शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

सहा रेल्वे गाड्या ऐनवेळी रद्द

By admin | Updated: August 8, 2015 03:07 IST

मध्य प्रदेशातील हरदा येथे झालेल्या रेल्वे अपघातामुळे तिसऱ्या दिवशी नागपुरातून सुटणाऱ्या सहा रेल्वेगाड्या रद्द ....

प्रवाशांना बसला फटका : मध्य प्रदेशातील अपघातामुळे घेतला निर्णयनागपूर : मध्य प्रदेशातील हरदा येथे झालेल्या रेल्वे अपघातामुळे तिसऱ्या दिवशी नागपुरातून सुटणाऱ्या सहा रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय झाली. ऐनवेळी त्यांना मिळेल त्या वाहनाने आपल्या इच्छित स्थळी जाण्याची पाळी आली. यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल असंतोष व्यक्त केला आहे.मध्य प्रदेशातील हरदा येथे तीन दिवसांपूर्वी दोन रेल्वेगाड्यांचे डबे रुळावरून घसरून मोठा अपघात झाला होता. यामुळे मुंबई-इटारसी मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या, तर अनेक रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला होता. दरम्यान नागपुरात न येणाऱ्या काही रेल्वेगाड्या नागपूरमार्गे वळविण्यात आल्या होत्या. यामुळे नागपूर-वर्धा या मार्गावर आधीच क्षमतेपेक्षा जास्त गाड्या चालविण्यात येत असल्यामुळे या रुळावरील वाहतूक अतिशय व्यस्त झाली होती. दरम्यान ७ आॅगस्टला या मार्गावरील सहा रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. यामुळे ऐनवेळी आपली रेल्वेगाडी रद्द झाल्याची माहिती मिळाल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. त्यांना आपले तिकीट रद्द करून इतर वाहनांनी जाण्याची पाळी आली. यात अनेक प्रवाशांनी दोन महिन्यापूर्वी आपल्या तिकिटांचे आरक्षण करून कन्फर्म तिकीट मिळविल्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. नागपुरातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या १० आॅगस्टपर्यंत रद्द करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप होणार आहे, हे विशेष. दरम्यान प्रवाशांसाठी रेल्वेस्थानकावर माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. आपल्या गाड्यांची माहिती जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी ०७१२-२५६४३४३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)थर्डलाईन अभावी वाहतूक विस्कळीतनागपूर-वर्धा मार्गावर अप आणि डाऊन या दोन लाईन सुरू आहेत. मागील अनेक वर्षांपासून येथे थर्डलाईनची मागणी होत आहे. सध्या दररोज १०० रेल्वेगाड्या चालविण्याची या रेल्वे रुळांची क्षमता आहे. परंतू तरीसुद्धा १३५ रेल्वेगाड्या दररोज चालविण्यात येत आहेत. त्यामुळे येथे थर्डलाईन गरजेची होती. मध्य प्रदेशात हरदा येथे झालेल्या अपघातामुळे नागपूरमार्गे रेल्वेगाड्या वळविण्यात आल्यामुळे या रेल्वे रुळावरील ताण मागील तीन दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळे नागपुरातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. थर्ड लाईनचे काम पूर्ण झाले असते तर ही वाहतूक सुरळीत झाली असती.