शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

- मग विकास कामे करायची तरी कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:12 IST

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : तालुक्यातील डझनभर गावे अद्यापही अंधारात आहेत. सायंकाळ झाली की सर्वत्र काळाकुट्ट अंधार ...

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : तालुक्यातील डझनभर गावे अद्यापही अंधारात आहेत. सायंकाळ झाली की सर्वत्र काळाकुट्ट अंधार पसरतो. सर्वत्र स्मशान शांतता आणि भीतीचे वातावरण दिसून येते. पथदिव्यांची वीजच कापल्याने अनेक गावावर हे संकट ओढवले आहे. एकीकडे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून या बिलाची रक्कम भरा, असा फतवाच काढण्यात आला आहे. आधीच १५ व्या वित्त आयोगाचा निधी अतिशय तोकडा आहे. त्यातच पथदिव्यांचे ‘हजारो अथवा लाख’ रुपयांचे बिल अदा केले, तर मग विकास कामे करायची तरी कशी, असा सवाल आता विचारला जात आहे.

सध्या पथदिव्यांच्या बिलाच्या थकबाकीची थोडीथोडकी रक्कम भरून कशीबशी तात्पुरती समस्या पुढे ढकलली जात आहे. कायमस्वरूपी मार्ग काढला जात नसल्याने सरपंच संतापले आहेत. नुकतीच पंचायत समिती भवनात आढावा सभा पार पडली. यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष अश्विन उके यांनी विविध प्रश्नांचा भडीमार करीत वीज अधिकाऱ्यांना भंडावून सोडले.

ग्रामपंचायतीला पंगू बनविण्याचा प्रकार सुरू असून, आता लोकप्रतिनिधींनी शासनाला जाब विचारावा. प्रश्न मांडावेत आणि समस्यांकडे लक्ष द्यावे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. पथदिव्यांच्या या गंभीर प्रश्नावरून सर्वत्र वातावरण तापले असून, सरपंच तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

...

जबाबदारी जिल्हा परिषदेची

पूर्वी पथदिव्यांच्या बिलाच्या रकमेची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे होती. नियमितपणे या बिलाचा भरणा होत असे. आता दोन ते तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेने हात वर केले आहे. ही रक्कम १५ व्या वित्त आयोगातून भरावी, असे आदेश निर्गमित झाले. सन २०१८ पर्यंतची बिलाची रक्कम जिल्हा परिषद भरेल, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. आता थकबाकी वाढल्याने विद्युत विभागाने वीज कापण्याचा धडाका सुरू केला आहे. यावरून ग्रामपंचायत आणि विद्युत विभागात चांगलेच घमासान सुरू असून, जिल्हा परिषदेला वळती होणाऱ्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ही रक्कम देण्यात यावी, अशीही मागणी जोर धरत आहे. पूर्वीसारखीच जिल्हा परिषदेने ही जबाबदारी घ्यावी, असाही सूर उमटत आहे.

....

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी

१५ व्या वित्त आयोगाचा येणारा निधी हा ग्रामपंचायतला १०० टक्के मिळत नाही. तो निधी तीन ठिकाणी विभागला जातो. यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला प्रत्येकी १० टक्के वाटा तसेच ग्रामपंचायतला ८० टक्के निधी वळती होतो. या निधीमधून पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण आदी महत्त्वपूर्ण विषयावर ५० टक्के निधी खर्च करण्याची तरतूद आहे. उर्वरित निधी नाली, रस्ते दुरुस्ती, इतर बांधकाम यावर खर्च होतो. या निधीतून पथदिव्यांच्या बिलाची रक्कम भरणे ही तारेवरची कसरत असून, अशक्य बाब असल्याचेही मत व्यक्त होत आहे.

....

या आधारावर येतो निधी

१५ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतला कसा आणि किती मिळतो, याबाबत विचारणा केली असता, पुढील माहिती मिळाली. नवेगाव साधू ग्रामपंचायतची लोकसंख्या ३,४६५ आहे. या ग्रामपंचायतला ६६५ रुपये ९८ पैसे प्रतिमाणसी याप्रमाणे २३ लाख ७,६२१ रुपये प्राप्त झाल्याची माहिती मिळाली. प्रत्येक ग्रामपंचायतला या आधारावरच हा निधी उपलब्ध होत असतो. या तोकड्या निधीतून विकास कामे अशक्य होतात. त्यातच आता यातून दिवाबत्तीची सोय करा, असे परिपत्रक आल्याने संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.

....

पथदिव्यांचे बिल जिल्हा परिषदेने भरावयास पाहिजे. जिल्हा परिषदेला १५ व्या वित्त आयोगातून जो १० टक्के निधी वळता होतो, त्यातून ही रक्कम भरावी. याव्यतिरिक्त जिल्हा नियोजन समितीने अनुदान द्यावे. जेणेकरून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो, अन्यथा समस्या गंभीर होईल.

- संजय वाघमारे, माजी पंचायत समिती सदस्य, उमरेड