शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

एसएनडीएल आऊट; नागपूर शहराला महावितरण करणार वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 10:55 IST

नागपूर शहरातील वीज वितरणासाठी आता कुठलीही फ्रेन्चाईजी येणार नाही. महावितरणच आजपासून संपूर्ण शहराला वीजपुरवठ्याची जबाबदारी सांभाळेल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देशहरात यापुढे फे्रन्चाईजी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रविवारी रात्री १२ वाजता शहरातील वीज वितरणाची जबाबदारी महावितरणने आपल्या हाती घेतली. फ्रेन्चाईजी एसएनडीएलचा काळ आता संपला आहे. शहरातील वीज वितरणासाठी आता कुठलीही फ्रेन्चाईजी येणार नाही. महावितरणच आजपासून संपूर्ण शहराला वीजपुरवठ्याची जबाबदारी सांभाळेल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, शहरातील महाल, गांधीबाग आणि सिव्हील लाईन्स या विभागाची २०११ पर्यंत वीज वितरण हानी ३०.०६ टक्के इतकी होती. ती कमी करण्याच्या उद्देशाने या विभागाला १ मे २०११ पासून फ्रे न्चाईजीच्या स्वाधीन करण्यात आले होते. अगोदर स्पॅन्को आणि नंतर एसएनडीएलने ही जबाबदारी पार पाडली. सध्या एसएनडीएलने त्यांची आर्थिक परिस्थितीत खराब असल्याचा हवाला देत १२ आॅगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी पत्र लिहून कामकाज सुरु ठेवण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे महावितरणने कामकाज सांभाळण्याचा निर्णय घेतला. यानंतरही एसएनडीएलच्या भरवशावर राहिलो असतो तर समस्या गंभीर झाली असती.ऊर्जामंत्र्यांनी एसएनडीएलच्या कामाचे कौतुक करीत सांगितले की, एसएनडीएलला वीज वितरणाची हानी ३०.०६ टक्केवरून १३.७ टक्केपर्यंत आणण्यात यश आले होते. वीज चोरीवरही नियंत्रण आणले.आमदारांच्या मागणीनुसार गठीत चौकशी समितीने ७०० पेक्षा अधिक तक्रारी समोर ठेवल्या होत्या. यानंतर त्यांना तीन वेळा नोटीस देण्यात आली. एसएनडीएलने यापैकी ८० टक्के निराकरणही केले. परंतु कंपनीची आर्थिक परिस्थितीतच डबघाईस आल्याने वीज वितरणावर परिणाम पडू लागला. ट्रिपींग, ट्रान्सफार्मर फेल होण्याच्या घटना वाढल्या. लो व्होलटेजची समस्याही समोर येऊ लागली. कंपनी पायाभूत विकासांवर गुंतवणूक करू शकत नव्हती. यामुळे भविष्यात वीज संकट ओढवू शकण्याची स्थिती होती. ही परिस्थिती लक्षात घेता महावितरणने वितरणाची जबाबादारी सांभाळण्याचा निर्णय घेतला. अखंडित वीज पुरवठ्यासाठी ३ कार्यकारी अभियंता, ९ अतिरिक्त कार्यकारी अभियंते, ६ उप-कार्यकारी अभियंते आणि २९ सहायक अभियंत्यांना नियुक्त करण्यात आले आहे. ३५ वितरण केंद्रांसाठी १०५ तंत्रज्ञ कर्मचारी आणि ४० इंजिनियर नियुक्त करण्यात आले आहेत. मंडळ कार्यालयात एक विशेष नियंत्रण कक्ष सुद्धा स्थापित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी महापौर नंदा जिचकार, आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. गिरीश व्यास, महावितरणचे संचालक (संचलन) दिनेशचंद्र साबू, नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, अधीक्षक अभियंते राकेश जनबंधू आदी उपस्थित होते.थकीत वसुलीची समस्या नाहीऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, महावितरणला एसएनडीएलकडून २२५ कोटी रुपये घ्यायचे आहे, आणि २२४ कोटी रुपये द्यावयाचे आहे. अशा परिस्थितीत थकीत वसुलीसंदर्भात कुठलीही समस्या नाही. दोन्ही कंपन्यांमधील हिशेबात कुठलाही मोठा फरक नही. दोन महिन्यात आॅडिट करून प्रकरणाचा निपटारा करण्यात येईल.रात्री १२ वाजता काय घडलेरात्री ठिक १२ वाजता महावितरणने एसएनडीएलच्या क्षेत्रात येणाऱ्या व जाणाऱ्या विजेची रीडिंग करून कामकाज सांभाळले. महावितरण व एसएनडीएलचे विशेष पथक गठीत करण्यात आले होते. शहरात येणाऱ्या १३२ केव्हीच्या मानकापूर, बेसा, पारडी आणि उप्पलवाडी सब स्टेशनमध्ये वीज बाहेर पडणाऱ्या मीटरची रिडींग घेण्यात आली. फ्रेन्चाईजी भागातील ४९ सबस्टेशन व स्वीचिंग सेंटरचे इनपूट रिडिंग घेण्यात आली. कार्यालयातील रजिस्टर महावितरणने आपल्या ताब्यात घेतले. याबरोबरच एसएनडीएलचे शहरातील अस्तित्व संपुष्टात आले.

टॅग्स :electricityवीज