शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नावाचीच स्मार्ट सिटी , रस्त्यांना आले खड्ड्याचे स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्मार्ट सिटीच्या नावाखाली पूर्व नागपुरातील नागरिकांना मोठी स्वप्ने दाखविली जात आहे. परंतु पावसाळा सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्मार्ट सिटीच्या नावाखाली पूर्व नागपुरातील नागरिकांना मोठी स्वप्ने दाखविली जात आहे. परंतु पावसाळा सुरू होण्याला दोन आठवडे होत नाही तोच या परिसतील परिस्थिती गंभीर झाली आहे. देखभाल नसल्याने जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्यांना खड्ड्याचे स्वरुप आले आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धरम नगर ते भरतवाडाकडे जाणाऱ्या मार्गावरील नौकन्या नगर परिसरातील रस्ता हरपला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने बाईक तर दूरच पाण्याचे टँकर, ट्रक मोठ्या शिताफीने चालवावे लागत आहे. यामुळे कोणत्याही क्षणी अपघाताचा धोका आहे. तसेच लक्ष्मीनगर, विजय नगर, गुलमोहर नगर, ओम नगर यासह आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यांची अवस्था अशीच बिकट आहे. परिसरात पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने जागोजागी पाणी साचत आहे.

कळमना ते भरतवाडा दरम्यानचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा केला जात आहे. परंतु काम कासवगतीने सुरू आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना अडचणींना सामोेरे जावे लागत आहे.

गुलमोहर नगर, नसेमन सोसायटी येथे मोठमोठी घरे उभारण्यात आली. परंतु अजूनही पक्के रस्ते नाही. पावसाळ्यात या रस्त्यावरून चालणे शक्य होत नाही. या परिसरात राहणारे पवन शाहू म्हणाले, रस्त्यांची डागडुजी नागरिकांना स्वत: पैसे खर्च करून करावी लागत आहे. नगरसेवक याकडे लक्ष देत नाही. नौकन्या नगर परिसरातील रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावे. अशी मागणी त्यांनी केली. भोलानाथ तिवारी म्हणाले, स्मार्ट सिटीच्या विकासाला आमचा विरोध नाही. परंतु चांगली घरे तुटताना बघवत नाही. परिसरातील समस्या मार्गी लागणे गरजेचे आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पांर्गत ५२ कि.मी. पैकी १२ कि.मी. रस्त्यांचे काम सुरू करणे शक्य झाले आहे. त्यात प्रमुख मार्गाचा समावेश आहे. अंतर्गत मार्गाकडे मनपाचे लक्ष नाही. या परिसरातील ले-आऊट गुंठेवारीत येतात. तर ले-आऊट अजूनही मंजूर नाही. यामुळे या परिसरात सुविधांचा अभाव आहे.

विशेष म्हणजे पूर्व नागपुरातील प्रभाग ४ मधून मागील दोन वर्षापासून लकडगंज झोन सभापती आहे. इतकेच नव्हे तर स्थायी समिती अध्यक्ष या परिसरातील होते. परंतु परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करता आलेली नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश असलेल्या भागात प्रामुख्याने भाजपचे नगरसेवक आहेत. परंतु समस्याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे.

....

घर तोडून रस्ता करण्याला विरोध

स्मार्ट सिटी प्रकल्पात रस्ता रुंदीकरणासाठी अनेकांची घरे तोडली आहे. परंतु अनेकांना अजूनही मोबदला मिळालेला नाही. दुसरीकडे कळमना ते जयगंगा मॉ सोसायटी मार्गे पारडी पर्यंत रस्त्याचे काम केले जाणार आहे. यासाठी २५० लोकांची घरे तोडली जाणार आहे. काही महिन्यापासून प्रकरण प्रलंबित आहे. प्रकरण आर्बिटेशन मध्ये गेले. परंतु यावर तोडगा निघाला नाही. येथील रस्त्याचा प्रकल्प वगळण्यात यावा. अशी नागरिकांची मागणी आहे. परंतु काही नेत्यांची येथील जमिनीवर नजर आहे. त्यामुळे हा अट्टाहास सुरू आहे. रस्ता वस्तीतून जात असल्याने भविष्यात अपघात होण्याची शक्यता आहे.