शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

स्मार्ट सिटीसाठी हवे स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट : गौरव चौकसे यांनी दिला फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 21:19 IST

शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. वाहनांची संख्या दररोज वाढत आहे. तुलनेत रस्त्यांची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम होत आहे. प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पार्किंगच्या समस्या उद्भवल्या आहेत. नागपुरातील स्मार्ट सिटी साकारत असली तरी, वाहतूक व्यवस्था आजही जुनीच आहे. शहरात पाच हजार कोटीची मेट्रो धावली तरी या समस्या सुटणार नाही, कारण त्यासाठी स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटची आवश्यकता आहे. माहिती तंत्रज्ञानात बी.टेक. आणि एमबीएची पदवी घेतलेल्या आणि ग्रीसमध्ये एका खासगी कंपनीला सेवा देणाऱ्या नागपुरातील गौरव चौकसे यांनी नागपूर मनपाला स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटची आयडिया दिली. मनपाच्या स्मार्ट सिटी चॅलेंजमध्ये त्यांची आयडिया अव्वल ठरली.

ठळक मुद्देस्मार्ट सिटी आयडिया चॅलेंजमध्ये ठरला अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. वाहनांची संख्या दररोज वाढत आहे. तुलनेत रस्त्यांची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम होत आहे. प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पार्किंगच्या समस्या उद्भवल्या आहेत. नागपुरातील स्मार्ट सिटी साकारत असली तरी, वाहतूक व्यवस्था आजही जुनीच आहे. शहरात पाच हजार कोटीची मेट्रो धावली तरी या समस्या सुटणार नाही, कारण त्यासाठी स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटची आवश्यकता आहे. माहिती तंत्रज्ञानात बी.टेक. आणि एमबीएची पदवी घेतलेल्या आणि ग्रीसमध्ये एका खासगी कंपनीला सेवा देणाऱ्या नागपुरातील गौरव चौकसे यांनी नागपूर मनपाला स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटची आयडिया दिली. मनपाच्या स्मार्ट सिटी चॅलेंजमध्ये त्यांची आयडिया अव्वल ठरली.महापालिकेने २०१५ मध्ये स्मार्ट सिटीसाठी काही आयडिया मागितल्या होत्या. यातील पहिल्या तीन आयडिया देणाऱ्यांना मनपा शहराचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनविणार होती. त्यांना पुरस्कृतही करणार होती. मनपाने त्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून आवाहन केले होते. नागपुरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी त्याला प्रतिसाद देत १४०० आयडिया मनपाला पाठविला. यातून गौरवने दिलेली आयडिया प्रथम ठरली होती. गौरवने हा प्रोजेक्ट तयार करताना, शहरातील वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास केला. त्यातून काही त्रुटी काढल्या. पार्किंगची समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अवस्था लक्षात घेतली. त्यावर अभ्यास करून त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली. त्याने नागपूर झूम अ‍ॅप तयार केले. जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीवर फोकस केले.जीपीएसने केली सार्वजनिक वाहतूक ट्रॅकगौरवने तयार केलेल्या प्रोजेक्टमध्ये सर्वात प्रथम त्याने सिटी बसवर फोकस केले. कारण आजही नागपूरकरांमध्ये शहर बससंदर्भात संभ्रम आहे. बसची निश्चित वेळ, थांबे याबाबत माहिती नाही. गौरव जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बसला लावून अ‍ॅपच्या माध्यमातून बसची इत्थंभूत माहिती मोबाईलद्वारे नागरिकांना मिळणार होती. ओला, उबेर या खासगी प्रवासी वाहनांप्रमाणे ही यंत्रणा संचालित होणार होती. त्याचा डेमोसुद्धा गौरवने दिला होता.स्मार्ट सिग्नलशहरातील वाहतुकीच्या समस्येचे मूळ म्हणजे सिग्नलचे मॅनेजमेंट नाही. शहर स्मार्ट होताना वाहतुकीची व्यवस्था स्मार्ट झाली नाही. रस्त्यावर वाहतूक कितीही असली तरी, आपल्या सिग्नलमध्ये ३० सेकंदचा टाईम सेट आहे. गौरवने शहरातील सिग्नलला सेंसरच्या माध्यमातून ऑपरेट करण्याची आयडिया दिली होती. यातून सिग्नल वाहतुकीची स्थिती लक्षात घेता ऑटोमॅटिक ऑपरेट होणार होते. त्यामुळे आज जसा आपत्कालीन वाहतूक व्यवस्थेला फटका बसतो तो या यंत्रणेमुळे बसणार नव्हता.पार्किंगच्या समस्येवरही दिला पर्यायशहरातील विशेषकरून बाजारपेठ परिसरात पार्किंगची बिकट समस्या निर्माण झाली होती. कारण चारचाकी वाहने झपाट्याने वाढली आहेत. लोकांना अजूनही पार्किंगच्या जागा माहिती नाही. गौरवने तयार केलेला नागपूर झुम अ‍ॅप पार्किंगची समस्या सोडविण्यास महत्त्वाचा ठरणार होता.पण आयडिया आता धूळखात आहे२०१५ मध्ये या आयडिया मनपाला दिल्या होत्या. मनपा त्याची अंमलबजावणी करणार होती. चांगल्या आयडियांना पुरस्कृत करून, पहिल्या तीन आयडियांना ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनविणार होती. पण आज या आयडिया धूळखात पडल्या आहेत. २०१५ च्या आयडिया २०१९ मध्ये पुरस्कृत करण्यात आल्या आहे. अजूनही कुणाला ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनविले नाही, याची खंतही गौरवने व्यक्त केली.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीTrafficवाहतूक कोंडी