शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

‘एसएमएस’ने तुटली लग्नगाठ

By admin | Updated: February 27, 2015 01:56 IST

केवळ एका एसएमएसमुळे एका तरुणीचे नववधू होण्याचे स्वप्न भंगले. वराने पाठ फिरवली. तो लग्नमंडपी पोहोचलाच नाही.

नागपूर : केवळ एका एसएमएसमुळे एका तरुणीचे नववधू होण्याचे स्वप्न भंगले. वराने पाठ फिरवली. तो लग्नमंडपी पोहोचलाच नाही. मात्र वर-वधूकडील वऱ्हाडी सीताबर्डी पोलीस ठाण्यात पोहोचल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. सीताबर्डी येथील या तरुणीचा विवाह सारनी, मध्यप्रदेश येथील रहिवासी अभिषेक याच्याशी जुळला होता. आज गुरुवारी हे लग्न मोठ्या थाटात पार पडणार होते. वधू पक्षाच्या माहितीनुसार वर पक्षाकडून लग्नघडीपर्यंत हुंड्याची मागणी होतच होती. वधूचे नातेवाईक भोपाळ येथे कपडे खरेदीसाठी गेले असता, अभिषेक नाराज होता. वधूच्या काका-काकूने त्याला नाराजीचे कारण विचारले असता, त्याने कारची मागणी व लग्नात नातेवाईकांचे थाटात स्वागत झाले पाहिजे, अशी मागणी केली होती. या तरुणीच्या नातेवाईकांनी स्वागतात कुठलीही कसर सोडली जाणार नाही, असे आश्वासन दिले. मात्र कार देण्यास असमर्थता दर्शविली होती. २५ जानेवारीला त्यांचे साक्षगंध झाले होते. त्यानंतर अभिषेक व या तरुणीची दररोज बातचित होत होती. दरम्यान अभिषेक १५ फेब्रुवारीला नागपुरात आला होता. अभिषेकने तिला एका हॉटेलात बोलावून राहुल नावाच्या युवकाचा एसएमएस आल्याची माहिती दिली. अभिषेकच्या सांगण्यानुसार राहुलने पाठविलेल्या एसएमएसमध्ये या तरुणीचे आणि त्याचे प्रेमसंबंध असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतरही अभिषेकने तिच्यावर कुठलेही आरोप न करता विवाहाला अनुमती दर्शविली होती. मात्र लग्नाच्या तारखेच्या चार दिवसापूर्वी २२ फेब्रुवारीला अभिषेकच्या वडिलांचा फोन या तरुणीच्या नातेवाईकांना आला. त्यांनी २३ ला चर्चेसाठी बोलाविले. तिथे एसएमएसवर चर्चा झाली. त्यावेळी या तरुणीच्या घरच्यांनी अभिषेकच्या कुटुंबीयांचा गैरसमज दूर केला. या तरुणीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्यानंतर त्यांनी हुंड्यात कारची मागणी केली होती. या तरुणीच्या म्हणण्यानुसार तिची याप्रकरणात कुठलीही चूक नाही. अभिषेकचा गैरसमज दूर करण्यासाठी एसएमएस मागील खरे खोटे उघड करण्यासाठी सीताबर्डी ठाण्यात लिखित तक्रार केली होती. (प्रतिनिधी)