शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
2
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
5
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
6
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
7
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
8
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
9
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
10
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
11
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
12
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
13
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
14
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
15
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
16
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
17
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
18
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
19
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
20
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली

पाच वर्षांत सहा लाख झाडांची कत्तल!

By admin | Updated: July 23, 2015 02:54 IST

‘वने’ ही मानव जातीला निसर्गाकडून मिळालेला अमूल्य ठेवा आहे, शिवाय वन्यप्राण्यांचा तो हक्काचा अधिवास आहे. पर्यावरण संतुलनासाठी वनांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

वनांचा ऱ्हास : गडचिरोली आघाडीवर जीवन रामावत नागपूर‘वने’ ही मानव जातीला निसर्गाकडून मिळालेला अमूल्य ठेवा आहे, शिवाय वन्यप्राण्यांचा तो हक्काचा अधिवास आहे. पर्यावरण संतुलनासाठी वनांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘वने’ पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा समतोल राखण्याचे काम करते. प्रामुख्याने जमीन, वनस्पती, प्राणी व सूक्ष्म जीव या घटनांनी मिळून ‘वने’ तयार झाली आहेत. त्यामुळे यापैकी कोणत्याही एका घटकाचा नाश झाला तर समतोल बिघडतो आणि पर्यावरणासंंबंधीच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळेच वनांचे संरक्षण व संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी ठरते. मात्र असे असताना मागील पाच वर्षांत तस्करांनी सुमारे ६ लाख ६३ हजार ६०३ झाडांची कत्तल केली आहे. यात २ लाख ९४ हजार १८० सागाच्या झाडांचा समावेश असून, यामुळे शासनाचे सुमारे ६ कोटी ४० लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे वनांचे संरक्षण व संवर्धनासाठी काटोकाट प्रयत्न केला जात आहे. गत पाच दशकांपासून वनव्यवस्थापनाची कामे केली जात आहेत, शिवाय काळानुरू प त्यात बदल होत गेला आहे. महाराष्ट्रात मागील ५० वर्षांत वानिका क्षेत्रात अनेक नवीन उपक्रम राबविण्यात आले आहेत. उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्राच्या ३ लाख ७ हजार ७१३ चौ. किलोमीटर भौगोलिक क्षेत्रापैकी ६१ हजार ७२४ चौ. किलोमीटर (१९.९४ टक्के) इतके वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्राचा विभागनिहाय विचार करता, विदर्भात ३३ लाख १९ हजार ८०० हेक्टर वनक्षेत्र आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात २५ लाख २७ हजार ७०० हेक्टर क्षेत्र असून, मराठवाड्यात २ लाख ८८ हजार ३०० हेक्टर क्षेत्र आहे. मात्र मागील काही वर्षांतील परिस्थिती लक्षात घेता, वनांचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. अवैध वृक्षतोड, अवैध चराई, आगी व अतिक्रमणांमुळे वनक्षेत्र कमी होत आहे. विशेष म्हणजे, पूर्वी अवैध वृक्षतोड ही गावातील लोकांच्या गरजा व शेतीअवजारांसाठी केली जात होती. मात्र मागील काही वर्षांत त्याचे स्वरू प बदललेले दिसून येत आहे. अलीकडे तस्करांकडून संघटितरीत्या व्यापारिक उद्देशातून झाडांची तस्करी केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने गडचिरोली वनवृत्तातील सिरोंचा, चंद्रपूर वनवृत्तातील राजुरा, औरंगाबाद वनवृत्तातील नांदेड, धुळे वनवृत्तातील यावल, नंदूरबार व नाशिक वनवृत्तातील पूर्व व पश्चिम नाशिक वन विभागाचा समावेश आहे.