शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

एसएनडीएलची हद्दपारी निश्चित, महावितरण तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 11:10 IST

नागपूर शहरातील वीज वितरणाची जबबदारी सांभाळत असलेल्या एसएनडीएलचे जाणे आता निश्चित झाले आहे.

ठळक मुद्देदिवसभर बैठका, कुठल्याही क्षणी निर्णय फ्रेन्चाईजीचे कर्मचारी आणि व्हेंडर उतरले रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वीज वितरणाची जबबदारी सांभाळत असलेल्या एसएनडीएलचे जाणे आता निश्चित झाले आहे. महावितरणने अजूनपर्यंत तसा निर्णय घेतलेला नाही. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर महावितरण कारभार आपल्या हाती घेणार की नाही, हे सांगता येत नाही. परंतु सूत्रानुसार मुंबईतून हिरवी झेंडी मिळाली असून कुठल्याही क्षणी महावितरण एसएनडीएलकडून जबाबदारी घेईल, असे सांगितले जाते. या दरम्यान एसएनडीएलचे कर्मचारी आणि व्हेंडर गुरुवारी दिवसभर थकीत वेतनाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते.एस्सेल समूहाची कंपनी एसएनडीएलने गेल्या १२ आॅगस्ट रोजी महावितरणला पत्र लिहून कामकाज सांभाळण्याबाबत असमर्थतादर्शविली होती. मधला मार्गही निघू शकला नाही. त्यामुळे महावितरणने कार्यभार सांभाळण्याची तयारी सुरू केली आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा एसएनडीएल जाण्याची वेळ आली असल्याची पुष्टी करीत आहेत. बुधवारी कार्यालयाला टाळे ठोकल्यानंतर आज गुरुवारी एसएनडीएलचे कर्मचारी व व्हेंडर महावितरणच्या काटोल रोड येथील कार्यालयावर धडकले. पोलिसांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. तेव्हा त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. यादरम्यान महावितरणचे प्रभारी संचालक दिलीप घुगल आणि एसएनडीएलचे बिजनेस हेड सोनल खुराना यांनी व्हेंडर व कर्मचाऱ्यांशी वेगवेगळी भेट घेऊन चर्चा केली. एस्सेल युटिलीटीचे अध्यक्ष कमल माहेश्वरी यांच्यासोबतही त्यांचे बोलणे करून देण्यात आले. माहेश्वर यांनी व्हेंडर्सना त्यांची थकीत रक्कम देण्याचे आश्वासन देत मुंबईला बोलावले. परंतु व्हेंडर यांचे समाधान झाले नाही. घुगल यांनी कर्मचाऱ्यांना काम करीत राहण्याचे आवाहन करीत त्यांना भविष्याबाबत चिंता करू नका, असे सांगितले.

बिल प्रिंटींग रोखलेमहावितरणने एसएनडीएलला ई-मेल पाठवून त्यांना बिल प्रिंट करून वितरण करण्यास मनाई केली आहे. विशेष म्हणजे ७ सप्टेंबरपासून बिल वाटणे सुरु होणार होते. सध्या बिलांवर एसएनडीएलचे नाव आहे. अशा परिस्थितीत कार्यभार सांभाळण्याची वेळ आली तर बिल महावितरण वाटू शकणार नाही. या पार्श्वभूमीवर बिल वितरण तात्पुरते थांबवण्यात आले आहे.

व्हेंडर आजपासून संपावरएसएनडीएलचे विविध काम करणाºया व्हेंडर्सनी गुरुवारी सायंकाळी पत्रपरिषद घेऊन ६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेपासून काम बंद करण्याचे जाहीर केले आहे. यावेळी त्यांनी वीज पुरवठा प्रभावित झाला आणि नागरिकांना त्रास झाला तर यासाठी महावितरण आणि एसएनडीएल जबाबदार राहतील. एसएनडीएलवर त्यांची असलेली थकीत रक्कम ५० कोटी रुपयावर पोहोचली आहे. त्यांच्या थकीत रकमेची गॅरंटी घेतली जावी, अशी त्यांची मागणी आहे. यादरम्यान मिलिंद बोरेकर, प्रकाश गजभिये, कुमार वैभव, गजानन नासरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरण