेल तर अशा जागेला ...

नागपूर : एखाद्या भागात मुबलक प्रमाणात आणि विविध प्रजातींची झाडे असतील, प्राणी, पक्ष्यांची समृद्ध जैवविविधता असेल तर अशा जागेला डीम्ड फाॅरेस्टचा दर्जा देऊन त्या वनसंपदेचे संवर्धन केले जाऊ शकते. सर्वाेच्च न्यायालयाने वनसंवर्धन कायद्याचा उल्लेख करीत एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सूचना केल्या आहेत. या नियमांचे पालन केल्यास अजनीवन परिसराला डीम्ड फाॅरेस्टचा दर्जा दिला जाऊ शकताे. मात्र वनविभाग याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते.

माजी वन्यजीव अधीक्षक जयदीप दास यांनी वनविभागास पत्र लिहून या विषयाकडे लक्ष वेधले आहे. याबाबत त्यांनी लाेकमतला माहिती दिली. डिसेंबर १९९६ साली तामिळनाडूच्या गाेदावर्मन विरुद्ध केंद्र शासन या प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयाने वनसंवर्धनाचे स्पष्ट निर्देश दिले हाेते. न्यायालयाच्या मते केवळ ठरलेले जंगल म्हणजे फाॅरेस्ट नाही तर फाॅरेस्टची व्याख्या समजून घेणे आवश्यक आहे. शहरातील मुबलक वनसंपदा असलेला भागही जंगल ठरताे. त्यानुसार सर्व राज्य शासनांनी संस्थेची निर्मिती करून असे भाग ओळखण्याचे आणि भविष्याच्या गरजेनुसार त्याचे संवर्धन हाेणे गरजेचे आहे, असे निर्देश न्यायालयाने दिले हाेते. याबाबत काेणत्याही राज्य सरकारांनी व जबाबदार संस्थांनी पुढाकार न घेतल्याची टीका दास यांनी केली. अंबाझरी व गाेरेवाडाप्रमाणे अजनी वनालाही स्वायत्त जंगल म्हणून घाेषित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनात केली. यावर राज्याचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी मुख्य वनसंरक्षकांना चाैकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

- भारतीय वनधाेरणानुसार देशात एकूण भूमीच्या ३३ टक्के जंगल असणे आवश्यक आहे. मात्र भारतात केवळ २१ टक्के आहे.

- स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही काेणत्याच सरकारने वन धाेरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.

- एका संस्थेच्या सॅटेलाईट सर्वेक्षणानुसार गेल्या १० वर्षात नागपूरचे ग्रीन कव्हर ३३ टक्क्यांनी घटले आहे.

- महापालिकेला मागील एका वर्षात कापलेल्या झाडांच्या बदल्यात ११ हजार नवीन झाडे लावायची हाेती.

- मात्र शहरात वृक्षाराेपण करण्यास जागा नसल्याचे कारण देत मनपाने ४०० झाडे लावून बाेळवण केल्याची माहिती आहे.

- वृक्षाराेपणास जागा नसताना अजनीतील झाडांच्या बदल्यात १९ हजार झाडे लावण्याचा दावा करणारे एनएचएआय झाडे लावणार कुठे, हा प्रश्न आहे.