शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

- तर कसे बांधायचे घरकूल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:15 IST

ब्रिजेश तिवारी कोंढाळी : शासनाने गरीब लोकांना पक्के घर उपलब्ध करून देण्याकरिता घरकूल योजना सुरू केली. कोंढाळी येथे शासनाने ...

ब्रिजेश तिवारी

कोंढाळी : शासनाने गरीब लोकांना पक्के घर उपलब्ध करून देण्याकरिता घरकूल योजना सुरू केली. कोंढाळी येथे शासनाने ४९७ घरकुले मंजूर केली. पण या घरकुलांच्या यादीत अनेक घोळ असल्याने घरे बांधावी तरी कशी असा प्रश्न कोंढाळी ग्रामपंचायत प्रशासनाला पडला आहे. घरकूल योजनेंतर्गत घर बांधण्याकरिता १ लाख २० हजार रुपये रक्कम व महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत श्रमदानाचे १८ हजार असे एकूण १ लाख ३८ हजार रुपये प्रती लाभार्थ्यांना मिळतात.

शासनाने कोंढाळी येथे २०२०-२१ करिता ४९७ घरकूल मंजूर केले. पण यातील १४० लाभार्थ्यांची घरे वनविभाग व खासगी जमिनीवर अतिक्रमण करुन बांधली आहेत. ६६ लाभार्थ्यांचा जागेबाबत वाद सुरू आहे. १८ लाभार्थ्यांकडे पूर्वीच सिमेंट काँक्रीटची पक्की घरे आहेत. १५ लाभार्थ्यांच्या घरकुलाकरिता नावे तर आली. पण लाभार्थी कोंढाळी गावातच राहत नाही. ७ लाभार्थ्यांची नावे अशी आहेत की पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाला आहे. ४ निराधार वृद्धांना घरकुलांची गरज आहे. त्यांची नावेही यादीत आहेत पण कोंढाळीचे सरपंच केशव धुर्वे, उपसरपंच स्वप्नील व्यास व ग्रामविकास अधिकारी दिलीपसिंह राठोड यांनी या लाभार्थ्यांकडे वारंवार चकरा मारूनही ते घर बांधण्यास तयार नाहीत. याबाबत कोंढाळी ग्रामपंचायतकडून प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा यांना कळविण्यात आले. तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष घरकूल बांधण्याची गरज असलेल्या निराधार ४ लोकांच्या घरांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना घर बांधण्याची विनंती केली. तरी हे लाभार्थी घर बांधण्यास तयार नसल्याची माहिती पुढे आली.

महसूल विभागाने पट्टे वाटप करावे

वनजमिनी व खासगी जमिनीवर अतिक्रमण असल्याने घर बांधकामाकरिता निधी देता येत नाही असे कोंढाळीचे सरपंच केशव धुर्वे व उपसरपंच स्वप्नील व्यास यांनी स्पष्ट केले आहे. महसूल विभागाने लोकांना पट्टे वाटण्याकरिता १५७ प्लॉट राखून ठेवले होते. पण गेल्या २५ वर्षांत लोकांना प्लॉटचे वितरणच केले नाही. यानंतर जवळपास १२५ प्लॉटवर लोकांनी अतिक्रमण करुन घरे बांधली आहेत. येथे ३० प्लॉट शिल्लक आहेत. ही जमीन महसूल विभागाने कोंढाळी ग्रामपंचायतीला दिली तर गरजू लोकांना घरकूल बांधकाम करण्यासाठी येथे प्लॉट उपलब्ध करून देता येतील, असे ग्रा.पं.चे म्हणणे आहे.