शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
3
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
4
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
5
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
6
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
7
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
8
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
9
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
10
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
11
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
12
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
13
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
14
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
15
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
16
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
17
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
18
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
19
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
20
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )

यंगिस्तानचा नारा, ‘सीएम’ है हमारा

By admin | Updated: November 1, 2014 02:46 IST

अवघ्या ४४ च्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे नागपूरचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस यांच्या यशाचे ...

नागपूर : अवघ्या ४४ च्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे नागपूरचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस यांच्या यशाचे उपराजधानीतील तरुणाईने जोरदार ‘सेलिब्रेशन’ केले. तरुण पिढीवर त्यांचा किती प्रभाव आहे हे नागपुरातील चौकाचौकात पहायला मिळाले. तरुणाईशी ‘कनेक्ट’ होऊ शकणारा मुख्यमंत्री मिळाल्यामुळे युवकांमध्ये उत्साह दिसून येत होता. फडणवीस यांची कार्यपद्धती लक्षात घेता ते तरुणाईच्या समस्यांना सोडविण्यासाठी अग्रक्रमाने पुढाकार घेतील, ही आशा युवकांनी व्यक्त केली. फडणवीस यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत व ते नक्कीच यंगिस्तानचा विश्वास सार्थ ठरवतील, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.आव्हान मोठेलहान वयातच आपल्यातील नेतृत्वगुणांची चुणूक दाखविणारे देवेंद्र हे आम्हा सर्व तरुणांना जवळचे वाटतात. त्यांचे वय लहान आहे म्हणून नव्हे तर त्यांची काम करण्याची पद्धत अन् समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याकडून घेण्यात येणारा पुढाकार त्यांना इतरांपेक्षा वेगळे करतो. त्यांच्यासमोर राज्याची विस्कळीत झालेली घडी जुळविण्याचे आव्हान आहे व ते नक्कीच यात यशस्वी होतील यात शंकाच नाही.-सचिन पांडे, विद्यार्थीतरुणाईसाठी रोजगारनिर्मिती हवीउपराजधानीत ज्याप्रमाणात अभियांत्रिकी तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांचे पीक फोफावले आहे, त्याप्रमाणात उद्योग आलेले नाही. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला मोठ्या शहरांकडेच जावे लागते. यामुळे कुटुंबव्यवस्थेवरदेखील परिणाम होत आहे. देवेंद्र यांनी नागपुरात जास्तीत जास्त उद्योग कसे येतील यासाठी मुख्यमंत्री म्हणून प्रयत्न करायला हवेत ही अपेक्षा आहे.-अमित शर्मा, नोकरदार तरुणभयमुक्त वातावरण हवेकाही वर्षांपूर्वी अतिशय सुरक्षित मानण्यात येणाऱ्या नागपुरसारख्या शहरात आता महिला व तरुणींच्या मनात १०० टक्के सुरक्षिततेची भावना राहिलेली नाही. शहरातील क्राईमचा ग्राफ वाढीस लागला आहे. मोठ्या चौकांमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध नाहीत. मुख्यमंत्री या नात्याने कायदा व सुव्यवस्था स्थिती मजबूत करण्यासाठी ठोस व आश्वासक पावले देवेंद्र उचलतील, अशी आशा आहे.-तेजश्री जोशी, ‘आयटी’ क्षेत्रातील तरुणीशिक्षणप्रणालीत सकारात्मक बदल आणादेवेंद्र फडणवीस यांनी स्वत: शिक्षणक्षेत्राला जवळून अनुभवले आहे. त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या विधीसभेचे काम पाहिले आहे. अनेक अभ्यासक्रम हे विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यात सक्षम नाहीत हे ते जाणतात. शिवाय शिक्षणप्रणालीचा ऱ्हास कसा होत आहे यावरदेखील त्यांचा अभ्यास आहे. त्यामुळे मुख्यमंत्री या नात्याने कौशल्य व रोजगाराधिष्ठित शिक्षणप्रणाली निर्माण करण्यावर त्यांनी भर द्यावा. विद्यार्थ्यांचा कल संशोधनाकडे कसा वळेल यासाठी त्यांच्या सरकारने नवनवीन योजना सुरू कराव्यात-हितेश डोर्लीकर, व्यावसायिकसंपर्कात रहावेराज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आपल्या समस्या पोहोचविण्याची सामान्य कुटुंबातील तरुण क्वचितच हिंमत करतो. कारण आपले म्हणणे ऐकून घेतले जाईल का, अशी त्याच्या मनात शंका असते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची मोठी जबाबदारी असली तरी त्यांनी तरुणाईशी ‘कनेक्ट’ होणे सोडू नये. ज्याप्रमाणे जनता दरबार असतो, त्याचप्रमाणे तरुणाईला आपल्या समस्या मांडण्यासाठी वेगळा प्लॅटफॉर्म त्यांनी तयार करून द्यावा.-नीलेश राऊत, विद्यार्थी