शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

‘एसएमएस’ने तुटली लग्नगाठ

By admin | Updated: February 27, 2015 01:56 IST

केवळ एका एसएमएसमुळे एका तरुणीचे नववधू होण्याचे स्वप्न भंगले. वराने पाठ फिरवली. तो लग्नमंडपी पोहोचलाच नाही.

नागपूर : केवळ एका एसएमएसमुळे एका तरुणीचे नववधू होण्याचे स्वप्न भंगले. वराने पाठ फिरवली. तो लग्नमंडपी पोहोचलाच नाही. मात्र वर-वधूकडील वऱ्हाडी सीताबर्डी पोलीस ठाण्यात पोहोचल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. सीताबर्डी येथील या तरुणीचा विवाह सारनी, मध्यप्रदेश येथील रहिवासी अभिषेक याच्याशी जुळला होता. आज गुरुवारी हे लग्न मोठ्या थाटात पार पडणार होते. वधू पक्षाच्या माहितीनुसार वर पक्षाकडून लग्नघडीपर्यंत हुंड्याची मागणी होतच होती. वधूचे नातेवाईक भोपाळ येथे कपडे खरेदीसाठी गेले असता, अभिषेक नाराज होता. वधूच्या काका-काकूने त्याला नाराजीचे कारण विचारले असता, त्याने कारची मागणी व लग्नात नातेवाईकांचे थाटात स्वागत झाले पाहिजे, अशी मागणी केली होती. या तरुणीच्या नातेवाईकांनी स्वागतात कुठलीही कसर सोडली जाणार नाही, असे आश्वासन दिले. मात्र कार देण्यास असमर्थता दर्शविली होती. २५ जानेवारीला त्यांचे साक्षगंध झाले होते. त्यानंतर अभिषेक व या तरुणीची दररोज बातचित होत होती. दरम्यान अभिषेक १५ फेब्रुवारीला नागपुरात आला होता. अभिषेकने तिला एका हॉटेलात बोलावून राहुल नावाच्या युवकाचा एसएमएस आल्याची माहिती दिली. अभिषेकच्या सांगण्यानुसार राहुलने पाठविलेल्या एसएमएसमध्ये या तरुणीचे आणि त्याचे प्रेमसंबंध असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतरही अभिषेकने तिच्यावर कुठलेही आरोप न करता विवाहाला अनुमती दर्शविली होती. मात्र लग्नाच्या तारखेच्या चार दिवसापूर्वी २२ फेब्रुवारीला अभिषेकच्या वडिलांचा फोन या तरुणीच्या नातेवाईकांना आला. त्यांनी २३ ला चर्चेसाठी बोलाविले. तिथे एसएमएसवर चर्चा झाली. त्यावेळी या तरुणीच्या घरच्यांनी अभिषेकच्या कुटुंबीयांचा गैरसमज दूर केला. या तरुणीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्यानंतर त्यांनी हुंड्यात कारची मागणी केली होती. या तरुणीच्या म्हणण्यानुसार तिची याप्रकरणात कुठलीही चूक नाही. अभिषेकचा गैरसमज दूर करण्यासाठी एसएमएस मागील खरे खोटे उघड करण्यासाठी सीताबर्डी ठाण्यात लिखित तक्रार केली होती. (प्रतिनिधी)