शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

-तर एफआयआर नोंदविण्यासाठी प्राथमिक चौकशीची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 10:47 IST

Nagpur News गुन्हा दखलपात्र असल्यास आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदविण्यापूर्वी प्राथमिक चौकशी करण्याची गरज नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणावरील निर्णयात व्यक्त केले.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचे मतविवाहितेच्या आत्महत्येचे प्रकरण

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : गुन्हा दखलपात्र असल्यास आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदविण्यापूर्वी प्राथमिक चौकशी करण्याची गरज नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणावरील निर्णयात व्यक्त केले.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मृत विवाहितेचे नाव किरण होते. त्यांनी फाशी लावून आत्महत्या केली. त्यानंतर किरण यांचे वडील मनोहर आंबेकर यांनी ८ मे २०२० रोजी वाशीम पोलीस ठाण्यात तक्रार देऊन किरण यांच्या आत्महत्येसाठी पती नंदकिशोर पराळकर व दिर गणेश हे कारणीभूत असल्याचा आरोप केला. या दोघांनी शारीरिक व मानसिक छळ केल्यामुळे किरण यांना आत्महत्या करावी लागली, असेही नमूद केले. परंतु, पोलिसांनी पराळकर बंधूंविरुद्ध एफआयआर नोंदवला नाही. त्यामुळे आंबेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पराळकर बंधूंविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची मागणी केली. त्यात न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर पोलिसांनी उत्तर सादर करून प्रकरणाची चौकशी केल्याची आणि आंबेकर व इतरांचे बयान नोंदविल्याची माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाचा ‘ललिता कुमारी’ प्रकरणावरील निर्णय विचारात घेता, पोलिसांची ही कृती बेकायदेशीर असल्याचे उच्च न्यायालयाला आढळून आले. परिणामी, न्यायालयाने सदर मत व्यक्त करून संबंधित आराेपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचा आदेश वाशीम पोलिसांना दिला. तसेच, प्रकरणाचा कायद्यानुसार तपास करण्यास सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय