शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर धाव घेऊन घोषणाबाजी

By admin | Updated: December 25, 2014 00:24 IST

अचानक मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर धाव घेऊन घोषणाबाजी करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील एका तरुणाने आज काही वेळेसाठी मोठी खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांनी

अमरावती जिल्ह्यातील तरुणाने उडविली खळबळनागपूर : अचानक मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर धाव घेऊन घोषणाबाजी करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील एका तरुणाने आज काही वेळेसाठी मोठी खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांनी त्याला तातडीने ताब्यात घेऊन अंबाझरी पोलिसांच्या हवाली केले. तुषार निरंजन उमाळे (वय २४) असे या तरुणाचे नाव आहे. तो चिंचोली (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील रहिवासी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तुषार अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. विदर्भवादी असलेला तुषार आज सकाळी १०.३० वाजतापासून भरतनगर चौकाजवळ थांबून होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते वाहनात बसले आणि त्यांचा काफीला भरतनगर चौकाजवळून निघण्याच्या तयारीत असतानाच तुषार आरडाओरड करीत अचानक मुख्यमंत्र्यांच्या वाहनासमोर आला. ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’, अशाप्रकारची घोषणाबाजी तो करू लागला. या अनपेक्षित प्रकारामुळे काही वेळेसाठी सुरक्षा रक्षक गोंधळले. मात्र, दुसऱ्याच क्षणाला त्यांनी तुषारला ताब्यात घेऊन अंबाझरी पोलिसांच्या हवाली केले. अंबाझरी पोलिसांनी तुषारला ११.३० वाजता पोलीस ठाण्यात आणले. दुपारी २.३० वाजता ‘पुन्हा असे काही करणार नाही’, या हमीवर तुषारला पोलिसांनी मोकळे केले. (प्रतिनिधी)फडणवीसांचे स्माईलकाय नेमका प्रकार आहे, त्याची नंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशी केली. सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना झालेला प्रकार सांगितला. त्यावर त्यांनी ‘नो प्रॉब्लेम’म्हणत ‘स्माईल‘ केल्याचे समजते.