शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत फक्त तीन शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 11:17 IST

farmer Nagpur News आतापर्यंत नागपूर, हिंगणा आणि कामठी तालुक्यात केवळ तीन शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून शासनाच्या उपक्रमाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे खासगी व्यापाऱ्यांकडे जाताहेत शेतकरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी थेट शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करण्यासाठी १५ ऑक्टोबरपासून तालुकास्तरावर खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. याकरिता शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करायची आहे. पण आतापर्यंत नागपूर, हिंगणा आणि कामठी तालुक्यात केवळ तीन शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून शासनाच्या उपक्रमाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही शासनाचा उपक्रम अयशस्वी ठरतो का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.गेल्यावर्षी तिन्ही तालुके मिळून कळमना येथील केंद्रावर केवळ १८ क्विंटल सोयाबीन शासनाने खरेदी केले होते. यावरून शासनाच्या केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. या उलट शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांनाच सोयाबीन विकल्याचे दिसून येते. याचे कारणही ठोस आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीचे चुकारे दोन महिने मिळत नाहीत. याशिवाय सुपर आणि एफएक्यू या ग्रेडखाली मालाची विक्री होत नाही. यावर्षी सोयाबीनला ३८८० रुपये हमी भाव आहे, पण शेतकऱ्यांना केंद्रावर हमी भाव मिळतो काय, हा खरा प्रश्न आहे.यावर्षी विदर्भात सोयाबीनचे पीक ३० टक्केच आले आहे. याशिवाय आलेल्या पिकांना डाग आहेत. त्यामुळे किंमत कमी झाली आहे. असे सोयाबीन शासन खरेदी करीत नाहीत. सर्वोत्तम दर्जाच्या मालाला हमी भाव मिळत असला तरीही डाग असलेल्या सोयाबीनला कळमन्यात ३ हजार ते ३६०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. याशिवाय विक्री केल्यानंतर आठवड्यात शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत. तसे पाहिल्यास मालाचे पैसे मिळण्यासाठी अनेक नियम आणि अटी आहेत. अशा अटी खासगी व्यापाऱ्यांकडे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा खासगी व्यापाऱ्यांकडे असल्याचे कळमन्यातील अडतियांनी सांगितले.शासनाच्या केंद्रावर सोयाबीन, चणा आणि तुरीची खरेदी करण्यात येते. गेल्यावर्षी १८ क्विंटल सोयाबीन, ३५०० क्विंटल चणा आणि ८०० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली होती. शेतकरी शासनाच्या केंद्राकडे माल विक्रीसाठी जातच नसेल तर शासन दरवर्षी केंद्र का सुरू करते, हा गंभीर प्रश्न आहे. शासनाने कृषी मालाची सरसकट खरेदी केली तरच शेतकरी केंद्राकडे जातील, असे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :agricultureशेती