शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

एसएनडीएलची हद्दपारी निश्चित, महावितरण तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 11:10 IST

नागपूर शहरातील वीज वितरणाची जबबदारी सांभाळत असलेल्या एसएनडीएलचे जाणे आता निश्चित झाले आहे.

ठळक मुद्देदिवसभर बैठका, कुठल्याही क्षणी निर्णय फ्रेन्चाईजीचे कर्मचारी आणि व्हेंडर उतरले रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वीज वितरणाची जबबदारी सांभाळत असलेल्या एसएनडीएलचे जाणे आता निश्चित झाले आहे. महावितरणने अजूनपर्यंत तसा निर्णय घेतलेला नाही. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर महावितरण कारभार आपल्या हाती घेणार की नाही, हे सांगता येत नाही. परंतु सूत्रानुसार मुंबईतून हिरवी झेंडी मिळाली असून कुठल्याही क्षणी महावितरण एसएनडीएलकडून जबाबदारी घेईल, असे सांगितले जाते. या दरम्यान एसएनडीएलचे कर्मचारी आणि व्हेंडर गुरुवारी दिवसभर थकीत वेतनाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते.एस्सेल समूहाची कंपनी एसएनडीएलने गेल्या १२ आॅगस्ट रोजी महावितरणला पत्र लिहून कामकाज सांभाळण्याबाबत असमर्थतादर्शविली होती. मधला मार्गही निघू शकला नाही. त्यामुळे महावितरणने कार्यभार सांभाळण्याची तयारी सुरू केली आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा एसएनडीएल जाण्याची वेळ आली असल्याची पुष्टी करीत आहेत. बुधवारी कार्यालयाला टाळे ठोकल्यानंतर आज गुरुवारी एसएनडीएलचे कर्मचारी व व्हेंडर महावितरणच्या काटोल रोड येथील कार्यालयावर धडकले. पोलिसांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. तेव्हा त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. यादरम्यान महावितरणचे प्रभारी संचालक दिलीप घुगल आणि एसएनडीएलचे बिजनेस हेड सोनल खुराना यांनी व्हेंडर व कर्मचाऱ्यांशी वेगवेगळी भेट घेऊन चर्चा केली. एस्सेल युटिलीटीचे अध्यक्ष कमल माहेश्वरी यांच्यासोबतही त्यांचे बोलणे करून देण्यात आले. माहेश्वर यांनी व्हेंडर्सना त्यांची थकीत रक्कम देण्याचे आश्वासन देत मुंबईला बोलावले. परंतु व्हेंडर यांचे समाधान झाले नाही. घुगल यांनी कर्मचाऱ्यांना काम करीत राहण्याचे आवाहन करीत त्यांना भविष्याबाबत चिंता करू नका, असे सांगितले.

बिल प्रिंटींग रोखलेमहावितरणने एसएनडीएलला ई-मेल पाठवून त्यांना बिल प्रिंट करून वितरण करण्यास मनाई केली आहे. विशेष म्हणजे ७ सप्टेंबरपासून बिल वाटणे सुरु होणार होते. सध्या बिलांवर एसएनडीएलचे नाव आहे. अशा परिस्थितीत कार्यभार सांभाळण्याची वेळ आली तर बिल महावितरण वाटू शकणार नाही. या पार्श्वभूमीवर बिल वितरण तात्पुरते थांबवण्यात आले आहे.

व्हेंडर आजपासून संपावरएसएनडीएलचे विविध काम करणाºया व्हेंडर्सनी गुरुवारी सायंकाळी पत्रपरिषद घेऊन ६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेपासून काम बंद करण्याचे जाहीर केले आहे. यावेळी त्यांनी वीज पुरवठा प्रभावित झाला आणि नागरिकांना त्रास झाला तर यासाठी महावितरण आणि एसएनडीएल जबाबदार राहतील. एसएनडीएलवर त्यांची असलेली थकीत रक्कम ५० कोटी रुपयावर पोहोचली आहे. त्यांच्या थकीत रकमेची गॅरंटी घेतली जावी, अशी त्यांची मागणी आहे. यादरम्यान मिलिंद बोरेकर, प्रकाश गजभिये, कुमार वैभव, गजानन नासरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरण