शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

नावाचीच स्मार्ट सिटी , रस्त्यांना आले खड्ड्याचे स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्मार्ट सिटीच्या नावाखाली पूर्व नागपुरातील नागरिकांना मोठी स्वप्ने दाखविली जात आहे. परंतु पावसाळा सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्मार्ट सिटीच्या नावाखाली पूर्व नागपुरातील नागरिकांना मोठी स्वप्ने दाखविली जात आहे. परंतु पावसाळा सुरू होण्याला दोन आठवडे होत नाही तोच या परिसतील परिस्थिती गंभीर झाली आहे. देखभाल नसल्याने जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्यांना खड्ड्याचे स्वरुप आले आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धरम नगर ते भरतवाडाकडे जाणाऱ्या मार्गावरील नौकन्या नगर परिसरातील रस्ता हरपला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने बाईक तर दूरच पाण्याचे टँकर, ट्रक मोठ्या शिताफीने चालवावे लागत आहे. यामुळे कोणत्याही क्षणी अपघाताचा धोका आहे. तसेच लक्ष्मीनगर, विजय नगर, गुलमोहर नगर, ओम नगर यासह आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यांची अवस्था अशीच बिकट आहे. परिसरात पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने जागोजागी पाणी साचत आहे.

कळमना ते भरतवाडा दरम्यानचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा केला जात आहे. परंतु काम कासवगतीने सुरू आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना अडचणींना सामोेरे जावे लागत आहे.

गुलमोहर नगर, नसेमन सोसायटी येथे मोठमोठी घरे उभारण्यात आली. परंतु अजूनही पक्के रस्ते नाही. पावसाळ्यात या रस्त्यावरून चालणे शक्य होत नाही. या परिसरात राहणारे पवन शाहू म्हणाले, रस्त्यांची डागडुजी नागरिकांना स्वत: पैसे खर्च करून करावी लागत आहे. नगरसेवक याकडे लक्ष देत नाही. नौकन्या नगर परिसरातील रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावे. अशी मागणी त्यांनी केली. भोलानाथ तिवारी म्हणाले, स्मार्ट सिटीच्या विकासाला आमचा विरोध नाही. परंतु चांगली घरे तुटताना बघवत नाही. परिसरातील समस्या मार्गी लागणे गरजेचे आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पांर्गत ५२ कि.मी. पैकी १२ कि.मी. रस्त्यांचे काम सुरू करणे शक्य झाले आहे. त्यात प्रमुख मार्गाचा समावेश आहे. अंतर्गत मार्गाकडे मनपाचे लक्ष नाही. या परिसरातील ले-आऊट गुंठेवारीत येतात. तर ले-आऊट अजूनही मंजूर नाही. यामुळे या परिसरात सुविधांचा अभाव आहे.

विशेष म्हणजे पूर्व नागपुरातील प्रभाग ४ मधून मागील दोन वर्षापासून लकडगंज झोन सभापती आहे. इतकेच नव्हे तर स्थायी समिती अध्यक्ष या परिसरातील होते. परंतु परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करता आलेली नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश असलेल्या भागात प्रामुख्याने भाजपचे नगरसेवक आहेत. परंतु समस्याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे.

....

घर तोडून रस्ता करण्याला विरोध

स्मार्ट सिटी प्रकल्पात रस्ता रुंदीकरणासाठी अनेकांची घरे तोडली आहे. परंतु अनेकांना अजूनही मोबदला मिळालेला नाही. दुसरीकडे कळमना ते जयगंगा मॉ सोसायटी मार्गे पारडी पर्यंत रस्त्याचे काम केले जाणार आहे. यासाठी २५० लोकांची घरे तोडली जाणार आहे. काही महिन्यापासून प्रकरण प्रलंबित आहे. प्रकरण आर्बिटेशन मध्ये गेले. परंतु यावर तोडगा निघाला नाही. येथील रस्त्याचा प्रकल्प वगळण्यात यावा. अशी नागरिकांची मागणी आहे. परंतु काही नेत्यांची येथील जमिनीवर नजर आहे. त्यामुळे हा अट्टाहास सुरू आहे. रस्ता वस्तीतून जात असल्याने भविष्यात अपघात होण्याची शक्यता आहे.