शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीसाठी हवे स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट : गौरव चौकसे यांनी दिला फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 21:19 IST

शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. वाहनांची संख्या दररोज वाढत आहे. तुलनेत रस्त्यांची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम होत आहे. प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पार्किंगच्या समस्या उद्भवल्या आहेत. नागपुरातील स्मार्ट सिटी साकारत असली तरी, वाहतूक व्यवस्था आजही जुनीच आहे. शहरात पाच हजार कोटीची मेट्रो धावली तरी या समस्या सुटणार नाही, कारण त्यासाठी स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटची आवश्यकता आहे. माहिती तंत्रज्ञानात बी.टेक. आणि एमबीएची पदवी घेतलेल्या आणि ग्रीसमध्ये एका खासगी कंपनीला सेवा देणाऱ्या नागपुरातील गौरव चौकसे यांनी नागपूर मनपाला स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटची आयडिया दिली. मनपाच्या स्मार्ट सिटी चॅलेंजमध्ये त्यांची आयडिया अव्वल ठरली.

ठळक मुद्देस्मार्ट सिटी आयडिया चॅलेंजमध्ये ठरला अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. वाहनांची संख्या दररोज वाढत आहे. तुलनेत रस्त्यांची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम होत आहे. प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पार्किंगच्या समस्या उद्भवल्या आहेत. नागपुरातील स्मार्ट सिटी साकारत असली तरी, वाहतूक व्यवस्था आजही जुनीच आहे. शहरात पाच हजार कोटीची मेट्रो धावली तरी या समस्या सुटणार नाही, कारण त्यासाठी स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटची आवश्यकता आहे. माहिती तंत्रज्ञानात बी.टेक. आणि एमबीएची पदवी घेतलेल्या आणि ग्रीसमध्ये एका खासगी कंपनीला सेवा देणाऱ्या नागपुरातील गौरव चौकसे यांनी नागपूर मनपाला स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटची आयडिया दिली. मनपाच्या स्मार्ट सिटी चॅलेंजमध्ये त्यांची आयडिया अव्वल ठरली.महापालिकेने २०१५ मध्ये स्मार्ट सिटीसाठी काही आयडिया मागितल्या होत्या. यातील पहिल्या तीन आयडिया देणाऱ्यांना मनपा शहराचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनविणार होती. त्यांना पुरस्कृतही करणार होती. मनपाने त्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून आवाहन केले होते. नागपुरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी त्याला प्रतिसाद देत १४०० आयडिया मनपाला पाठविला. यातून गौरवने दिलेली आयडिया प्रथम ठरली होती. गौरवने हा प्रोजेक्ट तयार करताना, शहरातील वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास केला. त्यातून काही त्रुटी काढल्या. पार्किंगची समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अवस्था लक्षात घेतली. त्यावर अभ्यास करून त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली. त्याने नागपूर झूम अ‍ॅप तयार केले. जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीवर फोकस केले.जीपीएसने केली सार्वजनिक वाहतूक ट्रॅकगौरवने तयार केलेल्या प्रोजेक्टमध्ये सर्वात प्रथम त्याने सिटी बसवर फोकस केले. कारण आजही नागपूरकरांमध्ये शहर बससंदर्भात संभ्रम आहे. बसची निश्चित वेळ, थांबे याबाबत माहिती नाही. गौरव जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बसला लावून अ‍ॅपच्या माध्यमातून बसची इत्थंभूत माहिती मोबाईलद्वारे नागरिकांना मिळणार होती. ओला, उबेर या खासगी प्रवासी वाहनांप्रमाणे ही यंत्रणा संचालित होणार होती. त्याचा डेमोसुद्धा गौरवने दिला होता.स्मार्ट सिग्नलशहरातील वाहतुकीच्या समस्येचे मूळ म्हणजे सिग्नलचे मॅनेजमेंट नाही. शहर स्मार्ट होताना वाहतुकीची व्यवस्था स्मार्ट झाली नाही. रस्त्यावर वाहतूक कितीही असली तरी, आपल्या सिग्नलमध्ये ३० सेकंदचा टाईम सेट आहे. गौरवने शहरातील सिग्नलला सेंसरच्या माध्यमातून ऑपरेट करण्याची आयडिया दिली होती. यातून सिग्नल वाहतुकीची स्थिती लक्षात घेता ऑटोमॅटिक ऑपरेट होणार होते. त्यामुळे आज जसा आपत्कालीन वाहतूक व्यवस्थेला फटका बसतो तो या यंत्रणेमुळे बसणार नव्हता.पार्किंगच्या समस्येवरही दिला पर्यायशहरातील विशेषकरून बाजारपेठ परिसरात पार्किंगची बिकट समस्या निर्माण झाली होती. कारण चारचाकी वाहने झपाट्याने वाढली आहेत. लोकांना अजूनही पार्किंगच्या जागा माहिती नाही. गौरवने तयार केलेला नागपूर झुम अ‍ॅप पार्किंगची समस्या सोडविण्यास महत्त्वाचा ठरणार होता.पण आयडिया आता धूळखात आहे२०१५ मध्ये या आयडिया मनपाला दिल्या होत्या. मनपा त्याची अंमलबजावणी करणार होती. चांगल्या आयडियांना पुरस्कृत करून, पहिल्या तीन आयडियांना ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनविणार होती. पण आज या आयडिया धूळखात पडल्या आहेत. २०१५ च्या आयडिया २०१९ मध्ये पुरस्कृत करण्यात आल्या आहे. अजूनही कुणाला ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनविले नाही, याची खंतही गौरवने व्यक्त केली.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीTrafficवाहतूक कोंडी